शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

आषाढी वारी : माऊलीच्या पालखीचा सातारा जिल्ह्यात प्रवेश

By admin | Updated: July 5, 2016 17:58 IST

ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़

बाळासाहेब बोचरे

लोणंद, दि. ५ : ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता अखंड हरिनामाची पेरण करत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीने मंगळवारी गुरू हैबतबाबा यांच्या सातारा या पुण्यभूमीत प्रवेश केला़ तत्पुर्वी माऊलीच्य पादुकांना निरानदीत स्नान घालण्यात आले़दोन दिवस सतत पडणारा पाऊस सोसत मंगळवारी ११ वाजता पालखी सोहळा निरानदीकाठी दुपारच्या विसाव्याला थांबला होता़ पुणे जिल्ह्यातील सुमारे १०० किमीचा महत्वाचा टप्पा पार केला़ पालखीला निरोप देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव आले होते़ पुणे जिल्ह्यातील पालखीच्या प्रवासाबद्दल आणि अडचणीबद्दल त्यांनी पालखी व्यवस्थापन व वारकऱ्यांशी चर्चा केली़सातारा जिल्ह्यात वारकऱ्यांचे चैतन्यज्या गुरू हैवतबाबांनी पालखी सोहळा सुरू केला़ त्यांच्या सातारा पुण्यभूमीत मंगळवारी वारकऱ्यांनी पाऊल ठेवताच त्यांच्यामध्ये वेगळेच चैतन्य फुलले़ निरा नदीपार करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करताना वारकऱ्यांनी एका वेगळ्या उत्साहात नाचत नाचत हरीनामात तल्लीन होत सातारा जिल्ह्यात पहिला मुक्काम असलेल्या लोणंद केव्हा गाठले हे कळलेही नाही़ जेजुरी ते लोणंदपर्यंत रस्ता अरूंद आणि चिखलमय असला तरी वारकऱ्यांनी आनंदाने पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला़उद्या उभे रिंगण सोहळाबुधवार ६ जुलै रोजी पालखी सोहळा लोणंद मधून निघणार असून सायंकाळी तरडगावच्या मुक्कामी जाणारआहे़ दरम्यान चांदोबाचा लिंब येथे या सोहळ्यातील पहिले रिंगण सोहळा होणारआहे़सातारा जिल्ह्यात उत्साही स्वागतपुण्याच्या पुरंदर तालुक्यातून साताऱ्यांच्या खंडाळी तालुक्यात मंगळवारी माऊलीच्या प्रवेश केला़ पडिगाव येथे पालखीच्या स्वागताला आ़ मकरंद पाटील, आनंदराव पाटील, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, जि़प़अध्यक्ष रवी साळुंखे, जि़प़चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश देशमुख, खंडाळा पंचायत समिती सभापती नितीन पाटील आदी उपस्थित होते़ पाडेगावच्या समता आश्रमशाळेच्या मुलांनी लेझीम आणि झांजच्या तालावर माऊलीचे स्वागत केले़ पर्यावरणाचा संदेश देणारे फलक त्यांच्या हातात होते़ शौचालये कुचकामीपालखी सोहळ्यात निर्मलवारीच्या नावाखाली ५०० फिरती शौचालये पाठविण्यात आली आहेत़ पण कुठे गरज आहे आणि कुठे थांबायला हवे याबाबत शौचालय वाहतुक करणाऱ्या ट्रक चालकांना योग्य मार्गदर्शन न केल्याने ते कुठेही थांबत असल्याचे आढळून आले़ याबाबत बाळासाहेब चोपदार यांनी चिंता व्यक्त केली़ यावेळी सौरभ राव याबाबत आढावा घेतला जाईल असे सांगितले़