शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले- अशोक चव्हाण

By admin | Updated: July 26, 2015 02:02 IST

केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे,

नांदेड : केंद्रीय कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येसंदर्भात केलेले विधान संतापजनक असून केंद्रातील असंवेदनशील शासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे, असे टीकास्त्र माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़ अशोक चव्हाण यांनी मांडली़.राधामोहनसिंह यांच्या विधानाचा काँग्रेसतर्फे निषेध करण्यात येत असून सभागृहातही त्याचा जाब विचारणार असल्याचे चव्हाण यांनी पत्रपरिषदेत सांगितले. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या गंभीर विषय आहे़ त्यांना दिलासा देण्याऐवजी केंद्रीय कृषीमंत्री शेतकऱ्यांच्या आत्महत्या या प्रेमप्रकरण, व्यसनाधिनता यामुळे होतात, असे विधान करतात़ केंद्रीय अहवालानुसार सर्वात जास्त २,५०० पेक्षाही अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत़ मात्र सभागृहात हा आकडा फक्त तीन सांगण्यात आला़ त्यावर मी सत्ताधाऱ्यांना अभ्यास करण्याचा सल्ला दिला होता़ शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे़ त्यासाठी आंदोलनेही केली़, परंतु शासनाने मात्र अद्यापही दखल घेतलेली नाही, असेही ते म्हणाले.आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीने दिलासा मिळावा म्हणून कर्जमाफी द्यावी आणि त्यानंतर दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी आमची भूमिका आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी देणारच नसल्याचे सांगितले़ यावरुन सरकारचा दृष्टिकोन असंवेदनशील असल्याचे दिसते़ त्याबाबत सभागृहात जाब विचारणार असल्याचेही ते म्हणाले़शेतीमालाला उत्पादन खर्चावर भाव, कर्जमाफी आदींबाबत निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने देण्यात आली़ धनगर आरक्षणाच्या मुद्याचाही सरकारला विसर पडला आहे़, परंतु आश्वासनांची त्यांना वेळोवेळी आठवण करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)कृत्रिम पाऊस पाडण्याच्या संदर्भात हालचाली सुरु असून त्यातून नांदेड जिल्हा वगळणार असल्याची माहिती आहे़ प्रत्यक्षात संपूर्ण मराठवाड्यात दुष्काळ आहे़ त्यामुळे दुष्काळाच्या संदर्भात तरी मराठवाड्यात असा भेदभाव करु नका़ सर्वच जिल्ह्यांमध्ये हा प्रयोग करावा, अशी मागणीही शासनाकडे करणार असल्याचे खा़ चव्हाण म्हणाले़. अगोदर राजीनामे नंतर चर्चाचर्चेविना संसदेचे कामकाज ठप्प असल्याच्या मुद्यावर खा़ चव्हाण म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्यांनी अगोदर राजीनामे द्यावेत. त्यानंतर आम्ही चर्चेला तयार आहोत़ राजीनामे न देता आम्ही चर्चा करणे हे त्यांचे समर्थनच ठरेल़ काँग्रेसच्या काळात फक्त आरोपांवरुन अनेकांना राजीनामे द्यावे लागले होते़