शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
3
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
4
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
5
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
6
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
7
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
8
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
9
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
10
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
11
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
12
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
13
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
14
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
15
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
16
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
17
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
18
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
19
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
20
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन

सेना -काँग्रेसची स्थायीसाठी युती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2017 01:30 IST

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही शिवसेनेने अखेर काँग्रेसबरोबर युती करून स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्याचे स्पष्ट

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही शिवसेनेने अखेर काँग्रेसबरोबर युती करून स्थायी समितीच्या चाव्या आपल्या हाती घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे युतीच्या अपेक्षेत असलेल्या भाजपाला हा मोठा धक्का बसला आहे. एकूणच तीन नगरसेवकांच्या जोरावर आता काँग्रेस सत्तेत सहभागी झाली आहे. शिवसेना आणि काँग्रेसने मिळून एक गट आता तयार केला असून त्यासंदर्भातील पत्र कोकण विभागीय आयुक्तांना बुधवारी देण्यात आले आहे. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याच्या बदल्यात शिवसेनेच्या तीन स्वीकृत सदस्यांमध्ये एका काँग्रेसच्या सदस्याचादेखील नंबर लागण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. त्यामुळे अवघे तीन नगरसेवक निवडून आल्यानंतरही काँंग्रेसला एकाच वेळेस स्थायी आणि स्वीकृतपदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीबरोबर निवडणुकीपूर्वी असलेली आघाडी निवडणुकीनंतर काँग्रेसने तोडली आहे. त्यांनी आपल्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा शिवसेनेला देत ठाणे महापालिकेत शिवसेना आणि काँग्रेसच्या ७० नगरसेवकांचा एक वेगळा गट तयार केला आहे. ठाणे महापालिकेत काँग्रेस शिवसेनेच्या गटात सामील झाल्याचे पत्र काँग्रेसचे गटनेते यासिन कुरेशी यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे. शिवसेनेबरोबर गेल्याने आता काँग्रेसला सत्तेतील काही पदे मिळण्याची शक्यता आहे. परंतु,राष्ट्रवादीबरोबर राहिल्यास ते मिळणे शक्य नसल्याची खात्री काँग्रेसला होती. परिणामी, त्यांनी सत्ताधारी शिवसेनेबरोबर हातमिळवणी केल्याचे बोलले जात आहे. ठाणे महापालिकेच्या इतिहासात प्रथमच एकहाती सत्ता संपादित करून शिवसेनेने एक नवा इतिहास रचला आहे. तरीसुद्धा, स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून ही नवी राजकीय समीकरणे जुळवण्यात आली आहेत. ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी धरून शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले होते. गेल्या वेळेस ज्या पद्धतीने आठआठ सदस्य असताना लॉटरीपद्धतीने स्थायीचे सभापतीपद लोकशाही आघाडीच्या वाट्याला गेले होते. तसे होऊ नये म्हणून सेनेने खबरदारी घेतली. (प्रतिनिधी)