शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सेनेची व्यूहरचना सपशेल फसली!

By admin | Updated: October 24, 2014 04:27 IST

विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १५०’ जाहीर करून त्याचा आग्रह धरण्याची शिवसेनेची व्यूहरचना सपशेल फसली असून आता जर शिवसेना बिनबोभाट राज्यातील सत्तेत सहभागी झाली ना

संदीप प्रधान, मुंबई विधानसभा निवडणुकीत ‘मिशन १५०’ जाहीर करून त्याचा आग्रह धरण्याची शिवसेनेची व्यूहरचना सपशेल फसली असून आता जर शिवसेना बिनबोभाट राज्यातील सत्तेत सहभागी झाली नाही, तर मुंबई व ठाणे महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्षपद गमावण्याची वेळ शिवसेनेवर चार महिन्यांनी येऊ शकते.मुंबई शहरात भाजपाचा शिवसेनेपेक्षा एक जास्त आमदार विजयी झाला. ठाण्यात शहरातील जागा शिवसेनेने गमावली. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे २७ सदस्य असून त्यामध्ये शिवसेनेचे ९, भाजपाचे ४, मनसेचे ३, राष्ट्रवादी काँग्रेसचे २, काँग्रेसचे ६, समाजवादी पार्टीचा १, अपक्ष १ तर गवळीच्या पक्षाचा १ असे सदस्य आहेत. राज्यातील सरकारमध्ये सहभागी होताना शिवसेनेने आढेवेढे घेतले व काही कारणास्तव सहभाग झाला नाही, तर भाजपा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, सपा व अपक्ष हे एकत्र येऊन शिवसेनेकडून अध्यक्षपद खेचून घेऊ शकतात. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे ७, भाजपाचा १, मनसेचा १, राष्ट्रवादीचे ५ तर काँग्रेसचे २ सदस्य आहेत. येथेही भाजपा, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्याकडून शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले जाऊ शकते. असे झाल्यास महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेची या दोन प्रमुख महापालिकांतील आर्थिक सत्ता संपुष्टात येऊ शकते.विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मिशन १५०चा आग्रह सोडला असता तर विधानसभा निवडणुकीत ५३ ठिकाणी शिवसेना-भाजपा परस्परांच्या विरोधात लढले नसते. त्यापैकी ३२ ठिकाणी भाजपाने शिवसेनेच्या उमेदवारांना पराभूत केले तर २१ मतदारसंघांत शिवसेनेने भाजपाच्या उमेदवारांना धूळ चारली.