शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
2
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
3
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
4
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
5
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
6
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
8
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
9
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
10
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
11
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
12
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
13
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
14
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
15
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
16
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
17
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
18
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
19
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
20
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश

पाणीप्रश्नी हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा

By admin | Updated: February 11, 2016 01:34 IST

दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मराठवाडा व अन्य काही ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत

मुंबई : दुष्काळामुळे राज्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याने मराठवाडा व अन्य काही ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची गंभीर दखल घेत उच्च न्यायालायने दुष्काळग्रस्त भागातील रुग्णालये व शाळांमध्ये पाण्याची काय व्यवस्था केली आहे? अशी विचारणा राज्य सरकारकडे करत याबाबत संपूर्ण माहिती सादर करण्याचा आदेश बुधवारी दिला.शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत उच्च न्यायालयाने ‘स्यु-मोटो’ दाखल करून घेतली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. मराठवड्यात पिण्याच्या पाण्याची समस्या कायम आहे. पाण्याच्या टंचाईमुळे रुग्णालयांतील शस्त्रक्रियांवर परिणाम होत आहे. अशा स्थितीत सरकारकडे काय अ‍ॅक्शन प्लॅन आहे? पाण्याचे टँकर संबंधित जिल्ह्यांना पुरवले जातात का? तसेच शाळा आणि रुग्णालयांना पाण्याचे टँकर पुरवले जातात का? पाण्याची काय व्यवस्था केली आहे? अशी विचारणा करत खंडपीठाने राज्य सरकारला याबाबत तपशीलवार माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)एकाच महिन्यात ८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा?मराठवाडा सलग तिसऱ्यावर्षी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत आहे. पिण्यासाठी, शेतीसाठी आणि जनावरांच्या चाऱ्यासाठीही पाणी नसल्याने हताश होऊन गेल्या वर्षभरात मराठवड्यातील एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.तर गेल्या एका महिन्यात ८९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. न्या. नरेश पाटील व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठाने याची गांभीर्याने दखल घेत एका महिन्या ८९ शेतकऱ्यांच्या ८९ आत्महत्या कशा? अशी विचारणा सरकारकडे करत यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे.