शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

सेनेचे तळ्यात-मळ्यातच

By admin | Updated: November 10, 2014 04:42 IST

शिवसेना सत्तेकरिता लाचार नाही. वेळप्रसंगी विरोधी पक्षात बसण्याची आपली तयारी आहे, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी

मुंबई : शिवसेना सत्तेकरिता लाचार नाही. वेळप्रसंगी विरोधी पक्षात बसण्याची आपली तयारी आहे, असे सांगतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारमध्ये सहभागी होण्याबाबतचा आपला निर्णय घोषित होण्याकरिता आणखी दोन दिवसांचा कालावधी असल्याचे जाहीर केले. मात्र त्याचवेळी ‘भगवा दहशतवाद’ असे संबोधित भाजपाला हिणवणाऱ्या शरद पवार यांचा पाठिंबा घ्यायचा किंवा कसे याचे उत्तर आपल्याला भाजपाकडून अपेक्षित असल्याचे सांगत त्या पक्षापुढे नैतिक पेच उभा केला आहे.शिवसेनेचा विधिमंडळ गटनेता निवडण्याकरिता रविवारी आमदारांची बैठक शिवसेना भवनात पार पडली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, शिवसेनेकडून मतदारांच्या असलेल्या अपेक्षा सत्ता असो अथवा नसो आम्ही पूर्ण करणार आहोत. कोण विरोधी पक्षनेता होणार किंवा विधानसभा अध्यक्ष होणार यापेक्षा हिंदू संपवण्याची भाषा करणाऱ्या देशविघातक शक्ती वाढत आहेत. हिंदुत्ववादी शक्तींचे विभाजन होऊ नये, ही शिवसेनेची भूमिका आहे. मात्र ज्या शरद पवार यांनी प्रथम ‘भगवा दहशतवाद’ या शब्दाचा वापर केला, इशरत जहाँला निरपराध ठरवले त्या राष्ट्रवादीचा पाठिंबा भाजपा घेणार असेल तर शिवसेनेला सरकारमध्ये जाणे अवघड होईल. वाजपेयी यांचे १३ दिवसांचे सरकार पवारांनीच पाडले होते. त्यामुळे भाजपा पवार यांचा पाठिंबा घेणार का, याचे उत्तर आपल्याला हवे आहे, असे ते म्हणाले. केंद्रात शपथविधीपूर्वी महाराष्ट्रात सत्तेचे वाटप कसे असेल त्याचे उत्तर हवे होते. अन्यथा केंद्रात मंत्रिपद देताना झाले त्याचीच पुनरावृत्ती झाली असती, असे सूचक विधान उद्धव यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)