शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

यंदा कृत्रिम पाऊस बरसणार नाही

By admin | Updated: June 15, 2016 03:36 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे़२००९ मध्ये मुंबईला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागला होता़ पारंपरिक पद्धतीने जमा होणाऱ्या जलसाठ्यावर अवलंबून राहणे धोकादायक असल्याचे समोर आले़ त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता़ जमीन व हवेतून वरुणराजाला तलाव क्षेत्रांकडे आणण्याचे प्रयोग झाले़ मात्र, करोडो रुपये उडवूनही ‘खोटा’ पाऊस पडल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नाही़ अखेर पालिकेने भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि हवामान तज्ज्ञ जे़आऱ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी पाणलोट क्षेत्रातील १५ वर्षांच्या पावसाच्या परिमाणाचे विश्लेषण करून ढगांच्या बीजीकरणाद्वारे पाऊस पाडण्याची गरज नाही, अशी शिफारस केली आहे़ हा प्रयोगही खर्चीक असल्याने पालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी )1972 मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा पहिला प्रयोग झाला होता़ मात्र, तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते़ 2009मध्ये रसायनांचा धूर व विमानातून रसायनांची फवारणी करून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता़मात्र, या प्रयोगामुळे तलाव क्षेत्रात किती पाऊस झाला, याची मोजदाद करण्यासाठी कोणतेच यंत्र नाही़ त्यामुळे या प्रयोगाच्या यशाबाबत साशंकताच आहे़2013मध्ये शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात ढगांचे बीजीकरण करून खोटा पाऊस पाडण्यात येणार होता़ यासाठी आयआयटीएमला पाचारण करण्यात आले होते़