शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘सुगम्य’ची जाहीरात करता, सुविधांसाठी पैसे नाहीत

By admin | Updated: April 20, 2017 19:58 IST

दिव्यांगांच्या सक्षमिकरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या सुगम्य भारत अभियानाच्या जाहीरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करता

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - दिव्यांगांच्या सक्षमिकरणासाठी जाहीर करण्यात आलेल्या सुगम्य भारत अभियानाच्या जाहीरातीवर कोट्यवधी रुपये खर्च करता, पण दिव्यांगांना प्रत्यक्ष सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तुमच्याकडे पैसे का नाहीत असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी केंद्र शासनाला विचारून शासनाच्या उदासीन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
 
केंद्र व राज्य शासनाची विविध कार्यालये असलेल्या इमारतींमध्ये दिव्यांगांना रॅम्प, लिफ्ट, स्वच्छतागृहे, राखीव पार्किंग इत्यादी सुविधा उपलब्ध होण्यासाठी इंद्रधनू या सामाजिक संस्थेने जनहित याचिका दाखल केली आहे. याप्रकरणात पोस्ट मास्टर जनरल यांनी प्रतिज्ञापत्र सादर करून शहरातील टपाल विभागाच्या ७ इमारतींमध्ये दिव्यांगांना पोर्टेबल रॅम्प व हॅन्ड रेल उपलब्ध करून देण्यासाठी ३ लाख ८ हजार रुपये खर्च येणार असून हा निधी मंजूर झाल्यानंतर ४ महिन्यांमध्ये या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील अशी माहिती न्यायालयाला दिली. केवळ ३ लाख ८ हजार रुपये खर्चासाठी केंद्र शासन मागेपुढे पहात असल्याची बाब लक्षात घेता न्यायालय संतप्त झाले. न्यायालयाने केंद्र शासनाला फटकारून टपाल कार्यालयांच्या इमारतींमध्ये दिव्यांगांना संबंधित सुविधा कधीपर्यंत उपलब्ध करून देणार यावर २७ एप्रिल रोजी ठोस उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. अनुप गिल्डा, केंद्र शासनातर्फे अ‍ॅड. अंबरीश जोशी तर, महानगरपालिकेतर्फे अ‍ॅड. जेमिनी कासट यांनी बाजू मांडली.
 
ही दुसरी जनहित याचिका-
संस्थेने समान मुद्यावर दाखल केलेली ही दुसरी जनहित याचिका होय. शासकीय इमारतींमध्ये दिव्यांगांना एक वर्षात नियमानुसार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, नवीन इमारतींना नियमाधीन राहूनच परवानगी देण्यात येईल आणि  महानगरपालिकेंतर्गत येणाºया पण इतरांच्या मालकीच्या इमारतींमध्ये संबंधित सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगू, अन्यथा कारवाई करू अशी ग्वाही महानगरपालिकेने दिल्यानंतर न्यायालयाने संस्थेची पहिली जनहित याचिका निकाली काढली होती. परंतु, महानगरपालिकेने ग्वाहीचे पालन केले नाही. परिणामी संस्थेने दुसºयांदा न्यायालयात धाव घेतली आहे.