शहरं
Join us  
Trending Stories
1
Local Body Elections: नगरांच्या निवडणुकांमध्ये 'दुसरा' टप्पा, काही ठिकाणी २० डिसेंबरला मतदान
2
फोनमध्ये सिम नसल्यास अॅप्स वापरता येणार नाहीत; दर सहा तासांनी व्हॉट्सअॅप वेब थेट लॉगआउट होणार!
3
नगर परिषद, नगर पंचायत निवडणूक २०२५:  रात्री दहापर्यंत पडणार आश्वासनांचा 'पाऊस'!
4
Vande Bharat Depot: पुण्यासह राज्यात तीन ठिकाणी वंदे भारत 'कोचिंग डेपो' वाढविणार
5
मध्य रेल्वेवर लवकरच २० प्लॅटफॉर्म वाढणार, कोकणसाठी अतिरिक्त मेल, एक्स्प्रेस चालवणे शक्य
6
IND vs SA 1st ODI : टॉस गमावला, पण मॅच जिंकली! कसोटीतील बिघाडीनंतर टीम इंडियाची वनडे मालिकेत आघाडी
7
हाताला सलाइन, नाकाला ऑक्सिजन पाइप; छगन भुजबळांचा रुग्णालयातून प्रचार, भावनिक होत म्हणाले...
8
“कितीही करा कल्ला, मालवण शिवसेनेचाच बालेकिल्ला”: एकनाथ शिंदे; निलेश राणेंचेही केले कौतुक
9
“मुंबईत ठाकरेंचे काही चालणार नाही, उद्धव यांनी राज यांना सोबत घेऊन चूक केली”; कुणाचा दावा?
10
“नवरा १००₹ देत नव्हता, पण देवाभाऊ लाडक्या बहिणींना १५०० देतात”; भाजपा नेत्यांचे विधान चर्चेत
11
SIR तपासात गडबड उघड! गोव्यात ९० हजार मतदारांवरील मोठी विसंगती आली समोर; अधिकारी म्हणाले...
12
०१ डिसेंबरला रेल्वे नियम बदलणार! तत्काळ तिकिटासाठी लागणार OTP; मुंबईतील ‘या’ ट्रेनपासून सुरू
13
“जिकडे बॉम्बे असेल तिकडे मुंबई करू, शाळेची नावेही बदलू”; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला निर्धार
14
IND vs SA 1st ODI : कुलदीपनं ३ चेंडूत फिरवली मॅच! एकाच ओव्हरमध्ये २ विकेट्स अन्...
15
VIDEO : "समझने वालों को इशारा काफी!" विराटला गंभीरची मिठी; पण रोहितची रिअ‍ॅक्शनच ठरली 'शोस्टॉपर'
16
दिल्लीतील पराभवानंतर अवध ओझा सरांचा राजकारणाला रामराम; AAP मधून बाहेर पडले...
17
VIDEO : "उपकार विसरू नका! नाहीतर…" बेताल वक्तव्य करणाऱ्या SA कोचला गावसकरांनी दिली ताकीद
18
IND vs SA : अनुभवी फलंदाजांनी पेश केला खास नजराणा; किंग कोहली अन् रोहितसह KL राहुलनं दाखवला क्लास!
19
छेड काढल्याचा आरोप, वैद्यकीय अधिकाऱ्याला नातेवाईकांची मारहाण
20
२४ तासांत ७ स्फोटांनी हादरले बलुचिस्तान! रेल्वे ट्रॅक बॉम्बने उडवला; पोलिस ठाण्यावर ग्रेनेड हल्ला
Daily Top 2Weekly Top 5

...तर सेना स्टाईलने समजावणार!

By admin | Updated: November 30, 2015 03:07 IST

राज्यात युती सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलजबावणी होत नसल्याचे आमदारांच्या दौऱ्यात आढळून आले आहे.

नांदेड/परभणी/जालना : राज्यात युती सरकारच्या वतीने विविध लोककल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे योजनांची अंमलजबावणी होत नसल्याचे आमदारांच्या दौऱ्यात आढळून आले आहे. या अधिकाऱ्यांचे काय करायचे ते मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत ठरविले पाहिजे. संबंधितांना सरकारी भाषा समजत नसेल, तर शिवसेनेच्या भाषेत त्यांना समजवायचे का, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला. जालना, नांदेड आणि परभणी येथे शिवसेनेच्या वतीने उद्धव यांच्या हस्ते दुष्काळग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यात आले. जालना व नांदेडला प्रत्येकी १ हजार व परभणीत ९ शेतकऱ्यांना उद्धव यांच्या हस्ते १० हजारांची आर्थिक मदत देण्यात आली़ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ३ शेळ्या, संगोपनासाठी ५ हजार रुपये आणि विमापत्राचे वाटप करण्यात आले़उद्धव म्हणाले, निवडणुका आल्या की नेत्यांचा सुकाळ असतो. जेवढा मोठा नेता तेवढी मोठी थाप असते. मात्र, सध्या कोणत्याही निवडणुका नसताना शिवसेना शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आली आहे. पक्षाचे सर्व मंत्री व आमदार गेले दोन दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी दुष्काळी स्थितीचा अभ्यास केला. आत्महत्या न करण्याचे आणि इतरांनाही सावरण्याचे वचन उद्धव यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून घेतले. आम्ही सरकारमध्ये असलो तरी शेतकरीविरोधी धोरणांचा नेहमीच विरोध करू़ सरकारमध्ये असलो काय अन् नसलो काय? जनतेच्या हितासाठी टीकाच काय तर सरकारचा पंचनामाही करू, अशा शब्दांत उद्धव यांनी सुनावले़ उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, राज्यमंत्री दीपक केसरकर, विजय शिवतारे, संजय राठोड, रवींद्र वायकर, दादाभाऊ भुसे आदी त्यांच्यासोबत होते. शासकीय योजनांची घोषणा होत असताना त्याची अंमलबजावणी होत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी आता शिवसैनिकांची राहील, असेही उद्धव यांनी स्पष्ट केले़ लोकांनी जिल्हा प्रमुखांशी संपर्क साधावा. तक्रारींची १० दिवसांत दखल घेतली जाईल, असेही ते म्हणाले.एसटीतर्फे ९ कोटीपरिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एस.टी.महामंडळाचे कर्मचारी व संघटनांच्या वतीने ९ कोटी रुपये दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचे जाहीर केले.छायाचित्रांच्या बोलीतून निधीदुष्काळग्रस्तांना आतापर्यंत ७ ते ८ कोटी रूपयांची मदत केली आहे. उद्धव ठाकरे यांनी काढलेल्या छायाचित्रांच्या बोलीतून ही रक्कम उभी राहिली असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितले.