शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यंदा कृत्रिम पाऊस बरसणार नाही

By admin | Updated: June 15, 2016 03:36 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये जेमतेम १२ टक्के जलसाठा शिल्लक आहे़ पाणीटंचाई व उष्म्यामुळे हैराण मुंबईकर मान्सूनच्या प्रतीक्षेत असताना, या वर्षी अपुरा पाऊस झाला, तरी कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे़२००९ मध्ये मुंबईला भीषण पाणीटंचाईशी सामना करावा लागला होता़ पारंपरिक पद्धतीने जमा होणाऱ्या जलसाठ्यावर अवलंबून राहणे धोकादायक असल्याचे समोर आले़ त्यानंतर कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता़ जमीन व हवेतून वरुणराजाला तलाव क्षेत्रांकडे आणण्याचे प्रयोग झाले़ मात्र, करोडो रुपये उडवूनही ‘खोटा’ पाऊस पडल्याचे खात्रीपूर्वक सांगता येत नाही़ अखेर पालिकेने भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्था आणि हवामान तज्ज्ञ जे़आऱ कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला़ त्यांनी पाणलोट क्षेत्रातील १५ वर्षांच्या पावसाच्या परिमाणाचे विश्लेषण करून ढगांच्या बीजीकरणाद्वारे पाऊस पाडण्याची गरज नाही, अशी शिफारस केली आहे़ हा प्रयोगही खर्चीक असल्याने पालिकेने कृत्रिम पावसाचा प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला आहे़ (प्रतिनिधी )1972 मध्ये कृत्रिम पाऊस पाडण्याचा पहिला प्रयोग झाला होता़ मात्र, तेव्हा तंत्रज्ञान विकसित नव्हते़ 2009मध्ये रसायनांचा धूर व विमानातून रसायनांची फवारणी करून कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता़मात्र, या प्रयोगामुळे तलाव क्षेत्रात किती पाऊस झाला, याची मोजदाद करण्यासाठी कोणतेच यंत्र नाही़ त्यामुळे या प्रयोगाच्या यशाबाबत साशंकताच आहे़2013मध्ये शहापूर तालुक्यातील तलाव क्षेत्रात ढगांचे बीजीकरण करून खोटा पाऊस पाडण्यात येणार होता़ यासाठी आयआयटीएमला पाचारण करण्यात आले होते़