शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
7
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
8
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
9
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
10
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
11
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
12
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
13
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
14
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
15
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
16
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
17
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
18
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
19
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
20
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!

अघोरी शक्तीसाठी दिला नरबळी

By admin | Updated: November 16, 2014 01:41 IST

सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले.

वर्धा : सात दिवसांपासून विदर्भात गाजत असलेल्या रूपेश मुळे मृत्यू प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. अघोरी शक्ती वाढविण्यासाठी रूपेशचा नरबळी दिल्याची धक्कादायक बाब तपासात उघड झाली आहे. या प्रकरणात आसिफ शहा वल्द अजीम शहा उर्फ मुन्ना पठाण (4क्) हा एकमेव आरोपी असल्याचेही निष्पन्न झाले आहे.
सुमारे 12 वर्षापूर्वी आसिफ पश्चिम बंगाल येथून काळी विद्या शिकला. तेथून यवतमाळातील स्वगावी आल्यानंतर त्याची गुप्तधनाची लालसा वाढली. काही मांत्रिकांकडून याबाबतची माहितीही त्याने जाणून घेतली. यानंतर त्याने ही विद्याही आत्मसात केली. तेव्हापासून तो गुप्तधनाच्या शोधात होता. मात्र त्याला प्रत्येकवेळी अपयशच आले. यामुळे तो खचून गेला होता. दीड वर्षापूर्वी तो वर्धेत वास्तव्याला आला.  येथे तो ऑटोरिक्षा चालवून उदरनिर्वाह करीत होता. अशातच त्याने देवळी तालुक्यात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न केला असता तिथेही त्याला अपयश आले. आपली विद्या कमी पडत आहे. ती वाढविण्यासाठी नरबळी देण्याचा अघोरी विचार त्याच्या डोक्यात थैमान घालू लागला. तेव्हापासून तो एका कोवळ्या मुलाच्या शोधात होता. अखेर त्याने 8 नोव्हेंबरला नरबळी देऊन हनुमानजीची महापूजा करण्याचा बेत आखला. 
तो नेहमी आर्वी नाका चौक परिसरात ऑटोचा व्यवसाय करायचा. त्यामुळे त्याची लागूनच असलेल्या झोपडपट्टीतील लोकांशी ओळख झाली होती. रूपेशसह त्याच्या वडिलांच्याही तो संपर्कात होता. 8 नोव्हेंबरला सायंकाळी 5.3क् वाजता रूपेश मित्रसोबत खेळत असताना  फिरायला जाऊ असे सांगून तो त्याला ऑटोमध्ये बसवून घेऊन गेला. त्यानंतर बायपास परिसरात कोवळ्या रूपेशची हाताने गळा दाबून त्याने हत्या केली. यानंतर ऑटोत आधीच असलेल्या चादरीमध्ये त्याचा मृतदेह गुंडाळून मागील सीटच्या खाली ठेवला. तेथून तो वर्धा शहरातील गांधीनगर परिसरात विकास विद्यालयाच्या मागील बाजूला आला आणि तेथील अंधाराचा फायदा घेत त्याने अतिशय क्रूरपणो रूपेशचे दोन्ही डोळे काढले, त्याच पद्धतीने  दोन्ही किडण्याही काढल्या तसेच त्याचे गुप्तांगही कापले. या वेळी रात्री 1क्.3क् वाजताची वेळ असल्याचे त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितल्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.  (प्रतिनिधी) 
 
च्आरोपी आसिफ पोलिसांना आपणच हत्या केली हे सांगत होता. मात्र हत्येचे कारण तो सांगत नसल्यामुळे या प्रकरणात आणखी काही आरोपी असावेत, असा संशय पोलिसांना होता. त्याच्या सांगण्यावरून पोलीस पथक विविध भागांत तपासासाठी जात होते. मात्र हाती काहीच लागत नव्हते. पोलिसांना आसिफ हा गंडे, धागेदोरे देतो, असे माहीत होताच त्याची उलटतपासणी सुरू केली. तुला चामडय़ाच्या जोडय़ातील पाणी पाजतो, असे म्हणताच आता आपले मंत्र कायमचे विसरून जाऊ या भीतीपोटी त्याने केलेल्या अघोरी कृत्याची कबुली दिली.
 
‘लोकमत’ने वर्तविला होता नरबळीचा संशय
रूपेशच्या हत्येची घटना उघडकीस आल्यानंतर सर्वप्रथम ‘लोकमत’ने नरबळीचा संशय वर्तविला होता. इतकेच नव्हे, तर आरोपीला अटक होईर्पयत आणि प्रकरणाचा छडा लागेर्पयत हे प्रकरण उचलून धरले होते. यामुळे या घटनेने संतप्त वर्धेकर रस्त्यावर उतरले होते. विविध संघटनाही रूपेशला न्याय देण्याच्या मागणीला घेऊन या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने हाताळल्याने विदारक सत्य पुढे आले.