शहरं
Join us  
Trending Stories
1
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
2
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
3
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
4
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
5
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
6
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
7
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
8
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
9
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
10
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान
11
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
12
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
13
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
14
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
15
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
16
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
17
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
18
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
19
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
20
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...

साध्वी प्रज्ञासिंगच्या जामिनाविरुद्ध अर्ज

By admin | Updated: June 19, 2016 03:00 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीने वेगळे वळण घेतले आहे. साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध व समर्थन करणारे मध्यस्थी

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिच्या जामीन अर्जाच्या सुनावणीने वेगळे वळण घेतले आहे. साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध व समर्थन करणारे मध्यस्थी अर्ज विशेष न्यायालयात दाखल करण्यात आले आहेत. शुक्रवारी विशेष एनआयए न्यायालयाने तिच्या जामीन अर्जाला विरोध करणाऱ्या अर्जाला परवानगी दिली असली, तरी तिच्या जामीन अर्जाचे समर्थन करणाऱ्या अर्जावरील निर्णय राखून ठेवला आहे. मालेगाव २००८ बॉम्बस्फोटाप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने साध्वीसह अन्य तिघांविरुद्ध ठोस पुरावे नसल्याने त्यांचे नाव आरोपपत्रातून वगळले, तसेच सर्व आरोपींवरील मोक्का हटवला. त्यामुळे साध्वीने विशेष न्यायालयात जामीन अर्ज केला. मात्र, तिच्या जामीन अर्जाला विरोध करणारा मध्यस्थी अर्ज बॉम्बस्फोटातील एका पीडिताने दाखल केला, तर तिची जामिनावर सुटका करण्यात यावी, यासाठी दीपक पारेख यांनीही मध्यस्थी अर्ज दाखल केला आहे. निसार बिलाल यांनी एनआयएने दाखल केलेले आरोपपत्र रद्द करण्यात यावे. त्याचबरोबर, दहशतवाद प्रतिबंधक पथकाला (एटीएस) प्रतिवादी करावे, अशी मागणी बिलाल यांनी मध्यस्थी अर्जात केली आहे. शुक्रवारच्या सुनावणीत विशेष न्यायालयाने बिलाल यांना मध्यस्थी करण्याची परवानगी दिली. मात्र, एटीएसला प्रतिवादी करण्याच्या मागणी फेटाळली.देवांग पारीख नावाच्या व्यक्तीनेही साध्वी प्रज्ञासिंगच्या जामीन अर्जात मध्यस्थी अर्ज केली आहे. पारीख यांनी आपण साधक असल्याचे अर्जात म्हटले आहे. ‘मालेगाव २००६ च्या आरोपींना एनआयने क्लीनचिट दिल्यानंतर, त्यांना जामीन मिळाला. त्यांच्या जामीन अर्जाला कोणीही विरोध केला नाही, परंतु साध्वीच्या जामीन अर्जाला विरोध करण्यात येत आहे. तिचे नाव आरोपपत्रातून वगळूनही तिला कारागृहात ठेवण्यात आले आहे. सरकार तिच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करत आहे,’ असा युक्तिवाद पारीख यांच्या वतीने अ‍ॅड. सुभाष झा यांनी विशेष न्यायालयापुढे केला. (प्रतिनिधी)- विशेष न्यायालयाने पारीख यांच्या अर्जावर सरकारला सोमवारपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. सप्टेंबर २००८ मध्ये मालेगावातील एका मशिदीजवळ बॉम्बस्फोट करण्यात आला. या बॉम्बस्फोटात ३७ जण मृत्युमुखी पडले होते.