शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या घटनाबाह्य नेमणुका

By admin | Updated: October 31, 2015 01:43 IST

राज्यातील फडणवीस सरकारने घटनाबाह्य पद्धतीने मंत्रालयात अनेक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.

मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारने घटनाबाह्य पद्धतीने मंत्रालयात अनेक अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी महाराष्ट्र सर्व्हिस रूल्सच्या बाहेर जाऊन नेमणुका होऊ शकत नाहीत. असे असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात सहा अधिकाऱ्यांच्या नेमणुका नियमबाह्य रीतीने करण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये कौस्तुभ धावशे (ओएसडी), निधी कामदार (ओएसडी), प्रिया खान (ओएसडी), रविकिरण देशमुख (जॉइंट सेक्रेटरी मीडिया), केतन पाठक (ओएसडी मीडिया सीएमओ), सुमित वानखेडे (ओएसडी) यांचा समावेश आहे. अशाच पद्धतीने अन्य विभागांतही नियमबाह्य नेमणुका करण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.या नेमणुका कोणत्या निकषावर केल्या गेल्या, त्यासाठी जाहिरात दिली होती का, त्यांच्या कामाचे स्वरूप काय आणि त्यांना दिव्याच्या गाड्या घेऊन फिरण्याचे अधिकार आहेत का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत, असे आवाहन मलिक यांनी केले. मद्रास उच्च न्यायालयाने बॅकडोअर प्रवेशांना मनाई केली आहे. मंत्रालयात सचिवपदावरील अधिकाऱ्यांची नियुक्ती एमपीएससी आणि यूपीएससीमार्फत केली जाते. परंतु या पदावर अशासकीय लोकांना नेमल्यामुळे मुख्यमंत्र्यांचा शासकीय अधिकाऱ्यांवर विश्वास नाही, हेदेखील स्पष्ट झाले आहे. शिवाय मंत्रालय हेरांचा अड्डा बनले असून, अशा पद्धतीने हेरांची फौज मंत्रालयात फिरत आहे. त्यामुळे या नेमणुका गुजरात किंवा नागपूरमधून केल्या आहेत का, असा सवालही मलिक यांनी केला आहे. ही तर धूळफेक - भुजबळयुती सरकारचा वर्षपूर्तीनिमित्त १ हजार कोटी रुपयांच्या नव्या रस्त्यांची भेट हा कार्यक्रम निव्वळ धूळफेक असून, जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. ते म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर असलेल्या हजार कोटी रुपयांच्या कामांचे एकाच दिवशी भूमिपूजन करून रस्त्यांची नवीन योजना असल्याचे दाखवले जात आहे. प्रत्यक्षात मात्र सन २०१५-१६च्या अर्थसंकल्पात मंजूर असलेली कामे ही नियमित कामे असून, त्यातील बहुतांश कामांचे स्थानिक आमदारांनी आधीच भूमिपूजन करून काही कामे चालू झालेली आहे. (विशेष प्रतिनिधी)