शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

महाराष्ट्रातील काँग्रेसची कमान अशोक चव्हाणांच्या हाती

By admin | Updated: March 2, 2015 12:46 IST

लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. २ - लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाणा-या नवसंजीवनी देण्यासाठी काँग्रेसने राज्यात नेतृत्वबदल केले असून खासदार अशोक चव्हाण यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर संजय निरुपम यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

लोकसभा निवडणूक व त्यानंतर विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पार दैना उडाली होती. यापार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सोमवारी विविध राज्यांमध्ये नेतृत्व बदल केले. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण यांची नियु्क्ती केली होती. आदर्श घोटाळा व पेड न्यूज प्रकरणामुळे चव्हाण गोत्यात आले असले तरी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी चव्हाण यांच्यावर विश्वास दाखवला आहे. राज्यात काँग्रेस तिस-या क्रमांकावर फेकला गेला असून काँग्रेससमोर राष्ट्रवादी काँग्रेसचे तगडे आव्हान आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करुन राज्यात काँग्रेससाठी अच्छे दिन आणण्याचे आव्हान चव्हाण यांच्यासमोर आहे.  तर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड झालेल्या संजय निरुपम यांना मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला यश मिळवून देण्याची खडतर परीक्षेला सामोरे जावे लागेल. 

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी अजय माकन, तेलंगण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी उत्तम रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.