शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

-तर ‘अ‍ॅट्रॉसिटी’ दाखल करणार!

By admin | Updated: December 23, 2014 00:38 IST

ओबीसी विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात न आल्याच्या प्रकरणाला राज्य शासनाने अतिशय गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणातील दोषी महाविद्यालये आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा

ओबीसी शुल्क प्रतिपूर्तीबाबत शासन गंभीर : अडीचशे कोटी रुपयांची तरतूद नागपूर : ओबीसी विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती करण्यात न आल्याच्या प्रकरणाला राज्य शासनाने अतिशय गंभीरतेने घेतले आहे. या प्रकरणातील दोषी महाविद्यालये आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी घोषणा साामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज विधानसभेत केली. आकाश फुंडकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. फुंडकर यांनी बुलडाणा जिल्ह्यातील तंत्रनिकेतन तसेच अभियांत्रिकी महाविद्यालयातील सन २०१२-१३ आणि २०१३-१४ या वर्षातील इतर मागासवर्गीय या प्रवर्गातील असंख्य विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती शासनाकडून प्राप्त न झाल्याने त्यांच्याकडून शुल्क वसुल करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर शासनातर्फे सांगण्यात आले की, एकूण ५२ विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती अडकलेली आहे. हे सर्व प्रकरण महाविद्यालयीना स्तरावर अडकून आहेत. शासनातर्फे संबंधित महाविद्यालयांना पत्र पाठविण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल. महाविद्यालयांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केल्यास अ‍ॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हासुद्धा दाखल करण्यात येईल. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ सदस्य छगन भुजबळ यांनी यासंबंधात दोषी सचिवांवरही अ‍ॅट्रॉसिटी दाखल करणार का? असा प्रश्न उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील यांनी या घोषणेवर आक्षेप घेत सांगितले की, हा मदत निधी शासनाकडूनच वितरित होत नाही. अनेक महाविद्यालयांनी शुल्क भरलेले नाही. अशा परिस्थितीत सरकार किती महाविद्यालयांवर कारवाई करणार. ही समस्या सोडविण्यासाठी सर्व विभागांची एक बैठक घ्यावी, आणि ही घोषणा मागे घेण्याची विनंती सुद्धा त्यांनी केली. सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य गणपतराव देशमुख यांनी सुद्धा राज्यातील किती विद्यार्थ्यांची शुल्क प्रतिपूर्ती शिल्लक आहे, असा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नावर सभागृहात वादळ उभे होत असल्याचे लक्षात येताच उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शासनाची बाजू मांडतांना सांगितले की, तीन वर्षांपासून हा निधी पेंडिंग आहे. यासाठी हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या पूरक मागण्यांमध्ये अडीचशे कोटी रुपयांचा निधीची तरतूदसुद्धा करण्यात आली आहे. राज्यमंत्री कांबळे यांनीसुद्धा ओबीसींच्या हितासाठी बैठक घेऊन समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.(प्रतिनिधी)