शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आषाढी वारी : माऊलीच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

By admin | Updated: July 5, 2016 17:58 IST

ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़

बाळासाहेब बोचरे

लोणंद, दि. ५ : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड हरिनामाची पेरण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़दोन दिवस सतत पडणारा पाऊस सोसत मंगळवारी ११ वाजता पालखी सोहळा निरानदीकाठी दुपारच्या विसाव्याला थांबला होता़ पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० किमीचा महत्वाचा टप्पा पार केला़ पालखीला निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव आले होते़ पुणे जिल्ह्यातील पालखीच्या प्रवासाबद्दल आणि अडचणीबद्दल त्यांनी पालखी व्यवस्थापन व वारकऱ्यांशी चर्चा केली़सातारा जिल्ह्यात वारकऱ्यांचे चैतन्यज्या गुरू हैवतबाबांनी पालखी सोहळा सुरू केला़ त्यांच्या सातारा पुण्यभूमीत मंगळवारी वारकऱ्यांनी पाऊल ठेवताच त्यांच्यामध्ये वेगळेच चैतन्य फुलले़ निरा नदीपार करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना वारकऱ्यांनी एका वेगळ्या उत्साहात नाचत नाचत हरीनामात तल्लीन होत सातारा जिल्ह्यात पहिला मुक्काम असलेल्या लोणंद केव्हा गाठले हे कळलेही नाही़ जेजुरी ते लोणंदपर्यंत रस्ता अरूंद आणि चिखलमय असला तरी वारकऱ्यांनी आनंदाने पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला़उद्या उभे रिंगण सोहळाबुधवार ६ जुलै रोजी पालखी सोहळा लोणंद मधून निघणार असून सायंकाळी तरडगावच्या मुक्कामी जाणारआहे़ दरम्यान चांदोबाचा लिंब येथे या सोहळ्यातील पहिले रिंगण सोहळा होणारआहे़सातारा जिल्ह्यात उत्साही स्वागतपुण्याच्या पुरंदर तालुक्यातून साताऱ्यांच्या खंडाळी तालुक्यात मंगळवारी माऊलीच्या प्रवेश केला़ पडिगाव येथे पालखीच्या स्वागताला आ़ मकरंद पाटील, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जि़प़अध्यक्ष रवी साळुंखे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन पाटील आदी उपस्थित होते़ पाडेगावच्या समता आश्रमशाळेच्या मुलांनी लेझीम आणि झांजच्या तालावर माऊलीचे स्वागत केले़ पर्यावरणाचा संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते़ शौचालये कुचकामीपालखी सोहळ्यात निर्मलवारीच्या नावाखाली ५०० फिरती शौचालये पाठविण्यात आली आहेत़ पण कुठे गरज आहे आणि कुठे थांबायला हवे याबाबत शौचालय वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकांना योग्य मार्गदर्शन न केल्याने ते कुठेही थांबत असल्याचे आढळून आले़ याबाबत बाळासाहेब चोपदार यांनी चिंता व्यक्त केली़ यावेळी सौरभ राव याबाबत आढावा घेतला जाईल असे सांगितले़