शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
5
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
6
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
7
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
8
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
9
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
10
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
11
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
12
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
13
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
14
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
15
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
17
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
18
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
19
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

कुणबी सेनेकडून सरकारला शेती करण्याचे आवाहन

By admin | Updated: June 8, 2017 03:22 IST

भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी परदेशातून धान्य आयात करण्यापेक्षा स्वत: व भाजप सरकारने शेती करावी

लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी परदेशातून धान्य आयात करण्यापेक्षा स्वत: व भाजप सरकारने शेती करावी यासाठी कुणबी सेनेने बुधवारी शेतीचे साहित्य तहसीलदारांमार्फत भाजप सरकारला दिले. यामध्ये बैलजोडी, नांगर, ब-या, हातोल, धान्य व घोंगडी आदींचा समावेश होता. हे साहित्य देऊन सरकारला शेती करण्याचे आव्हान देऊन निषेध नोंदविला तसेच शेतकरी संपाला पाठिंबा दर्शविण्यासाठी तहसील कार्यालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व कुणबी सेनाप्रमुख व काँग्रेसचे नेते विश्वनाथ पाटील यांनी केले. यावेळी खंडेश्वरी नाका येथून जनजागरण फेरी काढण्यात आली. तिचे तहसीलदार कार्यालयाजवळ मोर्चात रूपांतर झाले. ‘शेतकरी विरोधी सरकार हायऽ हायऽऽ’, ‘जय जवान; जय किसान’, ‘गोलियोसे मर रहे है जवान; गोलियोसे मर रहे है किसान’, ‘किसान हितकी बात करेगा; वही देश पे राज करेगा ’ अशा घोषणांनी वाडा परिसर दणाणून गेला होता. शेती परवडत नसल्याने शेतीवर आधारित सर्व समाजघटक व कष्टकरी वर्ग हवालिदल झाला आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्याला दिलासा देण्याऐवजी उध्वस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या मागे बॅकांचा ससेमिरा लावला आहे. त्यातच बडोदा-पनवेल मार्ग, मुंबई-नागपूर मार्ग यांची गरज नसतांनाही असे महाकाय रस्त्याचे प्रकल्प व शेती विरहित स्मार्ट सिटी, उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या, रिलायन्स गेल इंडिया कंपनीच्या गॅस वाहिन्या यासाठी शेतकऱ्याला विश्वासात न घेता पोलीस व निमलष्करी दलाच्या बळावर शेतकऱ्याच्या जमिनी भांडवलदार व सरकारकडून हडप केल्या जात आहेत असे, आरोप त्यांनी सरकारवर केले.शेतकऱ्याला आपल्या वारसाला जमिन नावावर करून देता येऊ नये म्हणून शासनाने जिझिया कराला लाजवेल अशी स्टॅम्प डयÞुटी आकारून शेतकऱ्याला शेती पासून बेदखल करण्याचा घाट घातला आहे. यातच ३५ सेक्शन, इको सेन्सेटीव्ह झोन वनसंज्ञा आदी शेतकरी विरोधी कायदे करून रेती वीट उद्योग धोक्यात आणल्याची टीका केली. शिवारात येऊन काम कराभाजपच्या मंत्र्यानी शिवाराला भेट न देता शिवारात येऊन काम करावे म्हणजे शेतकऱ्याचे दु:ख काय आहे ते त्यांना कळेल अशी टीका कुणबी सेनेचे नेते प्रफुल्ल पाटील यांनी मोर्चा दरम्यान केली. यावेळी तहसीलदार दिनेश कुऱ्हाडे यांनी निवेदन व शेतीचे साहित्य स्वीकारून ते सरकारला पाठविणार असल्याचे सांगितले. येत्या पंधरा दिवसांत सरसकट कर्जमाफी न केल्यास संपूर्ण कोकणातील नाक्या नाक्यांवर चक्का जाम आंदोलन करून रस्ता जाम करण्यात येईल असा गंभीर इशारा त्यांनी दिला.