शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सर्व संघांना दूध दरवाढ लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:51 IST

राजू शेट्टी : मुंबईतील बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कजयसिंगपूर : राज्य सरकारने दुधाची दरवाढ लागू केलेली दरवाढ फक्त कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील दूध संघच देत आहेत. इतर जिल्ह्यातील दूध संघ दरवाढ देण्यास टाळाटाळ करत असून, ही दरवाढ राज्यातील सगळ्याच दूध संघांना लागू करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी केली. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील दूध संघाच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. सोमवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीत खासदार शेट्टी यांनी ही मागणी केली. राज्यातील ३० दूध संघांचे प्रतिनिधी उपस्थित होते. खासदार शेट्टी म्हणाले, शेतकरी आंदोलनानंतर सरकारने राज्यात दुधाला तीन रुपये प्रतिलिटर दरवाढ केली. सरकारचा हा आदेश सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघांनी मानलेला आहे. मात्र सातारासह बहुतांश जिल्ह्यांत दुधाच्या दरात कोणतीही वाढ केलेली नाही. दुधाच्या पॅकिंगचा तसेच इतर खर्चात वाढ झाल्याचे कारण सांगून दुधाची दरवाढ करण्यास टाळाटाळ केली जात आहे. याचा फटका राज्यातील दूध उत्पादकांना बसत आहे. ही दरवाढ राज्यातील सर्वच दूध उत्पादक संघांना लागू करण्यात यावी. केंद्र सरकारकडे दूध पावडरला निर्यात अनुदान म्हणून १० टक्के देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी राज्य सरकारने त्वरीत पाठपुरावा करावा. राज्यात एकूण दुधापैकी १० टक्के दूध हे भेसळयुक्त असून यावर आळा घालण्याची गरज असल्याची खासदार शेट्टी यांनी मागणी केली. यावेळी अनेक दूध संघांनी दूध व्यवसायासंदर्भात येत असलेल्या अडचणी मांडल्या. यावेळी आमदार अमल महाडिक, महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकदादा पाटील, गोकुळ दूध संघाचे व्यवस्थापक डी. बी. घाणेकर, गिरीष चितळे, सोनाई दूधचे मोहन माने, विविध दूध संघांचे अध्यक्ष, खासगी दूध संघांचे मालक उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांचे आश्वासनमंत्री महादेव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून सर्व उपाययोजनांचा प्रस्ताव सादर करेल. त्यावर या उपाययोजना अमलात आणल्या जातील. राज्यातील सर्वच दूध संघ एकाच ब्रँण्डखाली यावेत. जेणेकरून दुधाचा व्यवसाय सुरळीत पार पडेल. राज्यात दुधाचे मोठे मार्केट आहे. ते इतर राज्यांनी बळकावण्याऐवजी एकच ब्रॅण्ड करून दूध संघांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. दूध व्यवसायासाठी चढ-उतार निधीची तरतूद करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले.