शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

आदिवासी विद्यार्थ्यांची कलाकृती; बांबूपासून अप्रतिम राख्या!

By admin | Updated: August 14, 2016 20:26 IST

अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, त्यानी बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत.

कृषी विद्यापीठाने दिले प्रशिक्षण; विद्यार्थ्यांच्या राख्यांचे आज अकोल्यात प्रदर्शन
 
अकोला : कौशल्य अंगी असेल तर कामाची वानवा नाही, अशी अनेक उदाहरणं जगात आहेत. म्हणूनच शासनदेखील किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम प्रशिक्षणावर भर देत आहे. आदिवसीमध्ये उपजतच कलागुण आहेत. या कलागुणांना वाव देण्यासाठी अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठानेही मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, राखी पौर्णिमेचा सण पाहता प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी निसर्गाशी नाळ जोडत बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत. स्वातंत्र्यदिनी कृषी विद्यापीठाच्या अकोला येथील मुख्यालयात या राख्यांचे प्रदर्शन भरवले जात आहे.
बांबूपासून बनवलेल्या राख्या यावर्षी रक्षाबंधनासाठी बाजारात येत असून, मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्यांचा त्यामध्ये समावेश असेल. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत मेळघाटातील धारणी येथे मागील दोन वर्षांपूर्वी या भागातील विद्यार्थ्यांसाठी कृषितंत्र विद्यालय सुरू  केले आहे. येथे विद्यार्थ्यांना वेगवेगळे तंत्रज्ञान प्रशिक्षण, शिक्षण देण्यात येत आहे. येथील ४० आदिवासी विद्यार्थ्यांनी १३ ते १४ आॅगस्ट या दोन दिवसीय राखी व हस्तकला प्रशिक्षण घेतले असून, अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील लवादा येथे बांबू केंद्र आहे. येथे विद्यार्थ्यांना हस्तकला व बांबूपासून राखी बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. राखीसोबतच बांबूपासून महिलांना वेणीला लावण्यात येणारे किल्पस, चिमटा व इतर साहित्य तयार केले आहे. 
 धारणी येथील कृषितंत्र विद्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.आर.टी. रघुवंशी, डॉ.एस.के. बुुरघाटे, कृषी सहायक नीलेश भगत आणि  तुषार कानडी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रशिक्षणात प्रथम आणि व्दितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
- मेळघाटात रोजगार निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न
आदिवासी बांधवामध्ये उपजत कलागुण आहेत. त्या कलागुणांचा वापर रोजगारनिर्मिती केल्यास मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी, येथील नागरिक यांना रोजगार उपलब्ध होईल. परिणामी त्यांचे शहराकडे होेणारे स्थलांतर थांबेल. त्यादृष्टीने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने दोन वर्षांपूर्वी येथे कृषितंत्र विद्यालय सुरू  केले आहे. येथील विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.
 
 
निसर्गाशी नाळ जोडत आदिवासी विद्यार्थ्यांनी अप्रतिम राख्या व इतर साहित्य तयार केले आहे. त्यांच्या या निसर्ग वस्तूंचे १५ आॅगस्टला कृषी विद्यापीठात प्रदर्शन भरविण्यात येत आहे.
डॉ. किशोर बिडवे,
 कुलगुरू चे तांत्रिक सचिव,
डॉ. पंदेकृवि, अकोला.