शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्य मार्गांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय

By admin | Updated: October 20, 2016 16:10 IST

राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी व नंतर ५ टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय लाभणार आहे.

राजेश निस्ताने, ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २० -  राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी आणि नंतर पाच टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (एडीबी) अर्थसहाय लाभणार आहे. 
महाराष्ट्रात राज्य मार्गांची अवस्था वाईट आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे तर ही अवस्था आणखीणच वाईट झाली. या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाच्या तिजोरीत तेवढा पैसा नाही. टोल टॅक्समधून वसुली झाल्यास जनता त्याला विरोध करते. यावर पर्याय म्हणून ‘अ‍ॅन्युटी’ योजना आणली गेली. या योजनेत कंत्राटदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले जाईल. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संबंधी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी शासनाने आदेश जारी केले. ‘अ‍ॅन्युटी’तील एडीबी अर्थसहाय योजनेतून राज्यात एकूण ३० कामे मंजूर करण्यात आली. त्यातून तीन हजार ३४ किलोमीटरचे रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. त्यावर आठ हजार ४१५ कोटी रुपये खर्च केले जाईल. त्याचे तीन टप्पे पाडण्यात आले आहे. 
 
अमरावती विभागाला १०५५ कोटी
अमरावती विभागाला एडीबी अर्थसहाय योजनेतून तीन टप्प्यात सहा कामे मंजूर झाली. यातून ४०६ किमीचे राज्य मार्ग बांधकाम होणार आहे. त्याचे बजेट १ हजार ५५ कोटी रुपयांचे आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद-महागाव-फुलसावंगी आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव मार्गांचे बांधकाम दुसºया टप्प्यात होणार आहे. 
 
मुख्यमंत्री-गडकरींमध्ये दुमत 
राज्य मार्ग बांधकामाच्या या योजनेत अमरावती विभागात पहिल्या टप्प्यात ६८५ कोटी रुपये हे नागपूर-मुंबई (मार्गे पुलगाव-देवगाव-शिंगणापूर-कारंजा-सिंदखेडराजा) या रस्त्यावर खर्च होणार आहे. २७४ किलोमीटरचे बांधकाम त्यातून होईल.  मात्र या कामाच्या निवडीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. याच राष्टÑीय महामार्गाला पर्याय म्हणून सूपर एक्सप्रेस-वेची घोषणा ना. गडकरी यांनी आधीच केली आहे. नागपूरहून सहा तासात मुंबईला पोहोचणे या सूपर-वेवरून शक्य होणार आहे. या वेवर लवकरच स्वतंत्र खर्च होणार असताना शिंगणापूर हायवेवर ६८५ कोटींचा खर्च कशासाठी या मुद्यावरून या दोन मंत्र्यांमध्ये दुमत झाल्याची बांधकाम सुत्राची माहिती आहे.  
 
* पहिल्या टप्प्यामध्ये ९७७ किलोमीटर रस्त्याची ११ कामे असून त्यासाठी दोन हजार ५९४ कोटींचे बजेट आहे. 
* दुसºया टप्प्यामध्ये एक हजार ८४ किलोमीटरची नऊ कामे असून त्याचे बजेट दोन हजार ८७२ कोटींचे आहे. 
* तिसरा टप्पा हा दोन हजार ९४८ कोटींचा आहे. त्यात दहा कामे घेण्यात आली. त्यातून ९७४ किलोमीटरचे राज्य मार्गांचे बांधकाम होणार आहे. 
 
राज्य मार्गांसाठी ‘अ‍ॅन्युटी’ योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय घेतले जाणार आहे. परंतु त्याबाबतचे धोरण अद्याप निश्चित झालेले नाही. या रस्त्यांसाठी शासन स्वत: कर्ज उभारणार की, कंत्राटदारांना कर्ज दिले जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. 
- सी.व्ही. तुंगे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम अमरावती.