शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

निवड होऊनही नियुक्तीसाठी वणवण

By admin | Updated: January 19, 2017 05:46 IST

पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे.

मुंबई : पोलीस शिपाई भरतीत निवड होऊनही लाल फितीच्या कारभारामुळे वाशिमच्या तरुणाची गेली दोन वर्षे वणवण सुरू आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असतानाच, गृह विभागाने राज्यातील जिल्ह्यांतील अशी दप्तर दिरंगाईच्या प्रकरणाची माहिती मागविली आहे. या माहितीनंतर एकदंरीत प्रकरणे मार्गी लावणार आहे. नियुक्तीचे स्वप्न आणखीन लांबणीवर गेल्याने याउमेदवाराच्या अडचणीत भर पडली आहे. त्यामुळे न्याय मिळणार की नाही? असा प्रश्न त्याच्यासमोर आ वासून उभा आहे. वाशिम जिल्ह्याच्या वरुड खुर्दमध्ये राहणारा विठ्ठल सीताराम सुर्वे. वृद्ध आईवडील आणि गतिमंद भावाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आहे. पार्ट टाईम नोकरी करून शिक्षण पूर्ण केले. पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बांधून त्याने २०१४मध्ये पोलीस शिपाई भरतीत उडी घेतली. २० जून, २०१४च्या वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालय येथे लागलेल्या अंतिम गुणवत्ता यादीत तो ओबीसीतून (इतर मागासवर्गीय प्रवर्ग) १७६ गुणांसह प्रतीक्षा यादीत प्रथम क्रमांकावर होता. निवड यादीतील राजेश केशव देवळे याने इतर ठिकाणी नोकरी लागल्याने स्वत:ची निवड रद्द करण्याचा अर्ज केला. त्यामुळे सुर्वे त्या ठिकाणी पात्र ठरला. मात्र, त्याची दखल घेणे कोणी गरजेचे समजले नाही. १५ महिन्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून त्याची पोलीस शिपाईपदी निवड झाल्याचे सांगण्यात आले. उशिरा का होईना प्रशासनाने दखल घेतली म्हणून सुर्वे कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. वैद्यकीय चाचणी आणि चारित्र्य पडताळणी झाली. दोन्हींमध्ये पात्र असतानाही नियुक्ती मिळाली नाही. याच काळात अधीक्षक बदलले. नवीन आलेल्या अधीक्षकांनी त्यांना ३० मार्च, २०१६ रोजी पत्र पाठवून प्रतीक्षा यादीचा कालावधी १ वर्षाचा असून, त्यात ३ महिने २८ दिवस उशीर झाल्याचे सांगून नियुक्तीस पात्र नसल्याचे सांगितले. प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभाराचा आपल्याला फटका का? असा सवाल सुर्वे कुटुंबीय करत आहेत. २०१६ उलटून २०१७ सुरू झाले. मात्र, अजूनही त्याची नियुक्तीसाठीची धडपड सुरू आहे. (प्रतिनिधी)। अप्पर पोलीस महासंचालकांकडून सादर करण्यात आलेल्या अहवालात सामान्य प्रशासन विभागाकडूनही अभिप्राय घेण्यात आला. त्या अभिप्रायात ‘सदर कालमर्यादा नियम पोलीस भरतीकरिता लागू होत नाही,’ असे नमूद करण्यात आल्याचे समजते.त्यामुळे ज्या नियमांच्या आधारे मला डावलण्याचा प्रयत्न केला जात आहे तो चुकीचा असल्याचे सुर्वेचे म्हणणे आहे. नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला. नियुक्तीची स्वप्ने पुन्हा रंगवित असतानाच गृहविभागाच्या अनोख्या न्यायामुळे त्याच्या अडचणीत भर पाडली आहे.न्याय न मिळाल्यास सुर्वेने आत्महत्येचा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन याकडे काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे आहे. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, ते संपर्कात येऊ शकले नाहीत.