शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
4
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
5
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
6
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं कौतुक
7
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
8
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
9
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
10
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
11
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
12
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
13
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
14
"छावा चित्रपट छानच आहे, पण.."; मालिकेत येसूबाईंची भूमिका साकारणारी प्राजक्ता गायकवाड काय म्हणाली?
15
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
16
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
17
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
18
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
19
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
20
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार

उच्च न्यायालयाची राज्य सरकारला विचारणा

By admin | Updated: April 9, 2017 04:02 IST

महाविद्यालयांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता न केल्यास त्यांना प्रतिबंध करण्याचा अधिकार बार कौन्सिल आॅफ इंडियाला (बीसीआय) आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.

मुंबई : महाविद्यालयांनी आवश्यक त्या बाबींची पूर्तता न केल्यास त्यांना प्रतिबंध करण्याचा अधिकार बार कौन्सिल आॅफ इंडियाला (बीसीआय) आहे का? अशी विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली. राज्यातील ६० विधी महाविद्यालयांना प्रतिबंध करण्याच्या बीसीआयच्या निर्णयाला एलएलबीच्या सात विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. बीसीआयने मनमानीपणे पहिल्या वर्षाचा प्रवेश बंद केला आहे, असे याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटले आहे.‘नियमांना अनुसरून विधी महाविद्यालय चालवण्यात येत आहे की नाही, याची तपासणी करण्यासाठी दरवर्षी बीसीआयकडे दीड लाख रुपये जमा करण्यात येतात. मात्र, बीसीआयने कधीच तपासणी केली नाही. पाहणी न करताच बीसीआयने ६४ महाविद्यालयांमध्ये पुरेसे प्राध्यापक नाहीत किंवा प्राध्यापकांकडे पुरेसे शिक्षण नाही, असे कारण देत त्यांना प्रतिबंध केला आहे,’ असे याचिकेत म्हटले आहे.‘बीसीआयला अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे का? हे राज्य सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट करावे. यामुळे अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि प्रवेश प्रक्रियेसही विलंब होत आहे,’ असे उच्च न्यायालयाने म्हटले.उच्च न्यायालयाने राज्य सरकारला याबाबत १३ एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ६४ विधी महाविद्यालयांना प्रतिबंध करण्याचा बीसीआयचा निर्णय रद्द करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)