शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

कृत्रिमपणे फळे पिकवण्यावर निर्बंध

By admin | Updated: February 11, 2016 01:31 IST

इंजेक्शन देऊन कच्ची फळे पिकवण्याने आरोग्याला धोका निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने अशाप्रकारे कृत्रिमपणे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध घाला, अशी सूचना राज्य

मुंबई : इंजेक्शन देऊन कच्ची फळे पिकवण्याने आरोग्याला धोका निर्माण झाल्याने उच्च न्यायालयाने अशाप्रकारे कृत्रिमपणे फळे पिकवण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंध घाला, अशी सूचना राज्य सरकारला केली. यासाठी काय पावले उचलणार? अशीही विचारणा उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे केली.दुधात भेसळ होत असल्याचा आरोप करत कर्नल चंद्रशेखर उन्नी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. बुधवारच्या सुनावणीवेळी खंडपीठाने खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करण्याचे प्रमाण वाढले आहे, अशी चिंता व्यक्त करत फळांनाही इंजेक्शन देऊन पिकवण्यात येत असल्याने याला कशाप्रकारे प्रतिबंध घालणार? अशी विचारणा केली. दूध भेसळीवर बोलताना खंडपीठाने सरकारचे कान टोचले. ‘दीड कोटी नागरिकांसाठी दूधातील भेसळ तपासण्यासाठी एकच मोबाईल व्हॅन कशी? १० हजार नागरिकांसाठी केवळ एक अन्नसुरक्षा अधिकारी? मोबाईल व्हॅन आणि अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची संख्या वाढवा. तसेच या व्हॅनमध्ये केवळ अन्नातील भेसळ तपासण्यासाठी साधने ठेवू नका. दुधाशिवाय अन्य भेसळ तपासण्यासाठी साधने उपलब्ध करा. जास्त धाडी घाला. जनजागृती करा,’ अशीही सूचना सरकारला केली. डेअरीमध्ये मिळणाऱ्या सुट्या दुधावरही प्रतिबंध घाला, असेही खंडपीठाने म्हटले. (प्रतिनिधी)