शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

पुरातत्त्व खात्याला तत्त्वच उरले नाही

By admin | Updated: January 25, 2016 02:45 IST

महाराष्ट्रात गडकिल्ल्यांची संपूर्णत: दुरवस्था झाली आहे. ज्या पुरातत्त्व खात्याला तत्त्वच शिल्लक राहिलेले नाही त्या खात्याकडून गडकिल्ल्यांचे संवर्धन कसे होणार

सिकंदर अनवारे,  महाड/दासगावमहाराष्ट्रात गडकिल्ल्यांची संपूर्णत: दुरवस्था झाली आहे. ज्या पुरातत्त्व खात्याला तत्त्वच शिल्लक राहिलेले नाही त्या खात्याकडून गडकिल्ल्यांचे संवर्धन कसे होणार, असा प्रश्न शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाच्या माध्यमातून पाचाड आणि किल्ले रायगडावर आयोजित रायगड महोत्सवाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. समारंभात उद्धव ठाकरे यांनी रायगडावरील विविध जिवंत देखावे पाहिले. राजदरबारात यावेळी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा सादर करण्यात आला. बाजारपेठेतून पुढे जाताना ठाकरे यांनी शिवसमाधीचे दर्शन घेतले. पाचाड येथील शिवसृष्टीजवळील सभेस मार्गदर्शन करताना ठाकरे यांनी नितीन देसाई यांनी केलेल्या किल्ले रायगडावरील जिवंत देखाव्यांचे कौतुक केले. पुरातत्त्व खात्याच्या दुर्लक्षामुळे गडावर काहीही शाबूत राहिले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. महाराष्ट्रातील गडांचे ऐतिहासिक महत्त्व माहीत नसणाऱ्या पुरातत्त्व खात्याच्या हातात राज्यातील गड आहेत. पुरातत्त्व विभागाच्या नियमाप्रमाणे सोमनाथ मंदिर कधीही झाले नाहीत तर राम मंदिर कधीही उभे राहणार नाही, असे ठाकरी शैलीतील विधान करीत गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी शिवसेना शासनासोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. समारोप सोहळ्याला विधान परिषद सभापती हरीभाऊ बागडे, उद्योग मंत्री सुभाष देसाई, शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, छ. संभाजी राजे, आमदार भारत गोगावले, आमदार मनोहर भोईर, इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे हेदेखील व्यासपीठावर उपस्थित होते.