शहरं
Join us  
Trending Stories
1
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
2
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
3
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
4
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
5
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
6
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
7
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
8
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
9
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
10
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक
11
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे आयोजित रक्तदान कार्यक्रमाने रचले २ विश्वविक्रम
12
"तुम्ही लहान होतात, तुमच्या आई-वडीलांच्या सरकारमध्ये..."; नितीश यांनी तेजस्वी यादवांना सुनावलं
13
भारत-नेपाळ सीमेवर एसएसबी जवानांशी झटापट; गोळीबारात जवानाच्या डोक्यात लागली गोळी, हल्लेखोरही जखमी
14
'आम्हाला चुकीचे मृतदेह', अहमदाबाद विमान अपघाताबाबत ब्रिटिश कुटुंबांचा धक्कादायक दावा
15
बॉयफ्रेंडला धोका, उद्योगपतीशी लग्न... आता पतीपासून वेगळी राहते 'ही' बिग बॉस विनर?
16
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
17
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
18
पहिल्यांदाच शेअर वाटायची तयारी, दोन दिवसांत 40% हून अधिक वधारला हा शेअर, केलं मालामाल!
19
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी तरूणीला मारणारा गोकुळ झा, भाऊ रणजीत झा यांना २ दिवसांची पोलिस कोठडी
20
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- अशोक चव्हाण

By admin | Updated: July 26, 2015 02:02 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे,

नांदेड : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मांडली़.राधामोहनसिंह यांच्या विधानाचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत असून सभागृहातही त्याचा जाब विचारणार असल्याचे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या गंभीर विषय आहे़ त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरण, व्यसनाधिनता यामुळे होतात, असे विधान करतात़ केंद्रीय अहवालानुसार सर्वात जास्त २,५०० पेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत़ मात्र सभागृहात हा आकडा फक्त तीन सांगण्यात आला़ त्यावर मी सत्ताधाऱ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे़ त्यासाठी आंदोलनेही केली़, परंतु शासनाने मात्र अद्यापही दखल घेतलेली नाही, असेही ते म्हणाले.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफी द्यावी आणि त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी आमची भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देणारच नसल्याचे सांगितले़ यावरुन सरकारचा दृष्टिकोन असंवेदनशील असल्याचे दिसते़ त्याबाबत सभागृहात जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले़शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव, कर्जमाफी आदींबाबत निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देण्यात आली़ धनगर आरक्षणाच्या मुद्याचाही सरकारला विसर पडला आहे़, परंतु आश्वासनांची त्यांना वेळोवेळी आठवण करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कृत्रिम पाऊस पाडण्याच्या संदर्भात हालचाली सुरु असून त्यातून नांदेड जिल्हा वगळणार असल्याची माहिती आहे़ प्रत्यक्षात संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या संदर्भात तरी मराठवाड्यात असा भेदभाव करु नका़ सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग करावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे खा़ चव्हाण म्हणाले़. अगोदर राजीनामे नंतर चर्चाचर्चेविना संसदेचे कामकाज ठप्प असल्याच्या मुद्यावर खा़ चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनी अगोदर राजीनामे द्यावेत. त्यानंतर आम्ही चर्चेला तयार आहोत़ राजीनामे न देता आम्ही चर्चा करणे हे त्यांचे समर्थनच ठरेल़ काँग्रेसच्या काळात फक्त आरोपांवरुन अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते़