शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मंजूर १०० कोटी, मिळाले १४ कोटी

By admin | Updated: December 14, 2014 00:38 IST

राज्यात सत्ताबदल झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याचे भाग्य मात्र बदलल्याचे दिसून येत नाही. राज्य सरकारकडून दोन्ही विभागांसाठी मंजूर १०० कोटी रुपयांचा विशेष निधी अद्याप मिळालेला नाही.

सरकार बदलले : विदर्भ-मराठवाड्याची थट्टा कायमकमल शर्मा - नागपूर राज्यात सत्ताबदल झाला असला तरी विदर्भ आणि मराठवाड्याचे भाग्य मात्र बदलल्याचे दिसून येत नाही. राज्य सरकारकडून दोन्ही विभागांसाठी मंजूर १०० कोटी रुपयांचा विशेष निधी अद्याप मिळालेला नाही. याअंतर्गत आघाडी शासन काळात मिळालेले १४ कोटी रुपये सुद्धा खर्च करण्याच्या अटींमुळे पडून आहेत. अनुशेष निर्मूलन आणि संतुलित प्रादेशिक विकासासाठी राष्ट्रपतींच्या आदेशानुसार वैधानिक विकास मंडळ स्थापन करण्यात आले. आपले विदर्भ प्रेम जगजाहीर करण्यासाठी या मंडळांच्या कामकाजाचा कालावधी आणखी पाच वर्षे वाढवण्याची शिफारस नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाने केली. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र हे राज्यातील तिन्ही मंडळ ३१ मार्च २०१५ नंतरही अस्तित्वात राहतील. परंतु मंडळांना देण्यात येणाऱ्या विशेष निधीचा मात्र सरकारला विसर पडला आहे. सरकार तिन्ही मंडळांना २००९-१०पर्यंत एकूण १०० कोटी रुपयांचा विशेष निधी उपलब्ध करून देत असे. लोकसंख्येच्या आधारावर सर्वाधिक ४० कोटी रुपये विदर्भाला मिळत होते. मंडळांनी केवळ अभ्यासाचे काम करावे, असे सांगत आघाडी शासनाने विशेष निधी बंद केला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने पावसाळी अधिवेशनानंतर विकास निधी देण्याचा निर्णय घेत प्रत्येक मंडळाला १०० कोटी रुपये देण्याची घोषणा केली. सरकारने घोषणा केली परंतु निधी मात्र दिला नाही.खूप आरडाओरड झाल्यावर १४ कोटी रुपये प्रदान करण्यात आले. परंतु हा निधी खर्च करण्याच्या अटी खूप जटील आहेत. त्यामुळे हा निधी खर्च कसा करायचा, असा प्रश्न मंडळापुढे पडला. अधिसूचनेनुसार या निधीपैकी ५० टक्के खर्च हा मानव विकास योजनांवर, ५ टक्के नवीन योजनांवर, ५ टक्के आदिवासी विकास, ३ टक्के अपंगांसाठी आणि उर्वरित रक्कम रस्ते, गटार आणि नाल्यांची कामे सोडून इतर कामांवर खर्च करायचा आहे. मंडळांना नवीन सरकारकडून खूप अपेक्षा होत्या. परंतु त्यांच्या पूरक मागण्यांमध्ये सुद्धा याचा उल्लेख नाही. अधिकारी आता दावा करीत आहेत की, हा निधी दुसऱ्या कामासाठी वळविण्यात आला असेल. खर्च कसा करावा विदर्भ वैधानिक विकास मंडळाने वित्त व योजना मंत्रालयाला पत्र लिहून विचारणा केली आहे की, मिळालेला विकास निधी खर्च कसा करायचा. मंडळाने जटील अटी हटविण्याची विनंती सुद्धा केली आहे. जिल्हाधिकारी आणि संंबधित अधिकाऱ्यांसोबत चार बैठका घेऊन मंडळाने प्रस्ताव मागविले आहे. काही प्रस्ताव आले सुद्धा. परंतु कोणत्या कामासाठी निधी दिला जावा, हे स्पष्ट नाही. याच महिन्यात होणाऱ्या मंडळाच्या बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे.