शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

एस्टीची एका दिवसाची कमाई २0 लाख

By admin | Updated: October 13, 2014 23:03 IST

भाजपची प्रचारसभा : तब्बल २०० बसेसशी प्रासंगिक करार, ट्रकऐवजी श्रोते आले बसमधून

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी जिल्हाभरातून नागरिकांसाठी दीडशे गाड्यांची सुविधा करण्यात आली होती. ‘प्रासंगिक करारान्वये’ जिल्हाभरातून भाजपा कार्यकर्त्यांनी गाड्यांचे आगाऊ बुकिंग केले होते. त्यामुळे एस. टी.ला २० लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.भाजपाचे चिपळूणचे उमेदवार माधव गवळी, राजापूरचे संजय यादवराव, दापोलीचे केदार साठे, रत्नागिरीचे बाळ माने यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा रत्नागिरीतील चंपक मैदान येथे आयोजित करण्यात आली होती. कार्यकर्त्यांना सभास्थळी आणण्यासाठी व पुन्हा गावात पोहोचवण्यासाठी एस. टी.ची सुविधा करण्यात आली होती. कोकण रेल्वेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आले होते. त्यानंतर प्रथमच पंतप्रधान रत्नागिरीत आले असल्याने या सभेला गर्दी होणार, हे निश्चित होते. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आगावू ग्रुप आरक्षण करून एस. टी.नेच येणे पसंद केले.सकाळपासून भाजपा कार्यकर्ते सभेला येत होते. ग्रामीण भागातील वाडीवस्तीवरून कार्यकर्त्यांना आणण्यासाठी एस. टी.सह खासगी गाड्यांचीही सुविधा करण्यात आली होती. टेम्पो ट्रॅव्हलर, खासगी बसेस, रिक्षा टेम्पो, सुमो, महिंद्रा मॅक्स, दुचाकीव्दारे आलेल्या भाजपा कार्यकर्त्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे खासगी वाहन चालकांनाही त्यामुळे उत्पन्न मिळाले.पंतप्रधानांच्या सभेमुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाला देखील आर्थिक उत्पन्न प्राप्त झाले आहे. एस. टी.च्या गाड्या थेट सभामंडपापर्यंत येत होत्या. विभाग नियंत्रक के. बी. देशमुख स्वत: उपस्थित राहून गाड्यांवर लक्ष ठेवून होते.दरम्यान एस. टी.च्या दीडशे गाड्यांचे आरक्षण करण्यात आले असले तरी काही गाड्या वाहतूक कोंडीतच अडकल्या. पंतप्रधानांची सभा झाली, त्या चंपक मैदानाकडे जाणारे रस्ते अरूंद होते. त्याचबरोबर वाहनांची दाटी आणि सुरक्षा यंत्रणा यामुळे मोठी वाहतूक कोंंडी झाली होती.पंतप्रधानांचे आगमन होण्याच्या दोन मिनिटे अगोदर मार्गावरील वाहतूक पूणपणे थांबवण्यात आली होती. त्यामुळे झाडगाव एमआयडीसी परिसर, साळवी स्टॉप, मारूती मंदिर आदी महत्वाच्या ठिकाणी अनेक वाहने थांबून राहिली होती. काहीजण एवढ्या दूरच्या ठिकाणाहून चालत येत होते. त्यानंतर कडेकोट सुरक्षा व्यवस्थेचा सामना करत, संपूर्ण तपासणी होत असल्याने मोदींच्या सभामंडपापर्यंत जाण्यास वेळ लागत होता. या साऱ्यामुळे अनेकांना मोदींच्या भाषणापासून वंचित रहावे लागले. (प्रतिनिधी)