शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही शहीद कुटुंबीय नाही का?

By admin | Updated: September 13, 2016 04:57 IST

कर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली.

मनीषा म्हात्रे,  मुंबईकर्तव्य बजावताना जीव पणाला लावणारे पोलीस नाईक अजय गावंड आणि वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार सोमवारी मदत जाहीर करण्यात आली. यात धक्कादायक बाब म्हणजे या दोघांचीच नावे पोलीस दफ्तरी असल्याने पोलीस दलात नाराजी पसरली आहे. अशाच प्रकारे २०१२ मध्ये धाडसी कामगिरी करत मृत्यू पावलेल्या दत्ता सरनोबत कुटूंबियांनी आम्ही शहीद कुटुंबीय नाही का? अशी व्यथा ’लोकमत’कडे मांडली. मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना अजय गावंड यांच्यासह नितीन परब, दत्तू अप्पा सरनोबत यांच्यासारख्या काही पोलिसांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावले. अशा शहीद पोलिसांना आर्थिक भरपाई देण्याचे २००९ च्या शासन निर्णयात नमूद आहे. त्यात २०१४ मध्ये शहीद कृतज्ञता निधीची भर पडली. यातून १० लाख रुपयांची मदत शहीद कुटुंबियांना दिली जाते. यापैकी ही मदत नितीन परब यांना मिळाली. मात्र असे प्रसंग घडल्यानंतर त्यांच्या फाईली चाळल्या जातात. त्यांना कर्तव्य नोकरी, २५ लाख मदतीच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात तुटपुंजी मदत करत त्यांची बोळवण केली जाते. वाहतूक पोलीस विलास शिंदे यांच्या निधनानंतर शासनाला गावंड यांची जाग आली. त्यांनी दिड वर्षानंतर गावंड यांच्या कुटुंबियांना ही मदत जाहीर केली. गावंड, शिंदे, परब यांच्यासारखेच दत्तू सरनोबत यांचा पुन्हा एकदा पोलीस दलाला विसर पडलेला दिसून आला. एसआरपीएफ मध्ये १२ वर्षानंतर सेवा बजावल्यानंतर वयाच्या ५२ व्या वर्षी खेरवाडी पोलीस ठाण्यात ते पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत होते. सप्टेंबर २०१२ मध्ये पोलिसावर हल्ला करून गाडी पळवून नेणाऱ्या दोघा चोरटयांना पकडताना त्यांच्यावर हल्ला झाला. याच हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सरनोबत यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या कारवाई दरम्यान आरोपींकडून १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र एवढी मोठी कामगिरी करुन प्रशासन मात्र अनभिज्ञच आहे. त्यांच्या निधनाला चार वर्षे उलटून गेली. आर्थिक मदत तर दुरच साधे पदक देखील त्यांना मिळाले नाही. पत्नी आणि दोन मुलांसोबत ते अंधेरीतील पोलीस लाईन येथे राहायचे. त्यांच्या मृत्यूनंतर वडीलांना शौर्य पदत मिळावे म्हणून त्यांचा मुलगा विकास आणि पत्नी कविता या सतत शासन दरबारी पायपीट करत आहेत. गावंड आणि शिंदे यांच्या यादीत सरनोबत यांचेही नाव नोंदविण्यात येणारअसल्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले. मात्र शहीद कुटुंबियांना जाहीर केलेल्या मदत यादीत त्यांचे नावच नसल्याने या कुटुंबियांचा लढा पुन्हा सुरुच राहीला. पतीने संपूर्ण आयुष्य पोलीस दलात अपर्ण केले. तरी देखील त्यांच्या हक्कासाठी झगडण्याची वेळ येणे ही फार दुर्दैवी बाब असल्याचे सरनोबत यांच्या पत्नी कविता यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. दोन्ही कुटुंबियांना आर्थिक भरपाईगावंड आणि शिंदे यांच्या दोन्ही कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई, सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत वेतन, महागाई भत्ता, वेतन आयोगानुसार सुधारित वेतन, निवासस्थान रिक्त केल्यानंतर सेवानिवृत्तीच्या दिनाकांपर्यंत घरभाडे भत्ता, सानुग्रह अनुदान म्हणून १.५ लाख अथवा अंतिम वेतनाच्या २० पट सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.काय नाव त्यांचे : सरनोबत यांच्या नावाबाबत कुठलीही माहिती आपल्याकडे नाही. फक्त दोनच नावे आली होती. त्यांना २००९ च्या शासन निर्णयानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. सरनोबतबाबत अधिक माहिती घेऊन सांगतो, असे प्रशासन विभागाचे अनुप कुमार सिंह म्हणाले.पोलिसांचा निधी गेला कुठे ?मुंबईत जवळपास ४५ हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. अशात गावंड यांच्या मत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना पोलिसांचा एक दिवसाचा वेतन देण्याचे जाहीर केले. अशात दलातील एका दिवसाचे वेतन आले की ही रक्कम कोटींच्या घरात जाते. अशात त्यांच्या कुटुंबियांना अवघे १० लाख रुपये देण्यात येत असल्याने बाकीचा निधी गेला कुठे ? असा सवाल येथे उपस्थित होत आहे.