शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
4
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
5
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
6
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
7
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
8
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
9
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
10
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
11
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
12
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
13
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
14
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
15
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
16
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
17
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
18
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
19
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
20
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?

राज्य मार्गांसाठी एशियन बँकेचे अर्थसहाय

By admin | Updated: October 20, 2016 16:10 IST

राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी व नंतर ५ टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय लाभणार आहे.

राजेश निस्ताने, ऑनलाइन लोकमत
यवतमाळ, दि. २० -  राज्य मार्गांवर कंत्राटदारांनी आधी रक्कम गुंतवावी आणि नंतर पाच टप्प्यात त्याचा परतावा घ्यावा, या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘अ‍ॅन्युटी’ योजनेला एशियन डेव्हलपमेंट बँकेचे (एडीबी) अर्थसहाय लाभणार आहे. 
महाराष्ट्रात राज्य मार्गांची अवस्था वाईट आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पावसाळ्यामुळे तर ही अवस्था आणखीणच वाईट झाली. या रस्त्यांच्या बांधकामासाठी शासनाच्या तिजोरीत तेवढा पैसा नाही. टोल टॅक्समधून वसुली झाल्यास जनता त्याला विरोध करते. यावर पर्याय म्हणून ‘अ‍ॅन्युटी’ योजना आणली गेली. या योजनेत कंत्राटदारांना गुंतवणुकीचे आवाहन केले जाईल. त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाणार आहे. या संबंधी ६ आॅक्टोबर २०१६ रोजी शासनाने आदेश जारी केले. ‘अ‍ॅन्युटी’तील एडीबी अर्थसहाय योजनेतून राज्यात एकूण ३० कामे मंजूर करण्यात आली. त्यातून तीन हजार ३४ किलोमीटरचे रस्त्यांचे बांधकाम होणार आहे. त्यावर आठ हजार ४१५ कोटी रुपये खर्च केले जाईल. त्याचे तीन टप्पे पाडण्यात आले आहे. 
 
अमरावती विभागाला १०५५ कोटी
अमरावती विभागाला एडीबी अर्थसहाय योजनेतून तीन टप्प्यात सहा कामे मंजूर झाली. यातून ४०६ किमीचे राज्य मार्ग बांधकाम होणार आहे. त्याचे बजेट १ हजार ५५ कोटी रुपयांचे आहे. त्यात यवतमाळ जिल्ह्यातील वाशिम-पुसद-महागाव-फुलसावंगी आणि बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव मार्गांचे बांधकाम दुसºया टप्प्यात होणार आहे. 
 
मुख्यमंत्री-गडकरींमध्ये दुमत 
राज्य मार्ग बांधकामाच्या या योजनेत अमरावती विभागात पहिल्या टप्प्यात ६८५ कोटी रुपये हे नागपूर-मुंबई (मार्गे पुलगाव-देवगाव-शिंगणापूर-कारंजा-सिंदखेडराजा) या रस्त्यावर खर्च होणार आहे. २७४ किलोमीटरचे बांधकाम त्यातून होईल.  मात्र या कामाच्या निवडीवरून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यात एकमत झाले नसल्याची माहिती आहे. याच राष्टÑीय महामार्गाला पर्याय म्हणून सूपर एक्सप्रेस-वेची घोषणा ना. गडकरी यांनी आधीच केली आहे. नागपूरहून सहा तासात मुंबईला पोहोचणे या सूपर-वेवरून शक्य होणार आहे. या वेवर लवकरच स्वतंत्र खर्च होणार असताना शिंगणापूर हायवेवर ६८५ कोटींचा खर्च कशासाठी या मुद्यावरून या दोन मंत्र्यांमध्ये दुमत झाल्याची बांधकाम सुत्राची माहिती आहे.  
 
* पहिल्या टप्प्यामध्ये ९७७ किलोमीटर रस्त्याची ११ कामे असून त्यासाठी दोन हजार ५९४ कोटींचे बजेट आहे. 
* दुसºया टप्प्यामध्ये एक हजार ८४ किलोमीटरची नऊ कामे असून त्याचे बजेट दोन हजार ८७२ कोटींचे आहे. 
* तिसरा टप्पा हा दोन हजार ९४८ कोटींचा आहे. त्यात दहा कामे घेण्यात आली. त्यातून ९७४ किलोमीटरचे राज्य मार्गांचे बांधकाम होणार आहे. 
 
राज्य मार्गांसाठी ‘अ‍ॅन्युटी’ योजनेत एशियन डेव्हलपमेंट बँकेचे अर्थसहाय घेतले जाणार आहे. परंतु त्याबाबतचे धोरण अद्याप निश्चित झालेले नाही. या रस्त्यांसाठी शासन स्वत: कर्ज उभारणार की, कंत्राटदारांना कर्ज दिले जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. 
- सी.व्ही. तुंगे मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम अमरावती.