शहरं
Join us  
Trending Stories
1
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
2
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
3
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
4
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद
5
फक्त ३,००० रुपये भरा आणि वर्षभर टोल फ्री प्रवास करा, १५ ऑगस्टपासून नवा नियम! फक्त 'या' वाहनांना लागू
6
Mahabharat: एखादी गोष्ट बायकांच्या पोटात राहत नाही, त्याला कारणीभूतआहे महाभारतातली 'ही' कथा!
7
IND vs ENG : एक धाव वाचवण्याच्या नादात 'मॅच विनर' खेळाडू कसोटीतून OUT; टीम इंडिया याचा फायदा उठवणार?
8
PM Kisan योजनेच्या २० व्या हप्त्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक; लाभार्थींच्या यादीत नाव आहे का चेक करा
9
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
10
चीनमुळे अनेक उद्योगांवर संकट, सामना करण्यासाठी आता भारताचा 'मास्टर प्लान', सरकार उचलणार पाऊल?
11
महाराष्ट्र बदलतोय : पैठणी ते कोल्हापुरी चप्पल, MSME उद्योगांची डिजिटल झेप!
12
२ पिढ्या पण ध्येय एकच! माय-लेकीच्या जोडीची दमदार कामगिरी, एकत्र पास केली NEET
13
दमदार इंजिन, शानदार मायलेज..; Honda ने लॉन्च केली स्वस्त स्पोर्ट्स बाईक, किंमत...
14
Powerful Air Forces : जगातील सगळ्यात ताकदवान हवाई दलं; भारत 'टॉप ५'मध्ये कितव्या स्थानावर?
15
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
16
रमीला ऑलिम्पिक दर्जा मिळणार, कोकाटेंना क्रीडा मंत्रालय देऊन सन्मानच; काँग्रेसचा महायुतीला चिमटा
17
Monsoon Recipe: तुम्ही कधी पंजाबी शिरा 'प्यायलात' का? ट्राय करा, पावसाळी आजारांवरचा चविष्ट उपाय!
18
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
19
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
20
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...

प्रदेशाध्यक्षपदी अशोक चव्हाण !

By admin | Updated: March 3, 2015 03:01 IST

पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसने राज्य नेतृत्वात फेरबदल करीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

काँग्रेसमध्ये फेरबदल : संजय निरुपम मुंबईचे प्रमुख मुंबई : लोकसभा आणि त्यापाठोपाठ झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसने राज्य नेतृत्वात फेरबदल करीत माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण यांची प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. तर मुंबई विभागीय काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे माजी खासदार संजय निरुपम यांच्याकडे सोपविली आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सोमवारी याबाबत घोषणा केली.उद्योगमंत्री, महसूलमंत्री, मुख्यमंत्री अशी यशस्वी कारकीर्द खात्यावर जमा असलेल्या खा. चव्हाणांची नियुक्ती ही पक्षापुढील आव्हाने पेलण्यासाठी सक्षम नेता या निकषातून झाली. उत्तम संघटक अशी ख्याती असलेले खा. चव्हाण पक्षाची पुनर्बांधणी करून कार्यकर्त्यांनी गमावलेला आत्मविश्वास परत मिळवून देतील, या अपेक्षेनेच पक्षनेतृत्वाने त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात सर्वत्र काँग्रेसची पडझड होत असताना अशोकरावांनी स्वत:च्या नांदेड मतदारसंघासह शेजारच्या हिंगोलीचा गड कायम राखला. कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, प्रशासकीय आणि संघटन कौशल्य, मराठीसह हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व ही त्यांची गुणवैशिष्ट्ये आहेत. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यानंतर खूप वर्षांनी मराठवाड्याकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यपक्ष आले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील याच प्रदेशातील असल्याने उभयतांची राजकीय जुगलबंदी यापुढे पाहायला मिळेल. अशोक चव्हाण यांची निवडी काँग्रेसला बळकटी देईल, असा विश्वास विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्षाला निश्चितच होईल. त्यामुळे राज्यातील पक्षसंघटना मजबूत होईल. (विशेष प्रतिनिधी)माणिकपर्व संपले!सर्वाधिक काळ प्रदेशाध्यक्षपदी राहिलेले माणिकराव ठाकरे यांची कारकिर्द अखेर संपुष्टात आली. २००८ साली ते प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सतत पक्षाला अपयश आले. २०१४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस पक्षाचे पानिपत झाले.सरकारवर ठेवू अंकुशपक्षासमोरील आव्हानांना सामोरे जातानाच राज्यात सकारात्मक विरोधकाची भूमिका पार पाडण्यावर आपला भर असणार आहे. केवळ विरोधाला विरोध ही काँग्रेसची भूमिका नाही, तर सरकारवर अंकुश लावण्याचे काम करणार.-अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्षराहुल गांधींच्या वाढत्या प्रभावानेच फेरबदलच्लोकसभा आणि त्यापाठोपाठच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसने पाच राज्यांमध्ये संघटनात्मक नेतृत्वात केलेले फेरबदल हे पक्षाचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या संभाव्य अधिकारवाढीचे सूचक लक्षण मानले जात आहे.च्राहुल यांना या सर्व ठिकाणी नवे प्रदेशाध्यक्ष हवे होते. ही अ.भा. काँग्रेस कार्यकारिणीतील बदलाची नांदी मानली जात आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या काँग्रेस कार्यकारिणीच्या अधिवेशनात पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपविली जाण्याची शक्यता आहे. नवे प्रदेशाध्यक्षदिल्ली : अजय माकन, महाराष्ट्र : अशोक चव्हाणजम्मू-काश्मीर : गुलाम अहमद मीर, गुजरात : भरतसिंग सोळंकी तेलंगणा : उत्तम रेड्डी नाराज राणेंची पक्षावर टीका ! : प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी झालेल्या अनुक्रमे अशोक चव्हाण आणि संजय निरुपण यांच्या निवडीवर आक्षेप घेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पक्षनेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. कार्य, कर्तृत्व आणि कामगिरी या बळावर काँग्रेसमध्ये नियुक्ती केली जात नाही, अशी थेट टीका करीत त्यांनी मुंबईत मराठी भाषिक नेत्याची निवड व्हायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त केली.