शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर !

By admin | Updated: November 7, 2016 23:10 IST

पाळा येथील आदिवासी आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून या शाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही.

गणेश मापारी/ऑनलाइन लोकमत खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 7 - पाळा येथील आदिवासी आश्रम शाळेची मान्यता रद्द करण्यात आली असून या शाळेमधील ३८८ विद्यार्थ्यांचे अद्याप दुसऱ्या शाळेमध्ये समायोजन करण्यात आलेले नाही. दिवाळीच्या सुट्यानंतर बुधवारी शाळा सुरु होणार असल्याने यासर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.खामगाव तालुक्यातील पाळा येथील आदिवासी निवासी आश्रम शाळेमध्ये दोन अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार प्रकरण उघडकीस आले आहे. या प्रकरणात १७ जणांविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून १५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणात दोषी असलेल्या आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ८ जणांविरुध्द निलंबनाची कारवाई करण्यात आली असून सोमवारी देखील आणखी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. दोषींना निलंबित करण्यासोबत या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांचे विविध आदिवासी शाळांमध्ये त्वरित समायोजन करण्यात येईल, अशी माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली. तथापी दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरु होण्यासाठी अवघ्या काही तासांचाच अवधी शिल्लक असताना अद्याप विद्यार्थ्यांचे समायोजन कोणत्याही शाळेत करण्यात आलेले नाही. पाळा येथील आश्रम शाळेची मान्यता रद्द असल्याने ही शाळा उघडणारच नसून पुढील शिक्षणासाठी दुसरी शाळाही अद्याप निश्चीत झालेली नाही. त्यामुळे या शाळेतील सर्व ३८८ विद्यार्थ्यांसाठी बुधवारी शाळाच उघडणार नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या मुळगावी वेगवेगळी पथके पाठविली असून विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार त्यांचे आदिवासी शाळांमध्ये समायोजन करण्यात येणार आहे. या प्रक्रियेला बराच अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी शासनाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत त्वरित निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.आश्रमशाळेत पाच जिल्ह्यातील विद्यार्थीपाळा येथील निवासी आदिवासी आश्रमशाळेत पाच जिल्ह्यांमधील विद्यार्थी शिकतात. बुलडाणा, वाशिम, अकोला, जळगाव आणि अमरावती या पाच जिल्ह्यांमधील रहिवासी असलेल्या विद्यार्थ्यांना या आश्रम शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे पाचही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या पालकांशी भेटणे आणि विद्यार्थ्यांचे दुसऱ्या शाळेत समायोजन करणे यासाठी आदिवासी विभागाच्या पथकाकडून प्रयत्न सुरु आहेत. निवासी शाळेच्या नावाने पालकांमध्ये भीतीविद्यार्थिनींवर घडलेला अत्याचार हा निवासी आश्रम शाळेमध्ये झालेला आहे. त्यामुळे निवासी शाळेबाबत आता या शाळेमधील सर्व विद्यार्थिनींच्या पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील धारणी मधील विद्यार्थी व विद्यार्थिनी पाळा येथील आश्रम शाळेत आहेत. त्यामुळे आता पाळा येथीलच नव्हे तर कोणत्याही निवासी आश्रम शाळेत विद्यार्थिनींनाच नव्हे विद्यार्थ्यांनाही पाठविणार नसल्याची भूमिका काही पालकांनी घेतल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.दिवाळीची सुट्टी असल्याने सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित भेटणे शक्य नाही. त्यामुळे पाच जिल्ह्यांमध्ये आदिवासी विभागाचे पथक पाठविण्यात आले आहे. लवकरात लवकर विद्यार्थ्यांचे समायोजन दुसऱ्या आदिवासी शाळांमध्ये करण्यात येईल.-व्ही.ए. सोनवणे, प्रकल्प अधिकारी आदिवासी प्रकल्प कार्या.अकोला