शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

सेना युद्धात जिंकली, पण तहात हरली!

By admin | Updated: December 3, 2014 03:52 IST

विधानसभा निवडणुकीत ६३ आमदार जिंकून भाजपाचा अश्वमेध रोखणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्धे युद्ध जिंकले खरे, पण त्यानंतर सत्तेसाठी भाजपापुढे नांगी टाकत सपशेल हार पत्करली.

संदीप प्रधान, मुंबईविधानसभा निवडणुकीत ६३ आमदार जिंकून भाजपाचा अश्वमेध रोखणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अर्धे युद्ध जिंकले खरे, पण त्यानंतर सत्तेसाठी भाजपापुढे नांगी टाकत सपशेल हार पत्करली.युवासेनेच्या आदित्यच्या बालहट्टापोटी भाजपासोबतची २५ वर्षांची युती तोडून स्वबळावर निवडणुकीला सामोरे गेलेल्या शिवसेनेकडे सर्व जागांवर उमेदवारही मिळू शकले नाहीत. युती तुटल्यापासून उद्धव ठाकरे यांनी सतत परस्परविरोधी भूमिका घेत पक्षातच संभ्रम निर्माण केला. एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मैत्रीचा हात पुढे करायचा आणि त्याचवेळी दुसरीकडे दोनेकशे उमेदवारांना बी फॉर्म वाटून टाकायचे. त्यामुळे ऐनवेळी मनसेचा हातही शिवसेनेला धरता आला नाही. निवडणूक प्रचारात भाजपावर विश्वासघाताची टीका केली, पण केंद्रातील अवजड उद्योग हे फुटकळ खाते सोडवले नाही. परंतु तरीही ६३ जागा जिंकून भाजपाला बहुमतापासून रोखले. शिवसेनेने मिळविलेले हे यश निश्चित कौतुकास्पद होते. पण पुन्हा उद्धव यांच्या धरसोड वृत्तीमुळे सत्तेपासून शिवसेना लांबच राहिली.राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकून सरकार चालविण्यासाठी आता शिवसेनेची आम्हाला गरज उरलेली नाही, असा संदेश भाजपाने देऊन टाकला. आता विरोधीपक्षनेतेपदही हातून जाते की काय, म्हणून घाईघाईने त्यांनी ते पद पदरात पाडून घेतले. एकदा विरोधी पक्षात बसण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यावर ठाम राहाण्याऐवजी उद्धव यांनी वाटाघाटीसाठी ‘वर्षा’चे दार पुन्हा-पुन्हा ठोठावले. तिथेही पुन्हा तोच धरसोडपणा दाखवला. एकीकडे सत्तेसाठी भाजपा नेत्यांसोबत बंद दाराआड वाटाघाटी आणि दुसरीकडे दुष्काळी भागाच्या पाहाणी दौऱ्याच्या निमित्ताने सरकारवर टीका. उद्धव यांचं नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न शिवसैनिकांनाही पडला होता.भाजपासोबत वाटाघाटींचे गुऱ्हाळ सुरू झाले तेव्हा अखंड महाराष्ट्राचे वचन, जैतापूर प्रकल्पाला विरोध या आपल्या अटी असल्याचे उद्धव सांगत होते, पण प्रत्यक्षात मंत्रिपदे, खाती यावरच तडजोड करीत होते. महाराष्ट्रातील नेत्यांसोबत चर्चा करणार नाही, असे उच्चरवात सांगणाऱ्या उद्धव यांनी शेवटी राज्यातील नेत्यांसोबतच चर्चेचा पट मांडला. सत्तेसाठी आसुसलेल्या शिवसेनेचे पाणी भाजपाने पुरते जोखले होते. त्यामुळेच गेला महिनाभर चर्चेच्या फेऱ्यांत त्यांना अडकवून ठेवले. यामुळे वाटाघाटी हा टिंगल-टवाळीचा विषय झाला, शिवसेनेची सत्तालालसा टीकेची लक्ष्य झाली.केंद्रातील अवजड उद्योग खात्याचे मंत्रिपद सोडायचे नाही, महाराष्ट्रात विरोधी पक्षनेतेपद घेऊन भाजपावर टीका करायची आणि मध्यरात्री सत्ता सहभागाच्या वाटाघाटी करीत बसायचे अशी त्रिशंकू अवस्था उद्धव यांच्या धोरणांमुळे शिवसेनेची झाली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात जी शिवसेना रोखठोक भूमिकेकरिता ओळखली जायची तिची सत्तेमागील फरफट भाजपा नेतृत्वाने हेरली आणि आता शिवसेनेला लज्जारक्षणापुरताच सत्तेचा वाटा दिला. स्वाभिमानाच्या गमजा मारणाऱ्या शिवसेनेच्या हाती चणे-फुटाणे टाकून भाजपाने निवडणुकीनंतरचाही डाव जिंकला!