शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धनुष्यबाणाची ‘प्रत्यंचा’ झाली सैल

By admin | Updated: January 19, 2017 03:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे. हा वाद मिटल्याने त्याचा दूरगामी परिणाम रायगडच्या राजकारणावर होणार आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी धनुष्यबाणाची करकचून ताणलेली प्रत्यंचा सैल करावी लागली आहे. तटकरे यांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला निशाणा बनविणाऱ्यांना आता त्यांच्या राजकीय व्यूहरचनेत बदल करावा लागणार आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे कुटुंब एकत्र आल्याने शिवसेनेला हा मोठा हादरा बसला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यामधील वाद बऱ्याच कालावधीपासून सुरू होता. भाऊबंदकीमधील हा वाद काही लपून राहिलेला नव्हता. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जायची, परंतु वाद नसल्याचा आव दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमातून दाखवत होते. सुनील तटकरे यांनी राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची पदे उपभोगली. त्यांची कीर्ती, त्यांच्या सोबत सतत असणारा लवाजमा याची भुरळ कोणालीही पडली असतीच. सुनील तटकरे यांच्यासोबत असलेले हे वलय आपल्याभोवतीही घोंघावत राहावे, असे बंधू अनिल तटकरे यांना वाटणे स्वाभाविकच आहे. यासाठी त्यांनी आमदारकीचा हट्ट धरला, अनिल तटकरे विधान परिषदेवर निवडूनही आले. त्यानंतर त्यांचे पुत्र अवधूूत तटकरे यांना श्रीवर्धन मतदार संघातून उमेदवारी द्यावी, यासाठी आग्रह धरण्यात आल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. सुनील तटकरे हे विधान परिषदेवर निवडून गेल्याने श्रीवर्धन मतदार संघातून त्यांचा मुलगा अनिकेत अथवा मुलगी अदिती यांना उमेदवारी मिळावी असा तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आग्रह होता. परंतु पुतण्याच्या हट्टापायी ती जागा अवधूत तटकरे यांना सोडण्यात आली. अवधूत तेथे दोन आकडी मतांच्या फरकाने विजयी झाले.जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या पदावर सुनील तटकरे यांच्या वहिनी शुभदा तटकरे यांनाही सुनील तटकरे यांनी संधी दिली आहे हे नाकारून चालणार नाही. सततच्या या राजकीय संघर्षामुळे दोन कुटुंबात कलह निर्माण झाला होता.रोहा नगर पालिकेच्या निवडणुकीत अवधूत यांचे बंधू संदीप यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवधनुष्य हातात घेतले. संदीप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले उमेदवार संतोष पोटफोडे यांच्या विरोधात अर्ज दाखल करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. पोटफोडे काही मतांनी विजयी झाले, तर संदीप तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. आपल्या भांडणाचा फायदा इतर राजकीय पक्ष उचलत आहे याची जाणीव सुनील तटकरे यांना होती. त्यांच्या या गृहकलहात एकच व्यक्ती मध्यस्थी करु शकत होती आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी तटकरे बंधूंमध्ये शरद पवार यांनी समेट घडवून आणली. तटकरे कुटुंब एकत्र आल्याने त्याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणारआहे. >शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना चपराकबारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी तटकरे बंधूंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार यांनी समेट घडवून आणली. तटकरे कुटुंब एकत्र आल्याने त्याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे. तटकरे कुटुंबाच्या गृहकलहाचा फायदा घेऊन दक्षिण रायगडात राजकीय घोडदौड करता येईल, असे मनसुबे आखणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना ही फार मोठी चपराक बसली आहे. त्यामुळे त्यांना आता वेगळी राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे. यापुढे आता निवडणुकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.