शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

...आता रिन बारमध्ये ‘स्मार्ट फोम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:01 IST

राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा

मुंबई : राज्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ‘रिन बार’ने पुढाकार घेतला असून, २०२० पर्यंत हिंदुस्तान युनिलिव्हरच्या ‘यूएसएलपी’ने उत्पादनांच्या बाबतीत पाण्याचा वापर कमी करण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. नव्याने दाखल झालेल्या ‘रिन बार’मध्ये साबणातील ‘स्मार्ट फोम’ तंत्रज्ञानामुळे अर्ध्या पाण्यातच कपडे धुता येणे शक्य होणार आहे. हा नव्या तंत्रज्ञानाने उपयुक्त असणारा साबण बाजारात उपलब्ध आहे.पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी ‘रिन बार’तर्फे जनजागृतीपर अभियान राबविण्यात येणार आहे. यापूर्वीही ‘रिन बार’च्या वतीने पाणीबचतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. भविष्यातील पाणीसंकटावर उपाय म्हणून अद्ययावत तंत्रज्ञान वापरून, या अभिनव ‘रिन बार’ साबणाची निर्मिती करण्यात आली आहे. या साबणाच्या वापराने दिवसभरात होणारा पाण्याचा वापर अर्ध्यावर येतो, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.जनजागृतीपर अभियानांतर्गत सामान्यांच्या पाणीवापराविषयी सवयी बदलण्यासाठी पुढाकार घेणे आणि दुसºया बाजूला ज्यातून पाणी वाचविता येईल, तो ‘रिन बार’ सामान्यांपर्यंत पोहोचविणे हे दोन टप्पे आहेत, असे या रिन बार साबणाच्या उत्पादनाचे मुख्य अधिकारी विपुल माथुर यांनी सांगितले. याशिवाय रेन हार्वेस्टिंग, पाणीसाठा यांचा विचार करून बंधारे आणि शिवारांचे काम करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासंबधी राज्यातील खामगाव आणि अन्य काही ठिकाणी प्रकल्प सुरू असल्याचे माथुर यांनी सांगितले.अभिनव उत्पादनाबद्दल बोलताना, दक्षिण आशियातील रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या प्रमुख मीना राजन म्हणाल्या की, हिंदुस्तान युनिलिव्हरच्या शाश्वत जीवनावश्यक धोरणानुसार केवळ उत्कृष्ट नाही, तर दर्जात्मक आणि टिकाऊ उत्पादनांवर भर आहे.‘रिन बार’ हे एक उदाहरण आहे, जे कपडे स्वच्छ आणि चमक देण्याव्यतिरिक्त आता ‘स्मार्ट फोम तंत्रज्ञान’ पुरविणार आहे. शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि अभियंते यांच्या चमूने विकसित केलेल्या या तंत्रज्ञानामुळे ग्राहक कमी पाणी वापराची सवय अंगीकारतील. यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये पाणीटंचाईच्या गंभीरतेमुळे होणाºया अडचणी कमी होण्यात मदत होईल.