शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

सेना-भाजपा ‘एकीचे बळ’ अधिक ठरले असते

By admin | Updated: October 24, 2014 04:20 IST

विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला

मुंबई : विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादिले असले आणि शिवसेनेच्या जागांमध्येही वाढ झाली असली, तरी युती तुटल्याचा मोठा फटका या पक्षांना बसला आहे. एका विश्लेषणानुसार, हे दोन्ही पक्ष युती करून निवडणुका लढले असते, तर त्यांना आणखी ५३ जागा जिंकता आल्या असत्या. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागांमध्ये मात्र मोठी घट झाली असती. तसेच अपक्ष आणि लहान पक्षांच्या पारड्यातही कमी जागा पडल्या असत्या.भाजपा- मित्रपक्षांनी १२३ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने ६३ जागा जिंकल्या आहेत. दोघांनी मिळून जिंकलेल्या जागांची संख्या १८६ आहे. या दोन्ही पक्षांचे मताधिक्य पडताळून पाहाता ५३ जागांवर त्यांनी परस्परांना क्षय दिले आहेत. म्हणजेच महायुती असती, तर त्यांना २३९ जागांवर आघाडी घेता आली असती. तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगवेगळे लढून ४२ आणि ४१ म्हणजेच एकूण ८३ जागा मिळविल्या आहेत. हे पक्ष एकत्र लढले असते, तर त्यांना यापेक्षा खूपच कमी जागा मिळाल्या असत्या, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सेना-भाजपाच्या युतीला अहमदनगर आणि ऐरोली या जागा सहज जिंकता येणे शक्य होते. तसेच मनसेने जिंकलेली एकमेव जुन्नरची जागा आणि एमआयएमने जिंकलेली औरंगाबादची जागाही युतीच्या उमेदवारांना जिंकता आली असती. तसेच जत, करमाळा या जागाही महायुतीला काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकता आल्या असत्या. (प्रतिनिधी)