शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

साहित्याला दिशा देणे हाच संमेलनाध्यपदाचा निकष हवा- अरुणा ढेरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 01:57 IST

साहित्य वर्तुळातील अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहीन. या काळात साहित्य विश्वासाठी अधिकाधिक चांगले काम होईल यासाठी कायमच बांधील असेन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

मुंबई : मराठी साहित्यविश्वाची समृद्धी वाढविणारी आणि साहित्यविश्वाला सर्वार्थाने दिशा देणारी व्यक्ती हाच संमेलनाध्यक्षपदाचा निकष असावा, असे मत ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नवनियुक्त अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक अरुणा ढेरे यांनी रविवारी मांडले. संमेलनाध्यक्षपदी निवडी झाल्यानंतर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.संमेलनाध्यक्षाचे पद निवडणुकीशिवाय सन्मानाने दिले जावे, या महामंडळाच्या निर्णयाचा आनंद होताच. मात्र मराठी साहित्य विश्वाची समृद्ध परंपरा पुढे नेणारी एक प्रतिनिधी म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे सोपविली आहे, याचा आनंद झाला आहे. ती जबाबदारी पुढे नेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. साहित्य वर्तुळातील अपेक्षांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहीन. या काळात साहित्य विश्वासाठी अधिकाधिक चांगले काम होईल यासाठी कायमच बांधील असेन, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.१८ वर्षांनी संमेलनाध्यक्षपदी स्त्री प्रतिनिधीची नेमणूक झाली आहे, याविषयी ढेरे म्हणाल्या, स्त्री किंवा पुरुष यापेक्षा साहित्य विश्वाला केंद्रस्थानी मानून त्यासाठी कार्य करणारी व्यक्ती संमेलनाध्यक्षपदी असावी, अशी कायम अपेक्षा होती. साहित्य क्षेत्रात स्त्री साहित्यिका, त्यांचे साहित्य कमी नाही. सध्या तरुणपिढीतील अनेक साहित्यिका उत्तम लिहित आहेत, त्यांचे लिखाण आश्वासक आहे. त्यांची प्रतिनिधी म्हणून हा मान मिळाल्याचे मी मानते.विपुल ग्रंथसंपदाढेरे यांचे एम.ए. तसेच पीएच.डी. पर्यंतचे शिक्षण पुण्यात झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या अरुणा ढेरे ह्या कन्या होत. बालपणापासून साहित्याचे आणि समीक्षेची वैचारिक पार्श्वभूमी त्यांना लाभली आहे.डॉ. ढेरे या पुणे विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील विद्यावाचस्पती म्हणजेच डॉक्टरेट आहेत. पुणे विद्यापीठात त्यांनी प्राध्यापिका म्हणून इ.स.१९८३ ते ८८ या काळात काम केले आहे. ‘कृष्णकिनारा’ हा त्यांचा कथा संग्रह विशेष गाजला आहे.प्रकाशित साहित्य : वैचारिक पुस्तके, अंधारातील दिवे, उंच वाढलेल्या गवताखाली, उमदा लेखक उमदा माणूस, उर्वशी, कवितेच्या वाटेवर, काळोख आणि पाणी, कवितेच्या वाटेवर, जाणिवा जाग्या होताना, जावे जन्माकडे, त्यांची झेप त्यांचे अवकाश, पावसानंतरचं ऊन, प्रकाशाचे गाणे, प्रतिष्ठेचा प्रश्न, प्रेमातून प्रेमाकडे, महाद्वार, लोक आणि अभिजात, लोकसंस्कृतीची रंगरूपे, विवेक आणि विद्रोह, डॉ. विश्राम रामजी घोले आणि त्यांचा परिवार.कविता संग्रह : निरंजन, प्रारंभ, मंत्राक्षर, यक्षरात्र, बंद अधरो से (हिंदी)कथासंग्रह : अज्ञात झऱ्यावर, काळोख आणि पाणी, कृष्णकिनारा, नागमंडल, प्रेमातून प्रेमाकडे, मन केले ग्वाही, मनातलं आभाळ, मैत्रेय, रूपोत्सव, लावण्ययात्रा, वेगळी माती, वेगळा वास.पुरस्कार/सन्मान- अमेरिकेतील डॉ. लाभसेटवार साहित्य सन्मान.- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार- लोकशाहीर विठ्ठल उमप पुरस्कार- पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठानचा पुरस्कार (६ मे २०१६)- मसापचा २०१७ सालचा ग्रंथ पुरस्कार - ‘स्त्री-लिखित मराठी कविता’ या पुस्तकाला- मृत्युंजय प्रतिष्ठानतर्फे शिवाजी सावंत साहित्य पुरस्कार (१८-९-२०१७)- ग्रंथ निवड समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. (सन २०१७पासून)

टॅग्स :Aruna Dhereअरुणा ढेरेliteratureसाहित्य