शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

भ्रष्टाचारासाठी होते शस्त्रास्त्र आयातीचे धोरण

By admin | Updated: May 16, 2016 00:53 IST

भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा हवालामार्फत गुंतविण्याचे यापूर्वीचे धोरण होते, अशी टीका केंद्र्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी येथे केली

पुणे : देशात आतापर्यंत ७० टक्के लष्करी शस्त्रास्त्रे, उत्पादने ही भ्रष्टाचार करण्यासाठी आयात केली जात होती. हा भ्रष्टाचार सहजासहजी उघड होत नाही. यामध्ये भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा हवालामार्फत गुंतविण्याचे यापूर्वीचे धोरण होते, अशी टीका केंद्र्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी येथे केली. आता लष्करी उत्पादनांमध्ये सर्व बाबतीत आत्मनिर्भर होण्याचे धोरण देशाने स्वीकारले असून, पुढील चार वर्षांत आपली सर्व मिसाईल्स तसेच लढाऊ विमानातील मुख्य तंत्रज्ञान भारतीय बनावटीचे असेल, अशा विश्वासही पर्रिकर यांनी या वेळी व्यक्त केला.वक्तृत्वोत्तेजक सभा या संस्थेच्या वतीने आयोजित वसंत व्याख्यानमालेमध्ये ‘संरक्षण उत्पादने - आत्मनिर्भरता आणि भविष्यातील वाटचाल’ या विषयावर ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक उपस्थित होते. टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या व्याख्यानासाठी पुणेकरांनी मोठी गर्दी केली होती. बोफोर्स तसेच सध्या सुरू असलेल्या आॅगस्ता भ्रष्टाचार प्रकरणाचा ओझरता उल्लेख करीत पर्रिकर यांनी लष्करी उत्पादन आयातीच्या धोरणाबाबत केंद्र सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, कारगिल युद्ध जिंकण्यात मोठा वाटा असलेली बोफोर्स तोफ चांगली आहे. पण यातील भ्रष्टाचार वाईट आहे. आयातीमुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढील काही वर्षांत लष्करी उत्पादनांमध्ये आत्मनिर्भर होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. देशाच्या संरक्षक बाबींवर आपण ३ लाख ४१ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत. देशाच्या एकूण अंदाजपत्रकापैकी जवळपास १७ टक्के खर्च यावर होत आहे. देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भविष्यात काही धोका उद्भवल्यास आपण सर्वप्रकारे सज्ज असलो पाहिजे, त्यासाठी हा खर्च केला जात आहे. पुढील काही वर्षांत ६० ते ७० टक्के उत्पादन देशांतर्गत करण्यात आपण यशस्वी होऊ. या प्रयत्नांना यशही मिळत आहे. भारतीय बनावटीचे तेजस या लढाऊ विमानाने ६८०० तास उड्डाण केले असून तेजसची पहिली स्कॉड्रन डिसेंबर अखेरीस हवाई दलात समाविष्ट केली जाईल, असे पर्रिकर यांनी सांगितले.