शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

राज्य मार्गांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय

By admin | Updated: October 20, 2016 16:10 IST

राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी व नंतर ५ टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय लाभणार आहे.

राजेश निस्ताने, ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २० -  राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी आणि नंतर पाच टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (एडीबी) अर्थसहाय लाभणार आहे. 
महाराष्ट्रात राज्य मार्गांची अवस्था वाईट आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे तर ही अवस्था आणखीणच वाईट झाली. या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाच्या तिजोरीत तेवढा पैसा नाही. टोल टॅक्समधून वसुली झाल्यास जनता त्याला विरोध करते. यावर पर्याय म्हणून ‘अ‍ॅन्युटी’ योजना आणली गेली. या योजनेत कंत्राटदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले जाईल. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संबंधी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी शासनाने आदेश जारी केले. ‘अ‍ॅन्युटी’तील एडीबी अर्थसहाय योजनेतून राज्यात एकूण ३० कामे मंजूर करण्यात आली. त्यातून तीन हजार ३४ किलोमीटरचे रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. त्यावर आठ हजार ४१५ कोटी रुपये खर्च केले जाईल. त्याचे तीन टप्पे पाडण्यात आले आहे. 
 
अमरावती विभागाला १०५५ कोटी
अमरावती विभागाला एडीबी अर्थसहाय योजनेतून तीन टप्प्यात सहा कामे मंजूर झाली. यातून ४०६ किमीचे राज्य मार्ग बांधकाम होणार आहे. त्याचे बजेट १ हजार ५५ कोटी रुपयांचे आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद-महागाव-फुलसावंगी आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव मार्गांचे बांधकाम दुसºया टप्प्यात होणार आहे. 
 
मुख्यमंत्री-गडकरींमध्ये दुमत 
राज्य मार्ग बांधकामाच्या या योजनेत अमरावती विभागात पहिल्या टप्प्यात ६८५ कोटी रुपये हे नागपूर-मुंबई (मार्गे पुलगाव-देवगाव-शिंगणापूर-कारंजा-सिंदखेडराजा) या रस्त्यावर खर्च होणार आहे. २७४ किलोमीटरचे बांधकाम त्यातून होईल.  मात्र या कामाच्या निवडीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. याच राष्टÑीय महामार्गाला पर्याय म्हणून सूपर एक्सप्रेस-वेची घोषणा ना. गडकरी यांनी आधीच केली आहे. नागपूरहून सहा तासात मुंबईला पोहोचणे या सूपर-वेवरून शक्य होणार आहे. या वेवर लवकरच स्वतंत्र खर्च होणार असताना शिंगणापूर हायवेवर ६८५ कोटींचा खर्च कशासाठी या मुद्यावरून या दोन मंत्र्यांमध्ये दुमत झाल्याची बांधकाम सुत्राची माहिती आहे.  
 
* पहिल्या टप्प्यामध्ये ९७७ किलोमीटर रस्त्याची ११ कामे असून त्यासाठी दोन हजार ५९४ कोटींचे बजेट आहे. 
* दुसºया टप्प्यामध्ये एक हजार ८४ किलोमीटरची नऊ कामे असून त्याचे बजेट दोन हजार ८७२ कोटींचे आहे. 
* तिसरा टप्पा हा दोन हजार ९४८ कोटींचा आहे. त्यात दहा कामे घेण्यात आली. त्यातून ९७४ किलोमीटरचे राज्य मार्गांचे बांधकाम होणार आहे. 
 
राज्य मार्गांसाठी ‘अ‍ॅन्युटी’ योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय घेतले जाणार आहे. परंतु त्याबाबतचे धोरण अद्याप निश्चित झालेले नाही. या रस्त्यांसाठी शासन स्वत: कर्ज उभारणार की, कंत्राटदारांना कर्ज दिले जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. 
- सी.व्ही. तुंगे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम अमरावती.