शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

विधान मंडळाच्या महिला समितीच्या शिफारशी लागू करा- नीलम गोऱ्हे

By admin | Updated: November 7, 2016 21:26 IST

दोन्ही सभागृहांच्या महिला समितीने २००४ मध्ये केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आमदार निलम गोऱ्हे यांनी सोमवारी खामगाव येथील पत्र परिषदेत सांगितले.

ऑनलाइन लोकमतखामगाव (जि. बुलडाणा), दि. 7 - आदिवासी तसेच इतर निवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींवरील अत्याचार थांबविण्यासाठी विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या महिला समितीने २००४ मध्ये केलेल्या शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे आमदार निलम गोऱ्हे यांनी सोमवारी खामगाव येथील पत्र परिषदेत सांगितले.नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील बर्डी येथील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचारानंतर विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांनी महिला तदर्थ समिती नेमली होती. आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींवरील अत्याचार थांबावे यासोबतच विद्यार्थिनींना सुरक्षिततेचे वातावरण मिळावे यासाठी समितीकडून शिफारशी मागविण्यात आल्या होत्या. विधानसभा व विधान परिषद सदस्य असलेल्या १३ महिलांचा समावेश असलेल्या या समितीने शासनाला २००४ मध्ये ४० पानी अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार आश्रम शाळांमध्ये अंमलबजावणी झाली असती तर आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींच्या अत्याचाराचे प्रकरण थांबले असते, असे मत आमदार गोऱ्हे यांनी यावेळी व्यक्त केले. दरम्यान आश्रम शाळांमधील विद्यार्थिनींवरील वाढलेले अत्याचार पाहता शासनाने सर्वच जिल्ह्यांमध्ये महिला पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमावी आणि या दक्षता समितीने आश्रम शाळेमध्ये विद्यार्थिनी सुरक्षित आहेत किंवा नाही यासंदर्भात तपासण्या कराव्यात अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाळा येथील आश्रम शाळेतील प्रकरणात नेमण्यात आलेले विशेष तपासणी पथक योग्यरितीने तपास करीत आहे. सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठीही शिवसेना प्रयत्नशिल राहील, असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. पाळा येथील प्रकरणासाठी खामगाव येथे पास्को न्यायालय निर्माण करण्याबाबत पोलिसांकडून प्रस्ताव दिल्या जाणार असल्याचे आमदार गोऱ्हे यांनी सांगितले. पत्रपरिषदेला आमदार संजय रायमुलकर, आमदार शशिकांत खेडेकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील व जालिंधर बुधवंत आदी उपस्थित होते.आता राकाँ नेते तुरुंगात स्थिर झालेआदिवासी विभागामध्ये गैरप्रकार वाढले असून पाळा आश्रम शाळेसारख्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यासंदर्भात आमदार गोऱ्हे यांना प्रश्न केला असता स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी काहीठिकाणी राष्ट्रवादी भाजपसोबत आहेत. त्यामुळे केवळ आदिवासींच्या समाधानासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी असा आरोप केला असेल, असा टोला आमदार गोऱ्हे यांनी लगावला. राज्यात भाजपचे स्थिर सरकार रहावे यासाठी सर्वप्रथम राष्ट्रवादीच समोर आली होती. याबाबत त्यांना विचारले असता त्यामुळेच आता राष्ट्रवादीचे नेते तुरुंगात स्थिर झाल्याचे त्यांनी मिश्कीलपणे सांगितले.