शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

लष्कराने केली औरंगाबादच्या सहा तरुणांची सुखरूप सुटका

By admin | Updated: September 13, 2014 02:54 IST

काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या औरंगाबादेतील सहा तरुणांची भारतीय लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. हे तरुण सध्या परतीच्या वाटेवर आहेत

औरंगाबाद : काश्मीरमध्ये बेपत्ता झालेल्या औरंगाबादेतील सहा तरुणांची भारतीय लष्कराच्या जवानांनी सुखरूप सुटका केली आहे. हे तरुण सध्या परतीच्या वाटेवर आहेत. यामध्ये औरंगाबादेत शिक्षण घेत असलेल्या दोन इराकी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. जम्मू-काश्मीर राज्यात महापुरामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. पुरात सापडल्यामुळे शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अजूनही हजारो लोक ठिकठिकाणी पुराने वेढले आहेत. त्यात औरंगाबादेतून पर्यटनासाठी गेलेले मोहम्मद शाहेद मोहम्मद अमीन (२४), असेम सिद्दीक (२०), मोहम्मद तहा अब्दुल रऊफ (१८), एहतेशाम अहमद (२०), मुस्तफा (२४) आणि झैद खलील इस्माईल (२५) हे बेपत्ता झाले होते. श्रीनगर शहरास पाण्याने वेढल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला होता. मात्र, आता या चारही जणांशी संपर्क झाला असून, ते सुखरूप आहेत.श्रीनगर शहरातील गव्हर्नर हाऊस भागातून भारतीय लष्कराच्या जवानांनी त्यांची सुखरूप सुटका केली आहे. लष्कराच्या जवानांनी वाचविल्यानंतर हे तरुण दिल्लीमार्गे औरंगाबादच्या दिशेने प्रवासासाठी निघाले आहेत. सहापैकी मुस्तफा आणि झैद खलील इस्माईल हे दोघे इराकी विद्यार्थी असून, ते औरंगाबादेत एमपीएडचे शिक्षण घेत आहेत. हे दोघे स्वतंत्रपणे पर्यटनासाठी गेले होते. तर उर्वरित चौघे एका गटात होते. या चौघांमधील तिघे जण मौलाना आझाद कॉलेजचे विद्यार्थी आहेत. (प्रतिनिधी)