शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

आठवले गटाला आता हव्यात ४० जागा

By admin | Updated: January 31, 2017 02:40 IST

शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्याने आता भाजपाच्या मित्रपक्षाच्या अधिक जागा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील

मुंबई : शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्याने आता भाजपाच्या मित्रपक्षाच्या अधिक जागा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाने मुंबई महापालिकेत किमान ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच भाजपाकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यात सर्वत्र स्वबळावर लढण्याचे जाहीर करीत युतीचा प्रश्न निकालात काढला. त्यामुळे युती तुटली तरी भाजपासोबत जाणार असल्याचे यापूर्वीच आठवले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेत आरपीआयने आपल्यासाठी ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीने २९ जागा सोडल्या होत्या. त्यापैकी केवळ एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले होते. आता जागावाटपातील मोठा भागीदार नाहीसा झाल्याने भाजपाकडे आमच्या पक्षाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणच्या जागा सोडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच भाजपा श्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महातेकर यांनी सांगितले. या वेळी कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, तानसेन ननावरे, मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)