शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

घनकचरा व्यवस्थापन विभागाची मनमानी

By admin | Updated: June 27, 2016 01:55 IST

नागरिकांनी ओला - सुका कचरा वेगळा केला नसल्याचे कारण देत घनकचरा व्यवस्थापनाने चार दिवस शहरातील कचरा उचलला नाही

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नागरिकांनी ओला - सुका कचरा वेगळा केला नसल्याचे कारण देत घनकचरा व्यवस्थापनाने चार दिवस शहरातील कचरा उचलला नाही. प्रत्येक सोसायटीमध्ये कचऱ्याचे ढीग तयार झाले असून, रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आयुक्तांनीच आदेश दिले असल्याचे अधिकारी सांगत असून या हुकूमशाहीविषयी शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. नवी मुंबईमध्ये दोन महिन्यांपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमण हटविण्याची जोरदार मोहीम राबविली आहे. प्रशासनातील बेशिस्तपणा मोडीत काढला आहे. उत्पन्नामध्ये वाढ केली असून विकासकामे वेगाने सुरू झाली आहेत. आयुक्तांविषयी शहरवासीयांमध्ये आदर निर्माण झाला आहे. परंतु चार दिवसांपासून अचानक शहरातील कचरा उचलण्याचे काम थांबविण्यात आले आहे. नियमाप्रमाणे नागरिकांनी ओला -सुका कचरा वेगळा करणे आवश्यक आहे. परंतु कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नाही. पर्यावरणाच्या हितासाठी कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात यावे यासाठी वर्तमानपत्रांमधून जाहिरात देण्यात आली. यानंतरही वर्गीकरण होत नसल्याने कचरा उचलण्याचे काम थांबविण्यात आले आहे. यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. प्रत्येक सोसायटीमधील कचरा कुंड्या भरून जमिनीवरही कचरा पडला आहे. ऐन पावसाळ्यामध्ये कचऱ्याची आणिबाणी सुरू झाल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक व लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांना फोन करून कचरा उचलण्याच्या सूचना केल्या. परंतु अधिकारी कचरा उचलण्यास नकार देत आहेत. आयुक्तांनी सांगितले आहे, कचऱ्याचे वर्गीकरण केले तरच कचरा उचलायचा. जोपर्यंत आयुक्त सांगणार नाहीत, तोपर्यंत कचरा उचलला जाणार नाही, अशी उत्तरे मिळत आहेत. चार दिवस कचरा एकाच ठिकाणी असल्याने असंतोष निर्माण होवू लागल्याने रविवारी प्रशासनाने काही ठिकाणी कचरा उचलण्याचे काम सुरू केले. आता कचरा उचलला असला तरी भविष्यात ओला व सुका कचरा वेगळा केला तरच कचरा उचलला जाईल, असे सांगितले जात आहे. प्रशासनाच्या हुकूमशाही प्रवृत्तीचा अनेकांनी निषेध केला आहे. कचऱ्याचे वर्गीकरण करणे नियमात असले तरी त्याविषयी नागरिकांमध्ये आवश्यक जनजागृती झालेली नाही. फक्त वर्तमानपत्रामध्ये दोन जाहिराती दिल्याने प्रत्येक नागरिकाला कसे माहिती होणार? वास्तविक प्रत्येक सोसायटीमध्ये याविषयी जनजागृती करणारी पत्रके वाटली पाहिजेत. सोसायटीच्या सूचना फलकांवरही याविषयी सूचना देणे आवश्यक आहे. नागरिकांना योग्य मुदत दिली पाहिजे. पूर्ण जनजागृती केल्यानंतरही कचऱ्याचे वर्गीकरण झाले नाही तर संबंधित सोसायटीवर दंडात्मक कारवाई करावी. परंतु कचरा न उचलून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करू नये, असे आवाहन केले आहे. >आयुक्त साहेब वेठीस धरू नका ! आयुक्त तुकाराम मुुंढे यांच्याविषयी शहरवासीयांना आदर आहे. परंतू त्यांनी कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी शहरवासीयांना वेठीस धरून आरोग्याशी खेळू नये. प्रत्येक घरापर्यंत कचऱ्याच्या वर्गीकरणाविषयी जनजागृती करणे आवश्यक आहे. नागरिकांना याविषयीचे महत्व पटवून दिले पाहिजे. यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चीत करावा. जनजागृतीसाठी लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घ्यावे. यानंतरही वर्गीकरण झाले नाही तर दंडात्मक तरतुद किंवा इतर कारवाई करावी. परंतू कचरा न उचलूण्याची भुमीका घेवू नये असे मत नागरिक व्यक्त करत आहेत. >तुमची यंत्रणा तपासा पालिकेने कचरा संकलनासाठी ६३८६ गृहनिर्माण संस्था, ३९७७ इंडस्ट्रियल युनिट व ६१० कम्युनीटी बिन्स अशा एकूण २२३२६ कचरा कुंड्या पुरविल्या आहेत. शहरातील १२ हजार कचरा कुंड्यांना आरएफआयडी टेक्नॉलॉली बसविण्यात आली आहे. मुख्यालयातून त्यावर नियंत्रण ठेवले जात असून ही यंत्रणा सुरू आहे का.त्याचा काय उपयोग झाला याची सर्वप्रथम तपासणी करण्याची मागणी होत आहे. साफसफाईकडे दुर्लक्ष शहरातील रस्ते व नाल्यांची सफाई करण्यासाठी ९१ ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. या ठेकेदाराकडील सर्व कामगार कामावर असतात का यावर कोणाचेही नियंत्रण नाही. बायोमेट्रीक हजेरी घेतली जात नाही. शहरातील १३ लाख ४३ हजार रनींग मिटर रस्त्यांची साफसफाई रोज केली जाते. गावठाणांमध्ये ३६ लाख ३३ हजार रनींग मिटर परिसरातील छोट्या गटारांची साफसफाई करणे आवश्यक आहे. परंतू सफाई वेळेत होत नाही.