शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना किमान ३० ऐवजी २० विद्यार्थ्यांचे निकष लागू

By admin | Updated: September 3, 2016 20:01 IST

अल्पसंख्यांक शाळा सुरु करताना किमान ३० विद्यार्थी संख्या आवश्यक असल्याबाबतचा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय सकृदर्शनी कायद्याशी विसंगत असल्याचा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला

- ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा
सकृदर्शनी १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय कायद्याशी विसंगत
शासन निर्णयात ३० ऐवजी २० विद्यार्थी अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश
औरंगाबाद, दि. 3 - अल्पसंख्यांक शाळा सुरु करताना किमान ३० विद्यार्थी संख्या आवश्यक असल्याबाबतचा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय सकृदर्शनी कायद्याशी विसंगत असल्याचा निर्वाळा  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.  त्या शासन निर्णयात ‘विद्यार्थी संख्या ३० ऐवजी २०’ अशी दुरुस्ती करण्याचे निर्देशचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. संगीतराव एस. पाटील यांनी शासनास दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे याचिकाकर्ते प्रा. शेख मन्सुर यांनी आज एका पत्रपरिषदेत सांगितले. 
त्यांनी पुढे सांगीतले की, महाराष्ट्र शासनाने विना अनुदानीत शाळांना अनुदान लागू करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०११ रोजी शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयाद्वारे विना अनुदानीत शाळांना अनुदान लागू करण्यासाठीचे निकष व अटी निर्धारीत केल्या. त्यात अनेक जाचक अटी असल्यामुळे राज्यातील अनेक शाळा आणि विशेषत: अल्पसंख्यांक शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या. १५ नोव्हेंबर २०११ च्या आणि १६ जुलै २०१३ च्या शासन निर्णयाद्वारे किमान विद्यार्थी संख्येच्या निकषामधून अल्पसंख्यांक शाळांना वगळण्यात आले होते. 
म्हणुन महाराष्ट्र उर्दु शाळा संघर्ष समिती आणि औरंगाबाद  व जालना जिल्ह्यातील ११ शैक्षणिक संस्थांनी अ‍ॅड. विजयकुमार डी. सपकाळ यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. अ‍ॅड. सपकाळ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, माध्यमिक शाळा संहिता आणि बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा २००९ मध्ये ‘किमान विद्यार्थी संख्या २० असावी’, असे निकष आहेत. या कायद्यांशी ‘किमान विद्यार्थी संख्या ३० असावी’ असा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय विसंगत आहे. या शासन निर्णयापुर्वी  राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना पद मंजुरी व अनुदानासाठी विद्यार्थी संख्येचे जे निकष आदिवासी , डोंगराळ व नक्षली भागासाठी लागू होते, तेच निकष अल्पसंख्यांक शाळांना सुद्धा लागू होते. १० फेब्रुवारी १९९४ च्या शासन निर्णयानुसार भाषिक अल्पसंख्यांक शाळांमध्ये ‘किमान विद्यार्थी संख्या’ केवळ १५ निर्धारीत केली होती. यावरुन भाषिक अल्पसंख्यांक शाळांना ‘विशेष सूट ’ दिली होती, याकडे अ‍ॅड. सपकाळ यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. शासनातर्फे १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय योग्य असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. तसेच याचिका फेटाळण्याची विनंती करण्यात आली. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.