शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना किमान ३० ऐवजी २० विद्यार्थ्यांचे निकष लागू

By admin | Updated: September 3, 2016 20:01 IST

अल्पसंख्यांक शाळा सुरु करताना किमान ३० विद्यार्थी संख्या आवश्यक असल्याबाबतचा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय सकृदर्शनी कायद्याशी विसंगत असल्याचा निर्वाळा औरंगाबाद खंडपीठाने दिला

- ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद खंडपीठाचा निर्वाळा
सकृदर्शनी १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय कायद्याशी विसंगत
शासन निर्णयात ३० ऐवजी २० विद्यार्थी अशी दुरुस्ती करण्याचे निर्देश
औरंगाबाद, दि. 3 - अल्पसंख्यांक शाळा सुरु करताना किमान ३० विद्यार्थी संख्या आवश्यक असल्याबाबतचा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय सकृदर्शनी कायद्याशी विसंगत असल्याचा निर्वाळा  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.  त्या शासन निर्णयात ‘विद्यार्थी संख्या ३० ऐवजी २०’ अशी दुरुस्ती करण्याचे निर्देशचे न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. संगीतराव एस. पाटील यांनी शासनास दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना मोठा दिलासा मिळाला असल्याचे याचिकाकर्ते प्रा. शेख मन्सुर यांनी आज एका पत्रपरिषदेत सांगितले. 
त्यांनी पुढे सांगीतले की, महाराष्ट्र शासनाने विना अनुदानीत शाळांना अनुदान लागू करण्यासाठी १५ नोव्हेंबर २०११ रोजी शासन निर्णय जारी केला. या शासन निर्णयाद्वारे विना अनुदानीत शाळांना अनुदान लागू करण्यासाठीचे निकष व अटी निर्धारीत केल्या. त्यात अनेक जाचक अटी असल्यामुळे राज्यातील अनेक शाळा आणि विशेषत: अल्पसंख्यांक शाळा अनुदानापासून वंचित राहिल्या. १५ नोव्हेंबर २०११ च्या आणि १६ जुलै २०१३ च्या शासन निर्णयाद्वारे किमान विद्यार्थी संख्येच्या निकषामधून अल्पसंख्यांक शाळांना वगळण्यात आले होते. 
म्हणुन महाराष्ट्र उर्दु शाळा संघर्ष समिती आणि औरंगाबाद  व जालना जिल्ह्यातील ११ शैक्षणिक संस्थांनी अ‍ॅड. विजयकुमार डी. सपकाळ यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. अ‍ॅड. सपकाळ यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले की, माध्यमिक शाळा संहिता आणि बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा कायदा २००९ मध्ये ‘किमान विद्यार्थी संख्या २० असावी’, असे निकष आहेत. या कायद्यांशी ‘किमान विद्यार्थी संख्या ३० असावी’ असा १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय विसंगत आहे. या शासन निर्णयापुर्वी  राज्यातील अल्पसंख्यांक शाळांना पद मंजुरी व अनुदानासाठी विद्यार्थी संख्येचे जे निकष आदिवासी , डोंगराळ व नक्षली भागासाठी लागू होते, तेच निकष अल्पसंख्यांक शाळांना सुद्धा लागू होते. १० फेब्रुवारी १९९४ च्या शासन निर्णयानुसार भाषिक अल्पसंख्यांक शाळांमध्ये ‘किमान विद्यार्थी संख्या’ केवळ १५ निर्धारीत केली होती. यावरुन भाषिक अल्पसंख्यांक शाळांना ‘विशेष सूट ’ दिली होती, याकडे अ‍ॅड. सपकाळ यांनी खंडपीठाचे लक्ष वेधले. शासनातर्फे १५ नोव्हेंबर २०११ चा शासन निर्णय योग्य असल्याचे म्हणणे मांडण्यात आले. तसेच याचिका फेटाळण्याची विनंती करण्यात आली. सुनावणीअंती खंडपीठाने वरीलप्रमाणे आदेश दिला.