शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

सेना टाकणार बहिष्कार!

By admin | Updated: October 31, 2014 02:23 IST

राज्यातील भाजपाप्रणीत सरकारच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.

आज शपथविधी : भाजपाचे सात मंत्री घेणार शपथ; पाठिंब्याबाबत मतैक्य नाही
नवी दिल्ली/मुंबई : राज्यातील भाजपाप्रणीत  सरकारच्या शपथविधी समारंभावर बहिष्कार घालण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. यामुळे आता भविष्यात शिवसेना या सरकारमध्ये सामील होणार किंवा कसे यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.  शिवसेनेची सोबत घ्यायची की राष्ट्रवादीने देऊ केलेला ‘तटस्थ’ पाठिंबा स्वीकारायचा, याबाबत नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी सल्लामसलत केली. पण दिवसभराच्या चर्चेनंतरही  त्यावर मतैक्य झाले नाही. 
दिल्लीला जाण्यापूर्वी  फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वत: दूरध्वनी करून शपथविधी समारंभास हजर राहण्याचे निमंत्रण दिले. त्यामुळे शिवसेनेला सरकारमध्ये सहभागी करून घेतले जात आहे, असे संकेत मिळत होते. मात्र, शपथविधी सोहळ्यात शिवसेनेच्या दोन मंत्र्यांचा समावेश करण्याची मागणी भाजपाने अमान्य केली. शिवाय, राजीव प्रताप रुढी यांनी शुक्रवारी शिवसेनेचे मंत्री शपथ घेणार नाहीत, असे टि¦टरद्वारे परस्पर जाहीर करून टाकले.  भाजपाकडून मिळत असलेल्या अशा प्रकारच्या अपमानास्पद वागणुकीमुळे संतापलेल्या शिवसेनेने अखेर बहिष्कारास्त्र बाहेर काढत जशाच तसा प्रतिसाद दिला. 
 
भाजपाकडून तत्याने अपमानास्पद वागणूक 
राज्य मंत्रिमंडळाच्या स्थापनेमधील शिवसेनेच्या सहभागासंबंधीचा गोंधळ संपलेला नाही. त्यामुळे फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यास शिवसेनेतर्फे कुणीही हजर राहणार नाही. भाजपाकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने आपण शपथविधी सोहळ्याकरिता का हजर राहायचे, अशी बहुतांश आमदारांची भावना झाली असून त्यांनी ती पक्ष नेतृत्वाच्या कानावर घातली आहे.  - विनायक राऊत, सचिव, शिवसेना
 
सेनेसोबत विश्वासदर्शक ठरावानंतरच वाटाघाटी
सेनेच्या नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न दिसत नाही. त्यामुळे सध्या अल्पमतातील सरकार सत्तारूढ होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीच्या ‘तटस्थ’पणावर विश्वासदर्शक ठराव संमत करून घेतल्यानंतर सेनेसोबत वाटाघाटी होऊ शकतात.
 
विदर्भातून कार्यकर्ते मुंबईत
शपथविधी समारंभाला उपस्थित राहण्यासाठी नागपूर, विदर्भातील हजारो कार्यकर्ते मिळेल त्या वाहनांनी मुंबईकडे निघाले आहेत. विमानाचे बुकिंग फुल्ल झाले. शिवाय, विमान तिकिटाचे दर 37 हजारांवर गेले आहेत. रेल्वेचे तिकीट मिळणो तर मुश्कीलच आहे. त्यामुळे हजारो लोक गाडय़ांनी येत आहेत.
 
पासेसचा प्रचंड तुटवडा
भाजपाचे आमदार, खासदार, आजी-माजी नेते, रा.स्व. संघाचे पदाधिकारी, देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक अशा अनेकांना व्हीआयपी किंवा व्हीव्हीआयपी पास हवे असून त्यासाठी मारामार सुरू आहे. पासवाटपाची जबाबदारी असलेले भाजपाचे कार्यकर्ते त्रस्त झाले आहेत. भाजपाच्या प्रत्येक आमदाराला 5क् ते 75 पास देण्यात आले पण त्यांना किमान 2क्क् पास हवे आहेत. एकूणच या पासचा गोंधळ आहे.
 
राज हेही अनुपस्थित : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही शुक्रवारी होणा:या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. नियोजित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपण दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या असून, त्यांचा शपथविधी सोहळा आपण दूरदर्शनवर पाहणार असल्याचे राज यांनी सांगितले.
 
इच्छुक अन् समर्थकांची घालमेल
राज्य मंत्रिमंडळाच्या उद्या होणा:या शपथविधीत आपला नंबर लागणार की नाही, या चिंतेने इच्छुक आमदार आणि त्यांच्या समर्थकांची आज दिवसभर अक्षरश: घालमेल सुरू होती. 
उद्याच्या शपथविधीत समावेश होईल, अशी भाऊसाहेब फुंडकर, गिरीश बापट, गिरीश महाजन, सुभाष देशमुख, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांना अपेक्षा आहे. त्यादृष्टीने ते तयारीत आहेत.
अनेक इच्छुकांनी आज भाजपा कार्यालयात विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, संघटन मंत्री रवी भुसारी यांच्या गाठीभेटी घेतल्या. पण शुक्रवारी होणा:या शपथविधीत केवळ सात जणांचा समावेश होईल, असे समोर आल्याने अन्य इच्छुकांवर चिंतेचे सावट पसरले.
 
विष्णू सावरा, सुरेश खाडे हेही मंत्रिमंडळात
शपथविधी सोहळ्यात केवळ सात मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे या कोअर कमिटी सदस्यांबरोबर विष्णू सावरा व सुरेश खाडे यांचा समावेश आहे. सावरा हे एसटी असून, खाडे हे एससी आहेत. फडणवीस व मुनगंटीवार हे खुल्या प्रवर्गातील असतील. पंकजा या ओबीसी तर तावडे हे मराठा समाजातील आहेत. फडणवीस व मुनगंटीवार हे विदर्भातील, खडसे हे उत्तर महाराष्ट्रातील, पंकजा या मराठवाडय़ातील, तावडे हे मुंबईतील तर सावरा हे ठाणो जिल्ह्यातील आहेत. खाडे हे पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या माध्यमातून प्रादेशिक समतोल राखण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे.