शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

एक्सप्रेस वेच्या 'गोल्डन अवर्स'साठी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रीम वाहतूक कोंडी

By admin | Updated: September 18, 2016 19:02 IST

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली अवजड वाहने रोखून धरण्याच्या प्रकारामुळे

ऑनलाइन लोकमत
लोणावळा : दि. १८ (वार्ताहर) - मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली अवजड वाहने रोखून धरण्याच्या प्रकारामुळे आज एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी नव्हती. मात्र,  मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमय होते, असं उलटं चित्र पहायला मिळालं. राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या रांगा दोन ते तीन किमी अंतरापर्यत गेल्यानंतर मात्र महामार्ग पोलीसांची तारांबळ उडाली व सर्व फौजफाटा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दाखल झाला. लोणावळा शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे तसेच या मार्गावरुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांचे या कोंडीमुळे प्रचंड हाल झाले. दुपारी 3 वाजता झालेली ही वाहतूक कोंडी तीन तासांनंतरही कायम असून जवळपास 3 किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
 मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महामार्ग पोलीसांनी गोल्डन अवर्सच्या नावाखाली सकाळी व संध्याकाळी काही तास एक्सप्रेस वेवरील अवजड वाहने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक कसलेही नोटिफिकेशन न काढता ऐवढा मोठा निर्णय महामार्ग पोलीसांनी कशाच्या आधारे घेतला हा वेगळा मुद्दा असला तरी महामार्ग पोलीसांच्या या गोल्डन अवर्स संकल्पनेमुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वर कमालीची वाहतूक कोंडी होऊ लागली असून त्यांचा त्रास स्थानिक नागरिक, वाहतूकदार व चाकरमन्यांना होऊ लागला आहे. एक्सप्रेस वेवरील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर कृत्रीम वाहतूक कोंडी निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. 
 मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकीचा ताण कमी करण्यासाठी एक्सप्रेस वेची निर्मीती करण्यात आली असताना आता पुन्हा राष्ट्रीय महामार्गावर वाहने थांबवत कोंडी करण्याचा प्रयत्न जाणीवपुर्वक केला जाऊ लागला आहे. एक्सप्रेस वेवरील अपघात व कोंडी रोखण्यात महामार्ग पोलीस व संबंधित यंत्रणांना अपयश आले आहे ते अपयश लपविण्यासाठी ही अनोखी शक्कल महामार्ग पोलीसांनी लढवली असल्याची टीका आजची वाहतूक कोंडी पाहून नागरिकांनी केली आहे. याबाबत खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित पाटील यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. पण एकंदरीतच पोलीसांची ही शक्कल त्यांच्या अंगलट आली असून त्यांचा नाहक त्रास स्थानिक रहिवाशांना भोगावा लागतो आहे.