शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

आदिवासी विद्यार्थ्यांची कलाकृती; बांबूपासून अप्रतिम राख्या!

By admin | Updated: August 14, 2016 20:26 IST

अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, त्यानी बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत.

कृषी विद्यापीठाने दिले प्रशिक्षण; विद्यार्थ्यांच्या राख्यांचे आज अकोल्यात प्रदर्शन
 
अकोला : कौशल्य अंगी असेल तर कामाची वानवा नाही, अशी अनेक उदाहरणं जगात आहेत. म्हणूनच शासनदेखील किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम प्रशिक्षणावर भर देत आहे. आदिवसीमध्ये उपजतच कलागुण आहेत. या कलागुणांना वाव देण्यासाठी अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, राखी पौर्णिमेचा सण पाहता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाळ जोडत बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील मुख्यालयात या राख्यांचे प्रदर्शन भरवले जात आहे.
बांबूपासून बनवलेल्या राख्या यावर्षी रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून, मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचा त्यामध्ये समावेश असेल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत मेळघाटातील धारणी येथे मागील दोन वर्षांपूर्वी या भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषितंत्र विद्यालय सुरू  केले आहे. येथे विद्यार्थ्यांना वेगवेगळे तंत्रज्ञान प्रशिक्षण, शिक्षण देण्यात येत आहे. येथील ४० आदिवासी विद्यार्थ्यांनी १३ ते १४ आॅगस्ट या दोन दिवसीय राखी व हस्तकला प्रशिक्षण घेतले असून, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा येथे बांबू केंद्र आहे. येथे विद्यार्थ्यांना हस्तकला व बांबूपासून राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. राखीसोबतच बांबूपासून महिलांना वेणीला लावण्यात येणारे किल्पस, चिमटा व इतर साहित्य तयार केले आहे. 
 धारणी येथील कृषितंत्र विद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.आर.टी. रघुवंशी, डॉ.एस.के. बुुरघाटे, कृषी सहायक नीलेश भगत आणि  तुषार कानडी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रशिक्षणात प्रथम आणि व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
- मेळघाटात रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न
आदिवासी बांधवामध्ये उपजत कलागुण आहेत. त्या कलागुणांचा वापर रोजगारनिर्मिती केल्यास मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी, येथील नागरिक यांना रोजगार उपलब्ध होईल. परिणामी त्यांचे शहराकडे होेणारे स्थलांतर थांबेल. त्यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी येथे कृषितंत्र विद्यालय सुरू  केले आहे. येथील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.
 
 
निसर्गाशी नाळ जोडत आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्रतिम राख्या व इतर साहित्य तयार केले आहे. त्यांच्या या निसर्ग वस्तूंचे १५ आॅगस्टला कृषी विद्यापीठात प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
डॉ. किशोर बिडवे,
 कुलगुरू चे तांत्रिक सचिव,
डॉ. पंदेकृवि, अकोला.