शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
4
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
5
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
6
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
7
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
8
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
9
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
10
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
11
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
12
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
13
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
14
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
15
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
16
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
17
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
18
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
19
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
20
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी

अर्जदारांना कोर्टाने घेतले फैलावर!

By admin | Updated: November 18, 2015 02:44 IST

नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर बुधवारपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार

मुंबई : नाशिक, अहमदनगर जिल्ह्यांतील धरणांतून मराठवाड्यासाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्यासंदर्भात दाखल असलेल्या याचिकांवर बुधवारपासून उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाने केवळ दोन मुख्य याचिकांवर आॅक्टोबरमध्ये अंतरिम आदेश दिला. सर्व याचिकांवर सुनावणी घेतलीच नाही, ही बाब तुम्ही सर्वोच्च न्यायालयापासून लपवली, अशा शब्दांत मंगळवारी न्या. अभय ओक यांनी नाशिक-नगरच्या याचिकाकर्त्यांना फैलावर घेतले.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून १२.८४ टीमएसी पाणी सोडण्याची परवानगी उच्च न्यायालयाने गेल्याच महिन्यात दिली. त्या विरोधात नाशिक व नगरच्या रहिवाशांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. मात्र, या याचिकांवरील अंतिम सुनावणी १८ नोव्हेंबरपासून घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाला दिले. मंगळवारी न्या. अभय ओक व न्या. गौतम पटेल यांच्या खंडपीठापुढे याचिकेवर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला काही बाबी न सांगितल्याने, न्या. ओक यांनी याचिकाकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले. या संदर्भात अनेक याचिका सादर करण्यात आल्या आहेत. त्यातील बऱ्याच याचिका अद्याप दाखल करून घेण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे अंतिम सुनावणी कशी घ्यायची, असेही न्यायालयाने सुनावले.खंडपीठाने पुढील सुनावणी १७ डिसेंबर रोजी ठेवली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे खंडपीठाला या याचिकांवरील अंतिम सुनावणी बुधवारपासून घ्यावी लागणार आहे. गोदावरी-मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने १९ सप्टेंबरला जायकवाडीमध्ये नाशिक-नगरच्या धरणांतून १२.८४ टीमएसी पाणी सोडण्याच्या घेतलेल्या निर्णयालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)