शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

धनुष्यबाणाची ‘प्रत्यंचा’ झाली सैल

By admin | Updated: January 19, 2017 03:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे.

आविष्कार देसाई,

अलिबाग- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दरबारी तटकरे बंधूंमधील वाद अखेर मिटला आहे. हा वाद मिटल्याने त्याचा दूरगामी परिणाम रायगडच्या राजकारणावर होणार आहे. शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी धनुष्यबाणाची करकचून ताणलेली प्रत्यंचा सैल करावी लागली आहे. तटकरे यांच्या गृहकलहाचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला निशाणा बनविणाऱ्यांना आता त्यांच्या राजकीय व्यूहरचनेत बदल करावा लागणार आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तटकरे कुटुंब एकत्र आल्याने शिवसेनेला हा मोठा हादरा बसला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू आमदार अनिल तटकरे यांच्यामधील वाद बऱ्याच कालावधीपासून सुरू होता. भाऊबंदकीमधील हा वाद काही लपून राहिलेला नव्हता. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जायची, परंतु वाद नसल्याचा आव दोन्ही नेते सार्वजनिक कार्यक्रमातून दाखवत होते. सुनील तटकरे यांनी राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाची पदे उपभोगली. त्यांची कीर्ती, त्यांच्या सोबत सतत असणारा लवाजमा याची भुरळ कोणालीही पडली असतीच. सुनील तटकरे यांच्यासोबत असलेले हे वलय आपल्याभोवतीही घोंघावत राहावे, असे बंधू अनिल तटकरे यांना वाटणे स्वाभाविकच आहे. यासाठी त्यांनी आमदारकीचा हट्ट धरला, अनिल तटकरे विधान परिषदेवर निवडूनही आले. त्यानंतर त्यांचे पुत्र अवधूूत तटकरे यांना श्रीवर्धन मतदार संघातून उमेदवारी द्यावी, यासाठी आग्रह धरण्यात आल्याचे त्यावेळी बोलले गेले होते. सुनील तटकरे हे विधान परिषदेवर निवडून गेल्याने श्रीवर्धन मतदार संघातून त्यांचा मुलगा अनिकेत अथवा मुलगी अदिती यांना उमेदवारी मिळावी असा तेथील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा आग्रह होता. परंतु पुतण्याच्या हट्टापायी ती जागा अवधूत तटकरे यांना सोडण्यात आली. अवधूत तेथे दोन आकडी मतांच्या फरकाने विजयी झाले.जिल्हा परिषदेतील महत्त्वाच्या पदावर सुनील तटकरे यांच्या वहिनी शुभदा तटकरे यांनाही सुनील तटकरे यांनी संधी दिली आहे हे नाकारून चालणार नाही. सततच्या या राजकीय संघर्षामुळे दोन कुटुंबात कलह निर्माण झाला होता.रोहा नगर पालिकेच्या निवडणुकीत अवधूत यांचे बंधू संदीप यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवधनुष्य हातात घेतले. संदीप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले उमेदवार संतोष पोटफोडे यांच्या विरोधात अर्ज दाखल करून नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली. पोटफोडे काही मतांनी विजयी झाले, तर संदीप तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. आपल्या भांडणाचा फायदा इतर राजकीय पक्ष उचलत आहे याची जाणीव सुनील तटकरे यांना होती. त्यांच्या या गृहकलहात एकच व्यक्ती मध्यस्थी करु शकत होती आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार. बारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी तटकरे बंधूंमध्ये शरद पवार यांनी समेट घडवून आणली. तटकरे कुटुंब एकत्र आल्याने त्याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणारआहे. >शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना चपराकबारामती येथील त्यांच्या गोविंद बाग या निवासस्थानी तटकरे बंधूंमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसवा शरद पवार यांनी समेट घडवून आणली. तटकरे कुटुंब एकत्र आल्याने त्याचा फायदा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होणार आहे. तटकरे कुटुंबाच्या गृहकलहाचा फायदा घेऊन दक्षिण रायगडात राजकीय घोडदौड करता येईल, असे मनसुबे आखणाऱ्या शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना ही फार मोठी चपराक बसली आहे. त्यामुळे त्यांना आता वेगळी राजकीय व्यूहरचना आखावी लागणार आहे. यापुढे आता निवडणुकीत काय घडणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.