शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आठवले गटाला आता हव्यात ४० जागा

By admin | Updated: January 31, 2017 02:40 IST

शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्याने आता भाजपाच्या मित्रपक्षाच्या अधिक जागा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील

मुंबई : शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेतल्याने आता भाजपाच्या मित्रपक्षाच्या अधिक जागा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील आरपीआय गटाने मुंबई महापालिकेत किमान ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच भाजपाकडे प्रस्ताव देण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी सांगितले. सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईसह राज्यात सर्वत्र स्वबळावर लढण्याचे जाहीर करीत युतीचा प्रश्न निकालात काढला. त्यामुळे युती तुटली तरी भाजपासोबत जाणार असल्याचे यापूर्वीच आठवले यांनी जाहीर केले होते. त्यानुसार मुंबई महापालिकेत आरपीआयने आपल्यासाठी ४० ते ४५ जागांची मागणी केली आहे. २०१२ मध्ये झालेल्या निवडणुकीत युतीने २९ जागा सोडल्या होत्या. त्यापैकी केवळ एका जागेवर विजय मिळविण्यात यश आले होते. आता जागावाटपातील मोठा भागीदार नाहीसा झाल्याने भाजपाकडे आमच्या पक्षाचे प्राबल्य असलेल्या ठिकाणच्या जागा सोडण्याची मागणी केली आहे. त्याबाबत लवकरच भाजपा श्रेष्ठींकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे महातेकर यांनी सांगितले. या वेळी कार्याध्यक्ष सुमंतराव गायकवाड, तानसेन ननावरे, मुंबईचे अध्यक्ष गौतम सोनवणे उपस्थित होते. (प्रतिनिधी)