शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

कलम ३७० वरून सेनेचे सरकारला चिमटे

By admin | Updated: March 3, 2015 00:43 IST

जम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीजम्मू-काश्मीर सत्ता स्थापनेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रसंगी कलम ३७० सारखा पारंपरिक मुद्दा बाजूला ठेवून तडजोड करणाऱ्या भाजपवर मित्र पक्षांकडून जोरदार टीका होत आहे़ सोमवारी केंद्रात व महाराष्ट्रात भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनने यानिमित्ताने मोदी सरकारला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न केले़ जम्मू- काश्मिरात कलम ३७० बाबत सरकारने काय कारवाई केली? असा खोचक प्रश्न सेनेने राज्यसभेत उपस्थित केला़राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावाच्या चर्चेच्या क्रमात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकारला घेरले़ राऊत यांनी मोदी सरकारला सर्वांसाठी समान नागरी कायदा व कलम ३७० चे स्मरण करून दिले़ अभिभाषण सरकारने केलेल्या किंवा भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्यांची प्रस्तावना-आराखडा असते, असे सांगत ते म्हणाले की, कायदा आणि राज्यघटनेनुसार सर्वांकडे समान भावनेतून बघितले गेले पाहिजे, हे समान नागरी कायद्याचे मूळ तत्त्व आहे़ आम्ही सर्व सरकारच्या ‘सबका साथ, सबका विकास’सोबत आहोत आणि सरकारवर आमचा पूर्ण विश्वास आहे़ मात्र देशातील विविध भागांत शरणार्थ्यांचे जीवन जगणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या समस्या, त्यांची घरवापसी याबाबतही सरकारने ठोस पावले उचलायला हवीत़४जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याची भाजपाची पूर्वापार मागणी राहिलेली आहे़ मात्र जम्मू-काश्मिरात पीडीपीसोबत सत्तेत सहभागी होताना भाजपाने कलम ३७० चा मुद्दा थंडबस्त्यात टाकला आहे़