शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सेना-भाजपा ‘एकीचे बळ’ अधिक ठरले असते

By admin | Updated: October 24, 2014 04:20 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. एका विश्लेषणानुसार, हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुका लढले असते, तर त्यांना आणखी ५३ जागा जिंकता आल्या असत्या. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये मात्र मोठी घट झाली असती. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांच्या पारड्यातही कमी जागा पडल्या असत्या.भाजपा- मित्रपक्षांनी १२३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आहेत. दोघांनी मिळून जिंकलेल्या जागांची संख्या १८६ आहे. या दोन्ही पक्षांचे मताधिक्य पडताळून पाहाता ५३ जागांवर त्यांनी परस्परांना क्षय दिले आहेत. म्हणजेच महायुती असती, तर त्यांना २३९ जागांवर आघाडी घेता आली असती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून ४२ आणि ४१ म्हणजेच एकूण ८३ जागा मिळविल्या आहेत. हे पक्ष एकत्र लढले असते, तर त्यांना यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असत्या, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेना-भाजपाच्या युतीला अहमदनगर आणि ऐरोली या जागा सहज जिंकता येणे शक्य होते. तसेच मनसेने जिंकलेली एकमेव जुन्नरची जागा आणि एमआयएमने जिंकलेली औरंगाबादची जागाही युतीच्या उमेदवारांना जिंकता आली असती. तसेच जत, करमाळा या जागाही महायुतीला काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकता आल्या असत्या. (प्रतिनिधी)