शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

आम्ही शहीद कुटुंबीय नाही का?

By admin | Updated: September 13, 2016 04:57 IST

कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली.

मनीषा म्हात्रे,  मुंबईकर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचीच नावे पोलीस दफ्तरी असल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे. अशाच प्रकारे २०१२ मध्ये धाडसी कामगिरी करत मृत्यू पावलेल्या दत्ता सरनोबत कुटूंबियांनी आम्ही शहीद कुटुंबीय नाही का? अशी व्यथा ’लोकमत’कडे मांडली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना अजय गावंड यांच्यासह नितीन परब, दत्तू अप्पा सरनोबत यांच्यासारख्या काही पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले. अशा शहीद पोलिसांना आर्थिक भरपाई देण्याचे २००९ च्या शासन निर्णयात नमूद आहे. त्यात २०१४ मध्ये शहीद कृतज्ञता निधीची भर पडली. यातून १० लाख रुपयांची मदत शहीद कुटुंबियांना दिली जाते. यापैकी ही मदत नितीन परब यांना मिळाली. मात्र असे प्रसंग घडल्यानंतर त्यांच्या फाईली चाळल्या जातात. त्यांना कर्तव्य नोकरी, २५ लाख मदतीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात तुटपुंजी मदत करत त्यांची बोळवण केली जाते. वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या निधनानंतर शासनाला गावंड यांची जाग आली. त्यांनी दिड वर्षानंतर गावंड यांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर केली. गावंड, शिंदे, परब यांच्यासारखेच दत्तू सरनोबत यांचा पुन्हा एकदा पोलीस दलाला विसर पडलेला दिसून आला. एसआरपीएफ मध्ये १२ वर्षानंतर सेवा बजावल्यानंतर वयाच्या ५२ व्या वर्षी खेरवाडी पोलीस ठाण्यात ते पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. सप्टेंबर २०१२ मध्ये पोलिसावर हल्ला करून गाडी पळवून नेणाऱ्या दोघा चोरटयांना पकडताना त्यांच्यावर हल्ला झाला. याच हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरनोबत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कारवाई दरम्यान आरोपींकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र एवढी मोठी कामगिरी करुन प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे. त्यांच्या निधनाला चार वर्षे उलटून गेली. आर्थिक मदत तर दुरच साधे पदक देखील त्यांना मिळाले नाही. पत्नी आणि दोन मुलांसोबत ते अंधेरीतील पोलीस लाईन येथे राहायचे. त्यांच्या मृत्यूनंतर वडीलांना शौर्य पदत मिळावे म्हणून त्यांचा मुलगा विकास आणि पत्नी कविता या सतत शासन दरबारी पायपीट करत आहेत. गावंड आणि शिंदे यांच्या यादीत सरनोबत यांचेही नाव नोंदविण्यात येणारअसल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र शहीद कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदत यादीत त्यांचे नावच नसल्याने या कुटुंबियांचा लढा पुन्हा सुरुच राहीला. पतीने संपूर्ण आयुष्य पोलीस दलात अपर्ण केले. तरी देखील त्यांच्या हक्कासाठी झगडण्याची वेळ येणे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे सरनोबत यांच्या पत्नी कविता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दोन्ही कुटुंबियांना आर्थिक भरपाईगावंड आणि शिंदे यांच्या दोन्ही कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई, सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत वेतन, महागाई भत्ता, वेतन आयोगानुसार सुधारित वेतन, निवासस्थान रिक्त केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान म्हणून १.५ लाख अथवा अंतिम वेतनाच्या २० पट सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.काय नाव त्यांचे : सरनोबत यांच्या नावाबाबत कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. फक्त दोनच नावे आली होती. त्यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. सरनोबतबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो, असे प्रशासन विभागाचे अनुप कुमार सिंह म्हणाले.पोलिसांचा निधी गेला कुठे ?मुंबईत जवळपास ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. अशात गावंड यांच्या मत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांचा एक दिवसाचा वेतन देण्याचे जाहीर केले. अशात दलातील एका दिवसाचे वेतन आले की ही रक्कम कोटींच्या घरात जाते. अशात त्यांच्या कुटुंबियांना अवघे १० लाख रुपये देण्यात येत असल्याने बाकीचा निधी गेला कुठे ? असा सवाल येथे उपस्थित होत आहे.