शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

गेबाना नमाज ज्याच्या नावे पढला तो अरीब मजीद परतला

By admin | Updated: November 29, 2014 22:34 IST

ज्याच्या नावे गेबाना नमाज (मृत्यू नंतरचा अंतिम नमाज) पढला गेला, तो अरीब मजीद पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आला.

कल्याण : इस्लाम जगतात कधी न घडलेली अभूतपूर्व अशी घटना शुक्रवारी घडली. म्हणजे जो मृत झाला, असे समजून ज्याच्या नावे गेबाना नमाज (मृत्यू नंतरचा अंतिम नमाज) पढला गेला, तो  अरीब मजीद पुन्हा एकदा सगळ्या जगासमोर आला. 
कल्याणमधून जे युवक इसीसच्या इराकमधील संघर्षात जिहादी म्हणून गेले होते, त्यापैकी मजीद एक होता. तो इंजिनीअरिंगचा स्टुडंट होता. मे मध्ये तो आपल्या मित्रंसह यात्रेला जाण्याच्या नावाखाली भारताबाहेर पडला होता. शाहीर टंकी, फहाद शेख आणि अमन तांडेल यांच्यासह तो भारतातून बगदादला गेला होता आणि तिथून त्यांनी आपल्या पालकांना आपण इसीससाठी जिहादी होत असल्याची माहिती दिली होती. 26 ऑगस्ट रोजी टंकी याने मजीद एका बॉम्बस्फोटात ठार झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यामुळे तो मरण पावला, असे समजून त्याच्या नावे कुटुंबीयांनी अंतिम नमाज म्हणजे गेबाना नमाजही पढला होता. 
युद्ध करीत असताना तीन गोळ्या लागल्याने आपण जखमी झालो, परंतु आता आपली तब्येत ठणठणीत आहे, असे त्याने कुटुंबीयांशी फोनवर बोलताना म्हटले होते. त्याला भेटण्यासाठी त्याचे कुटुंबीय धाव घेते झाले होते. परंतु, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने  त्यांना भेटीची मनाई 
करून फक्त फोनवर बोलण्याची संधी दिली. मजीदच्या मुक्ततेसाठी त्याच्या कुटुंबीयांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना साकडे घातले होते. त्यानंतर, एनआयएने रॉच्या मदतीने त्यांचा ठावठिकाणा शोधला आणि त्यापैकी मजीदला भारतात तुर्कस्तानातून परत आणले. जोर्पयत मजीदची चौकशी पूर्ण होत नाही, तोर्पयत त्याची मुक्तता केली जाणार नसल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात विशेष सरकारी वकील उज्‍जवल निकम यांनी एटीएसच्या अधिका:यांनी शुक्रवारी भेट घेतली.  (विशेष प्रतिनिधी)
 
आमच्या मुलांची माथी भडकाविणा:यांना सजा द्या
ज्यांनी-ज्यांनी कुणी आमच्या मुलांची माथी भडकावली आणि त्यांना हा जीवघेणा खेळ खेळायला लावला, त्या-त्या सगळ्यांची चौकशी करून त्यांना सजा द्या, अशी मागणी या युवकांच्या कुटुंबीयांनी सरकारकडे केली आहे. या घटनेमुळे या तिघांचेही आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या कुटुंब आणि परिवारातील 5क् जणांचे जिणो हराम झाले आहे. याला जबाबदार कोण, असा सवालही त्यांनी केला आहे.
 
कसा झाला बेपत्ता?
423 मे रोजी तीन मित्रंसह इराकी धर्मस्थळांच्या यात्रेस गेला.
425 मे रोजी तो फालूजा पोहोचला.
426 ऑगस्ट रोजी मजीद बॉम्बस्फोटात ठार झाल्याचा टंकीचा दूरध्वनी.
428 ऑगस्ट रोजी इसीसच्या वेबसाइटवर मजीदचा विवाह रक्का येथे पॅलेस्टिनी युवतीशी झाल्याची माहिती नंतर तो शहीद झाल्याची माहिती 
4इसीसच्या वेबसाइटवर अबू-अली-अल-हिंदी या नावाने तो झळकला
4जखमी अवस्थेत तो तुर्कस्तानहून पळाला.
4वडिलांनी एनआयएशी संपर्क साधला व तिनेच त्याला भारतात आणले.
 
कोण आहे मजीद?
वय  : 23 वष्रे
नवी मुंबईमधील इंजिनीअरिंग कॉलेजमधील सिव्हीलचा विद्यार्थी
वडील :डॉक्टर, कल्याणच्या अन्सारी चौकात दवाखाना
बहीण :कल्याणमधील हॉस्पिटलात डॉक्टर 
बेपत्ता होण्यापूर्वी: 
4डेनिम जीन्सच्या पॅण्ट आणि पाश्चात्त्य धर्तीचे कपडे करून टाकले दान
4मोबाइल फोनचा वापर थांबवला
4बहिणीला नोकरी करण्यास आणि टीव्ही बघण्यास मनाई
4कुटुंबीय इस्लामबाह्य जगत असल्याची टीका करणारे पत्र लिहिले.
4तुम्ही ऐशआरामी आयुष्य जगत असल्याची मला लाज वाटते, असाही पत्रत उल्लेख.
4नगAता आणि उत्तानता याने भरलेले टीव्हीवरील कार्यक्रम बघणा:या स्वता:च्या कुटुंबीयांना लाखोली