शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
6
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
7
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
8
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
9
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
10
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
11
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
12
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
13
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
14
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
15
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
16
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
17
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
18
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
19
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
20
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 

सेना-भाजपा ‘एकीचे बळ’ अधिक ठरले असते

By admin | Updated: October 24, 2014 04:20 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. एका विश्लेषणानुसार, हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुका लढले असते, तर त्यांना आणखी ५३ जागा जिंकता आल्या असत्या. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये मात्र मोठी घट झाली असती. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांच्या पारड्यातही कमी जागा पडल्या असत्या.भाजपा- मित्रपक्षांनी १२३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आहेत. दोघांनी मिळून जिंकलेल्या जागांची संख्या १८६ आहे. या दोन्ही पक्षांचे मताधिक्य पडताळून पाहाता ५३ जागांवर त्यांनी परस्परांना क्षय दिले आहेत. म्हणजेच महायुती असती, तर त्यांना २३९ जागांवर आघाडी घेता आली असती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून ४२ आणि ४१ म्हणजेच एकूण ८३ जागा मिळविल्या आहेत. हे पक्ष एकत्र लढले असते, तर त्यांना यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असत्या, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेना-भाजपाच्या युतीला अहमदनगर आणि ऐरोली या जागा सहज जिंकता येणे शक्य होते. तसेच मनसेने जिंकलेली एकमेव जुन्नरची जागा आणि एमआयएमने जिंकलेली औरंगाबादची जागाही युतीच्या उमेदवारांना जिंकता आली असती. तसेच जत, करमाळा या जागाही महायुतीला काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकता आल्या असत्या. (प्रतिनिधी)