शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
2
"गोपीनाथ मुंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, पण..."; पंकजा मुंडे दसरा मेळाव्यात स्पष्टच बोलल्या
3
Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?
4
'आग तो लगी थी घर में...."; धनंजय मुंडेंनी शायरीतून भावना व्यक्त केली, मंत्रिपदाबाबत खंतही बोलून दाखवली
5
२ घास कमी खा पण स्वाभिमानाने राहा, कुणाचे तुकडे उचलू नका; पंकजा मुंडेंचं मेळाव्यात आवाहन
6
कराड आमचे दैवत...; पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यात झळकले वाल्मिक कराडचे पोस्टर
7
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ; गुंतवणूकदारांनी मात्र टाळाव्यात 'या' ५ चुका
8
"खोटे धंदे करू नका, गुंड पाळू नका, काही गरज नाही", पंकजा मुंडे भगवान गडावर काय बोलल्या?
9
Jasprit Bumrah: जसप्रीत बुमराहचा मोठा पराक्रम, घरच्या मैदानावर 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
७५ वर्षांचा नवरा अन् ३५ वर्षांची नवरी! लग्नाच्या रात्रीच पतीचा मृत्यू; गूढ उलगडलं, समोर आलं सत्य
11
१९ वर्षे शनि, १८ वर्षे राहु महादशा: शनि महादशेत राहु अंतर्दशा आली? भाग्योदय; अपार पैसा-लाभ!
12
अभिनेता विजयला सोबत घेण्याचा भाजपाचा प्रयत्न; चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर समोर आली नवीन रणनीती
13
Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?
14
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
15
डोक्याला ताप! दिवसभर इन्स्टाग्रामवर रील बनवायची बायको; नवरा ओरडल्यावर मुलासह गायब
16
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
17
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
18
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
19
"बेबी, स्वीटी, तू माझ्यासोबत...!" विद्यार्थीनीसोबत एवढ्या घाणेरड्या गप्पा, समोर आलं चैतन्यानंदचं घृणास्पद चॅट
20
IMD: बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ धडकणार; ओडिशा किनारपट्टीला धोका!

-तर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करणार!

By admin | Updated: December 23, 2014 00:38 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात न आल्याच्या प्रकरणाला राज्य शासनाने अतिशय गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणातील दोषी महाविद्यालये आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

ओबीसी शुल्क प्रतिपूर्तीबाबत शासन गंभीर : अडीचशे कोटी रुपयांची तरतूद नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात न आल्याच्या प्रकरणाला राज्य शासनाने अतिशय गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणातील दोषी महाविद्यालये आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा साामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत केली. आकाश फुंडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. फुंडकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षातील इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील असंख्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त न झाल्याने त्यांच्याकडून शुल्क वसुल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर शासनातर्फे सांगण्यात आले की, एकूण ५२ विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती अडकलेली आहे. हे सर्व प्रकरण महाविद्यालयीना स्तरावर अडकून आहेत. शासनातर्फे संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल. महाविद्यालयांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्यास अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल करण्यात येईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी यासंबंधात दोषी सचिवांवरही अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील यांनी या घोषणेवर आक्षेप घेत सांगितले की, हा मदत निधी शासनाकडूनच वितरित होत नाही. अनेक महाविद्यालयांनी शुल्क भरलेले नाही. अशा परिस्थितीत सरकार किती महाविद्यालयांवर कारवाई करणार. ही समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागांची एक बैठक घ्यावी, आणि ही घोषणा मागे घेण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सुद्धा राज्यातील किती विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती शिल्लक आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर सभागृहात वादळ उभे होत असल्याचे लक्षात येताच उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शासनाची बाजू मांडतांना सांगितले की, तीन वर्षांपासून हा निधी पेंडिंग आहे. यासाठी हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पूरक मागण्यांमध्ये अडीचशे कोटी रुपयांचा निधीची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. राज्यमंत्री कांबळे यांनीसुद्धा ओबीसींच्या हितासाठी बैठक घेऊन समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)