शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

पोलिसांकडून सावधगिरीचे आवाहन

By admin | Updated: May 15, 2017 05:57 IST

मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईतून २६ पाकिस्तानी बेपत्ता असल्याबाबत अधिकृतपणे अद्याप आमच्यापर्यंत कसलीही माहिती आलेली नाही. मात्र आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेत असून आपल्या परिसरात संशयास्पद व्यक्ती, वस्तू निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी म्हटले आहे.जुहू परिसरात राहत असलेला एक पाकिस्तानी दुकानदार व अन्य २५ पाक नागरिक मुंबईतून अचानक नाहिसे झाले आहेत. दोन आठवड्यांपासून त्यांचा ठावठिकाणा आढळून येत नाही, असे वृत्त आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काहीही बोलत नसल्याने त्याबाबत गूढ वाढले होते. एटीएसचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी रविवारी त्याबाबत बोलताना अधिकृतपणे एटीएसला अशी काही माहिती कळवण्यात आलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी घाबरून कसल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच संशयास्पद व्यक्ती, वस्तूंची माहिती निदर्शनास आल्यास त्याबाबत तातडीने पोलिसांना माहिती कळवावी, असे आवाहन केले. मुंबईचे (कायदा व सुव्यवस्था) सहआयुक्त देवेन भारती यांनीही पाक नागरिक बेपत्ता असल्याबाबत आमच्याकडे काहीही माहिती नसल्याचे सांगितले.