शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

७३० कृषिसेवकांना मिळणार नियुक्ती, ‘मॅट’चा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:57 IST

कृषिसेवकांची ७३० पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विभागवार निवड याद्यांनुसारच नेमणुका करण्याचा आदेश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिल्याने, गेले वर्षभर प्रतीक्षा करणा-या यशस्वी उमेदवारांना अखेर नियुक्त्या मिळणार आहेत.

- विशेष प्रतिनिधी

मुंबई : कृषिसेवकांची ७३० पदे भरण्यासाठी घेतलेल्या परीक्षेतील गुणांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या विभागवार निवड याद्यांनुसारच नेमणुका करण्याचा आदेश, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) दिल्याने, गेले वर्षभर प्रतीक्षा करणा-या यशस्वी उमेदवारांना अखेर नियुक्त्या मिळणार आहेत.या परीक्षेत घोटाळा आणि गैरप्रकार झाल्याचे कारण देत, कृषी खात्याने ही संपूर्ण निवड परीक्षाच रद्द करून, त्याऐवजी अर्जदार उमेदवारांची शालांत व पदविका परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून, त्यानुसार नेमणुका करण्याचा निर्णय १७ मार्च रोजी घेतला होता.परीक्षेत यशस्वी होऊन निवड यादीत समावेश झालेल्या एकूण २२४ उमेदवांनी याविरुद्ध ‘मॅट’मध्ये एकूण तीन याचिका दाखल केल्या होत्या. ‘मॅट’चे अध्यक्ष न्या. अंबादास जोशी व सदस्य राजीव अग्रवाल यांनी गुरुवारी या याचिका मंजूर केल्या व निवड यादी रद्द करून, त्याऐवजी शैक्षणिक गुणवत्तेवर नेमणुका करण्याचा सरकारचा निर्णय रद्द केला.न्यायाधिकरणाने म्हटले की, सरकारने केलेल्या चौकशीमध्ये १०५ उमेदवारांच्या बाबतीत त्यांचे नाव, लिंग, जन्मतारीख, जात इत्यादीची माहिती परीक्षा झाल्यानंतर बदलण्यात आल्याचे दिसते. यापैकी कोणी निवड यादीतही असतील, तर त्यांच्या माहितीची पूर्ण खातरजमा करून, मगच नेमणुका देण्याचा पर्याय स्वीकारता येईल, पण त्यासाठी सर्वच निवड यादी रद्द करण्याचे काही कारण नाही.न्यायाधिकरणाने असेही म्हटले की, कोणाच्या गुणांमध्ये फेरफार केल्याचे चौकशीतून दिसले नाही. जेव्हा एखाद्या परीक्षेत सर्वव्यापी असा गैरप्रकार होतो व त्याचा लाभ झालेले न झालेले वेगळे काढणे अशक्य असते, त्याच वेळी संपूर्ण परीक्षा रद्द करणे न्यायाचे ठरते, असे सर्वोच्च न्यायालयाचे निकाल आहेत. प्रस्तुत परीक्षेत तशी स्थिती नाही. ज्यांच्या बाबतीत संशय आहे, ते ओळखून वेगळे काढणे शक्य आहे. या सुनावणीत अर्जदार परीक्षार्थींसाठी अ‍ॅड. सतीश तळेकर, अ‍ॅड. रंजना तोडणकर व अ‍ॅड. पी. एस. पाठक यांनी काम पाहिले. सरकारतर्फे विशेष वकील एस. के. नायर व सरकारी वकील एस. के. सूर्यवंशी आणि के. बी. भिसे यांनी बाजू मांडली.बाहेरच्या एजन्सीचा घोळकृषी आयुक्तांनी ही परीक्षा घेण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविली. परिषदेने हे काम पुण्याच्या मे. गजाजन एंटरप्रायजेस या बाहेरच्या एजन्सीकडून करून घेतले. परीक्षेसाठी वापरलेले संगणकीय सॉफ्टवेअर तयार करणे, उत्तरपत्रिका तपासून गुण देणे व गुणवत्ता याद्या तयार करणे ही सर्व कामे मे. गजाजन एजन्सीनेच केली. एका टप्प्याला कृषी खात्याच्या प्रध़ान सचिवांनी या गजाजन एजन्सीवर गुन्हा नोंदविण्याचा शेरा फाइलवर लिहिला होता. विधि आणि न्याय विभागाचा सल्ला घेतला असता, त्यांनी प्रतिकूल शेरा दिला होता. विधिमंडळातही यावरून गदारोळ झाला होता.