शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

सगळेच चोर आहेत का? विरोधकांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 01:54 IST

पीकविमा भरताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आॅनलाइनचा आग्रह धरता, सगळचे चोर आहेत का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केला.

मुंबई : पीकविमा भरताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत तुम्ही आॅनलाइनचा आग्रह धरता, सगळचे चोर आहेत का, असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केला. पीकविम्याला मुदतवाढ देण्याची जोरदार मागणीही त्यांनी केली.विधान परिषदेत धनंजय मुंडे यांनी पीकविमा योजनेच्या मुदतवाढीचा मुद्दा उपस्थित केला. आॅनलाइन अर्ज भरताना शेतकºयांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शेतकरी अठरा-अठरा तास रांगेत उभे आहेत. जामखेडला शेतकºयांवर लाठीमार करण्यात आला. त्यामुळे ३१ जुलैची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली. अर्ज आॅनलाइन भरण्यासाठी राज्य सरकारच्या सर्व्हरची ताकद तरी आहे का, असा सवाल करून शेकापचे जयंत पाटील यांनी केला. राष्ट्रवादीचे सुनील तटकरे म्हणाले, सगळे जण चोर आहेत आणि सरकारची फसवणूक करीत आहेत, या भ्रमात सरकार योजनांची अंमलबजावणी करत आहे. आॅनलाइन अर्ज घ्यायचे होते, तर आधीपासूनच तशी व्यवस्था करणे आवश्यक होते.मोगलाई आहे का?१पीककर्ज विमा उतरविण्यासाठी गेले तीन दिवस शेतकरी रांगा लावून उभे आहेत, त्यांना लाठ्या घालण्याचे काम चालू आहे. ही काय मोगलाई लागून गेली का, अशा शब्दांत राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांनी विधानसभेत सरकारवर हल्ला चढवला. पीकविम्याची मुदत वाढवून द्या, असे आपण गेल्याच आठवड्यात सांगितले होते, पण सरकारने ऐकले नाही. त्या वेळी ऐकले असते, तर आज दोन शेतकºयांचे हकनाव जीव गेले नसते, असेही पवार यांनी सुनावले.२तर शिवसेनेचे आ. जयप्रकाश मुंदडा यांनी मराठवाड्यात मोठ मोठ्या रांगा आहेत, मुदत वाढ दिली नाही, तर राज्यात दंगे उसळतील, असे सांगून सरकारला घरचा आहेत दिला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर टीका करताना गेल्या वर्षी १ कोटी १० लाख शेतकºयांनी विमा उतरविला होता, या वर्षी मुदत संपत आली, तर फक्त १५ लाख शेतकºयांनी विमा उतरविला आहे. तुम्हाला शेतकºयांचे भले करायचे आहे की, विमा कंपन्यांचे खिसे गरम करायचे आहेत, असेही विखे म्हणाले.बँकांनी सहकार्यकेले नाहीपंतप्रधान पीकविमा ही योजना केंद्राची आहे. त्यानुसार, राज्यात ही योजना राबविली जाते. या योजनेसाठी २० जूनला जीआर निघाला, परिपत्रक काढले. सुरुवातीच्या पंधरा दिवसांत राष्ट्रीयकृत बँकांनी सहकार्य केले नाही, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. या बँकांनी शेतकºयांना वेठीला धरले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.मृत शेतकºयाच्या कुटुंबीयांना पाच लाखपीकविमा भरण्यासाठी जात असताना, अपघाती मृत्यू पावलेल्या रामा पोत्रे या मृत शेतकºयांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत कृषिमंत्री फुंडकर यांनी जाहीर केली. मंचक इंगळे हा शेतकरी धर्मापुरी येथील बँक शाखेत अर्ज भरण्यासाठी जात होता. बँकेने त्याला धाटनांदूर येथील शाखेत जाण्यास सांगितले, पण वाटेतच त्याचा अपघाती मृत्यू झाला.