शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

आषाढी यात्राः एकादशी सरली गर्दी ओसरली

By admin | Updated: July 16, 2016 21:12 IST

आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले

दीपक होमकर / ऑनलाइन लोकमत -
आता कोठे धावे मन
तुझे चरण देखिलिया !
भाग गेला, सीण गेला,
अवघा झाला आनंद !!
पंढरपूर, दि. 16 - आषाढी एकादशीच्या दिवशी पांडुरंगाचे चरणस्पर्श झाल्यानंतर अवघा शीण गेला आणि लाखो वारकरी आनंदाने पुन्हा परतीच्या प्रवासाला लागले. पण पांडुरंगाची पंढरी सोडून जाण्याची हुरहुरीने भाविकांचे मन दाटून आले.
 
आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरीत पंधरा लाखापेक्षा अधिक भाविक दाखल झाले होते मात्र दुसर्‍याच दिवशी त्यातील पन्नास टक्क्याहून अधिक भाविक दर्शन घेऊन गावाकडे परतले. त्यामुळे पंढरपूरात आज निम्मी गर्दी कमी झाली. शहरातील गर्दीकमी झाली असली तरी दर्शनाच्या रांगेत मात्र लाखावर भाविक उभे होते.  आज पहाटे  चार ते पाच यावेळेत मंदिराच्या वतीने नित्यपूजा करण्यात आली आणि केवळ एक तास दर्शनबारी थांबविण्यात आली. त्यामुळे एकादशीप्रमाणे भाविकांना चार-चार तास रांगेत ताटकळत रहावे लागले नाही आणि कालच्या तुलनेत आज व्दादशीला चार-पाच हजार जास्त भाविकांनी दर्शन घेतले.
 
काल रात्रभर राहुट्यांमध्ये भजन-किर्तन केल्यावर पहाटे चंद्रभागेचे स्नान करून काहींनी विठ्ठलाचे मुखदर्शन घेतले तर काहींनी कळसाचे दर्शन घेऊन सकाळपासूनच पंढरीचा निरोप घेण्यास सुरवात केली. त्यामुळे सकाळपासून एसटी स्थानक, रेल्वे स्टेशन येथे मोठी गर्दी वाढली होती.
 
एकादशी पेक्षा व्दादशीला अधिक जणांनी घेतले पददर्शन
एकादशी सुरु होण्याच्या आदल्या रात्री रात्री एक ते पहाटे पाच पर्यंत नित्यपूजा, शासकीय पूजा यासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते मात्र व्दादशीला केवळ पहाटे चार ते पाच या एका तासासाठीच मंदिर बंद ठेवण्यात आले. तुलनेेने तीन तास अधिकवेळ दर्शन सुरु असल्याने व्दादशीला सुमारे साडेआठ हजार भाविकांना अधिक दर्शन घेतले.
रात्रभर गरजली पंढरी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने काल पंढरपूरात आलेल्या बहुतांश भाविकांनी रात्री मुक्काम केला आणि मठांमध्ये, राहुट्यांमध्ये भजन-कीर्तन भारूडाचा आनंद घेतला. त्यामुळे पंढरपूर शहरात रात्रीही दूरदूर पर्यंत टाळांचा किनकिनाट, पखवाजाची थाप आणि हरीनामाचा गजराचा ध्वनी ऐकू येत होता. तर अनेक हौशी तरुण वारकर्‍यांनी रात्री महाव्दारासमोरील गर्दी कमी झाल्यावर वाजत गाजत भजन म्हणत नामदेव पायरीसमोर येऊन विविध खेळ खेळले आणि वारकरी सांप्रदायाच्या संस्कृतीचा आनंद लुटला.
 
आनंदाने मन अन खरेदीने बॅग भरली
वारीत आलेल्या वारकर्‍यांनी परत जाताना विठ्ठलाचा चिरमुरे बत्ताशाचा प्रसाद, विठ्ठलाचे फोटो, टाळ-मृदुंग-पेटी सारखी संगीत वाद्य, देवघरातील पितळी मुर्त्या, दगडी मुर्त्या, कुंकू, उदबत्त्या आणि घरातील लहानग्यांसाठी खेळणी अशी भरपूर खरेदी मोकळ्‌या हातांनी केली. त्यामुळे जाताना वारकर्‍यांचे मन जसे आनंदाने भरले तसेच त्यांच्या बॅगाही खरेदीने भरल्या होत्या