शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

आरिफच्या माहितीने संभ्रमात वाढ

By admin | Updated: December 2, 2014 04:34 IST

आरिफने दिलेल्या माहितीमुळे या संघटनेच्या कार्यप्रणालीवर काहीसा प्रकाश पडला आहे. पण ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा परस्परविरोधी

डिप्पी वांकाणी, मुंबईइस्लामिक स्टेट (आयएस) या संघटनेने इराक आणि सीरियात चालवलेल्या संघर्षातून परतलेल्या कल्याणमधील आरिफ माजिद याने दिलेल्या माहितीमुळे तपास यंत्रणा संभ्रमात पडल्या आहेत. सुरुवातीला आपण संघटनेकडून दर आठवड्याला मिळणाऱ्या पैशातून काही पैसे साठवून तुर्कस्थानमार्गे निसटून भारतात परतलो, असे त्याने सांगितले होते. आता त्याने म्हटले आहे, की आयएस ही संघटना त्यांच्या लढवय्यांवर कोणतीही बंधने घालत नाही आणि त्यांना आपल्या मर्जीनुसार लढ्यात सामील होण्याची किंवा सोडून जाण्याची मुभा आहे. इतकेच नव्हे, तर आपल्याला संघटनेने परत येताना २,००० अमेरिकी डॉलर्स दिले आणि तुर्कस्थानच्या सीमेपर्यंत आणून सोडले, असेही आरिफने सांगितले. आरिफने दिलेल्या माहितीमुळे या संघटनेच्या कार्यप्रणालीवर काहीसा प्रकाश पडला आहे. पण ती माहिती संभ्रमात टाकणारी किंवा परस्परविरोधी आहे, असे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. त्या माहितीची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आरिफवर लाय डिटेक्टर चाचणी घेण्यात येईल. आरिफच्या म्हणण्यानुसार, तो आणि त्याचे कल्याणहून आलेले तीन साथीदार इराकमधील बगदादहून मोसूलला गेले. तेथे ते त्यांची ओळख किंवा शिफारस करून देणाऱ्या व्यक्तीला भेटले. त्यानंतर संघटनेच्या वरिष्ठ सदस्यांनी त्यांची ओळख पटवून घेतली आणि माहिती तपासली. आरिफच्या म्हणण्यानुसार, ही संघटना कोणालाही शिफारशीशिवाय किंवा ओळखीशिवाय लढ्यात सहभागी करून घेत नाही. संघटनेच्या गोटात शिरल्यावर त्यांना तेथे अनेक आशियाई वंशाचे लोक भेटले. त्यापैकी बहुसंख्य लोक पाकिस्तानी असल्याचे त्यांची भाषा आणि उच्चारांवरून लक्षात आले. युद्धक्षेत्रात हवाई आणि अन्य हल्ल्यांत अनेक जण मारले जात असल्याने दर शुक्रवारी नमाज अदा केल्यानंतर संघटनेच्या जिवंत लढवय्यांची मोजदाद केली जाते. त्याचवेळी नव्या लढवय्यांची भरती केली जाते. तसेच एखाद्याने परत जाण्याची इच्छा व्यक्त केली तर त्याला जाऊ दिले जाते. मात्र तपास यंत्रणा या माहितीवर सहजासहजी विश्वास ठेवण्यास तयार नाहीत. त्यांचे म्हणणे आहे, की या संघटनेने आजवर दाखवलेली अमानुषता लक्षात घेता, ती आपल्या लढवय्यांना इतक्या सहजासहजी सोडणे शक्य नाही. तसेच आरिफने आपण कसे जखमी झालो याची कारणेही वेगवेगळी दिली आहेत. प्रथम त्याने सांगितले, की आपण प्रशिक्षणादरम्यान गोळी लागून जखमी झालो. नंतर तो म्हणाला, की त्याला खिडकी साफ करताना गोळी लागली. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या (एनआयए) अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, की एखादा माणूस युद्धक्षेत्राच्या ऐन रणधुमाळीत खिडक्या कशाला पुसत बसेल. या सर्व प्रश्नांचा खुलासा आरिफच्या लाय डिटेक्टर चाचणीतून होण्याची शक्यता आहे.