शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

अर्नाळा किल्ला ग्रा.पं.च्या सरपंचाचे पद गेले

By admin | Updated: July 13, 2017 03:35 IST

कोकण आयुक्तांनी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांची हकालपट्टी करून त्यांचे ग्रा.पं. सदस्यत्वही रद्द केले आहे

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : निर्मल भारत अभियानात शौचालयाच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून कोकण आयुक्तांनी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंचांची हकालपट्टी करून त्यांचे ग्रा.पं. सदस्यत्वही रद्द केले आहे. तर सदस्य असताना लाभ मिळवल्याचा ठपका ठेवून कांता अमृत म्हात्रे यांचे सदस्यत्व ही रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाला धक्का बसला आहे. पंधरा दिवसांपूर्वी भाजपाने अर्नाळा ग्रामपंचायतीत बहुजन विकास आघाडीत फूट पाडून सरपंच पद पटकावले होते. आता पंचायत समितीच्या सभापती चेतना मेहेर यांनी गैरव्यवहार उघडकीस आणून भाजपालाच हादरा दिला आहे. अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीत निर्मल भारत अभियानात शौचालयाच्या अनुदान वाटपात गैरव्यवहार झाल्याची तक्रार पंचायत त्यांनी केली होती. त्यानंतर वसई पंचायत समितीमार्फत करण्यात आलेल्या चौकशीत तथ्य आढळून आल्यानंतर जानेवारी महिन्यात ग्रामसेविका मधुरा निकम यांना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी निलंबित केले होते. मात्र, सरपंच आणि उपसरपंचांवर कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे सभापती मेहेर यांनी थेट कोकण आयुक्त जगदीश पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी चौकशी अहवाल तयार करून सरपंच आणि उपसरपंचांवर ठपका ठेऊन त्यांना अपात्र करण्याचा प्रस्ताव कोकण आयुक्तांकडे पाठवला होता. कोकण आयुक्तांनी याप्रकरणी सुनावली घेतल्यानंतर मंगळवारी संध्याकाळी आपला निर्णय दिला. सरपंच भारती भास्कर वैती, उपसरपंच विजय मेहेर आणि ग्रामसेविका मधुरा निकम यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला असून सरपंच वैती आणि उपसरपंच मेहेर यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. या ग्रामपंचायतीने निर्मल भारत अभियानांतर्गत दहा लाभार्थ्यांचे ४ हजार ६०० रुपये प्रमाणे एकूण ४६ हजार रुपये खर्च केलेले आहेत. पण, त्याचा निधी लाभार्थ्यांना वाटप केल्याची कॅशबुकात नोंद नाही आणि प्रमाणकही उपलब्ध नाही. १० पैकी ३ लाभार्थ्यांनी शौचालये बांधलेली नाहीत. तर लाभार्थ्यांची रक्कम सरपंच वैती आणि ग्रामसेविका निकम यांनी खात्यातून काढली आहे. मात्र, प्रत्यक्षात लाभार्थ्यांना रक्कम दिलेली नाही. त्यामुळे यात अपहार झाल्याचा निष्कर्ष चौधरी यांनी काढला होता. >दोन दिवसांत दोन ग्रामपंचायतींवर कारवाईसोमवारी कोकण आयुक्तांनी भाजपाकडे असलेली मालजीपाडा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी गैरव्यवहार केल्याने बरखास्त करण्याची मोठी कारवाई केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अर्नाळा किल्ला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्य बाद झाल्याने भाजपाला दुसरा हादरा बसला येत्या डिसेंबर महिन्यात अर्नाळा किल्ला, मालजीपाडा आणि अर्नाळा ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता गावामध्ये राजकारण तापले आहे. भाजपाने पंधरा दिवसांपूर्वी बहुजन विकास आघाडीचे सदस्य फोडून या ग्रापंचे सरपंचपद पटकावले. बविआच्या सभापती चेतना मेहेर यांनी भाजपाला हादरा दिला.