शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

सगळेच चोर आहेत का? विरोधकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:54 IST

पीकविमा भरताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आॅनलाइनचा आग्रह धरता, सगळचे चोर आहेत का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केला.

मुंबई : पीकविमा भरताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आॅनलाइनचा आग्रह धरता, सगळचे चोर आहेत का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केला. पीकविम्याला मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही त्यांनी केली.विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी पीकविमा योजनेच्या मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. आॅनलाइन अर्ज भरताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी अठरा-अठरा तास रांगेत उभे आहेत. जामखेडला शेतकºयांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे ३१ जुलैची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. अर्ज आॅनलाइन भरण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व्हरची ताकद तरी आहे का, असा सवाल करून शेकापचे जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, सगळे जण चोर आहेत आणि सरकारची फसवणूक करीत आहेत, या भ्रमात सरकार योजनांची अंमलबजावणी करत आहे. आॅनलाइन अर्ज घ्यायचे होते, तर आधीपासूनच तशी व्यवस्था करणे आवश्यक होते.मोगलाई आहे का?१पीककर्ज विमा उतरविण्यासाठी गेले तीन दिवस शेतकरी रांगा लावून उभे आहेत, त्यांना लाठ्या घालण्याचे काम चालू आहे. ही काय मोगलाई लागून गेली का, अशा शब्दांत राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला. पीकविम्याची मुदत वाढवून द्या, असे आपण गेल्याच आठवड्यात सांगितले होते, पण सरकारने ऐकले नाही. त्या वेळी ऐकले असते, तर आज दोन शेतकºयांचे हकनाव जीव गेले नसते, असेही पवार यांनी सुनावले.२तर शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी मराठवाड्यात मोठ मोठ्या रांगा आहेत, मुदत वाढ दिली नाही, तर राज्यात दंगे उसळतील, असे सांगून सरकारला घरचा आहेत दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका करताना गेल्या वर्षी १ कोटी १० लाख शेतकºयांनी विमा उतरविला होता, या वर्षी मुदत संपत आली, तर फक्त १५ लाख शेतकºयांनी विमा उतरविला आहे. तुम्हाला शेतकºयांचे भले करायचे आहे की, विमा कंपन्यांचे खिसे गरम करायचे आहेत, असेही विखे म्हणाले.बँकांनी सहकार्यकेले नाहीपंतप्रधान पीकविमा ही योजना केंद्राची आहे. त्यानुसार, राज्यात ही योजना राबविली जाते. या योजनेसाठी २० जूनला जीआर निघाला, परिपत्रक काढले. सुरुवातीच्या पंधरा दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य केले नाही, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. या बँकांनी शेतकºयांना वेठीला धरले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना पाच लाखपीकविमा भरण्यासाठी जात असताना, अपघाती मृत्यू पावलेल्या रामा पोत्रे या मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत कृषिमंत्री फुंडकर यांनी जाहीर केली. मंचक इंगळे हा शेतकरी धर्मापुरी येथील बँक शाखेत अर्ज भरण्यासाठी जात होता. बँकेने त्याला धाटनांदूर येथील शाखेत जाण्यास सांगितले, पण वाटेतच त्याचा अपघाती मृत्यू झाला.