शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

महाराष्ट्रातील काँग्रेसची कमान अशोक चव्हाणांच्या हाती

By admin | Updated: March 2, 2015 12:46 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणूक व त्यानंतर विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पार दैना उडाली होती. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोमवारी विविध राज्यांमध्ये नेतृत्व बदल केले. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियु्क्ती केली होती. आदर्श घोटाळा व पेड न्यूज प्रकरणामुळे चव्हाण गोत्यात आले असले तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला आहे. राज्यात काँग्रेस तिस-या क्रमांकावर फेकला गेला असून काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करुन राज्यात काँग्रेससाठी अच्छे दिन आणण्याचे आव्हान चव्हाण यांच्यासमोर आहे.  तर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय निरुपम यांना मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याची खडतर परीक्षेला सामोरे जावे लागेल. 

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय माकन, तेलंगण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तम रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.