शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

‘दशक्रिया’विरोधातील याचिका फेटाळली, चित्रपट राज्यभर प्रदर्शित; ब्राह्मण महासंघाची ठिकठिकाणी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 02:30 IST

‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली.

औरंगाबाद/कोल्हापूर/नाशिक/पुणे : ‘दशक्रिया’ चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. मंगेश पाटील यांनी शुक्रवारी फेटाळली. राज्यात ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध करत आंदोलन केले, मात्र पोलीस बंदोबस्तात चित्रपट राज्यभर प्रदर्शित झाला.सर्जनशील व्यक्तीला नाटक, चित्रपट आदींच्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांच्यावरील लघुपटाच्या बंदीविरोधातील याचिकेवरील निर्णयात म्हटल्याचा संदर्भ देत, न्यायालयाने उपरोक्त निर्णय दिला. बोलणे आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे अटळ आहे. चित्रपट, नाटक, पुस्तक, लघुपट यावर बंदीच्या आदेशापूर्वी न्यायालयाने त्याबाबत साक्षेप बाळगावा. ज्यामुळे लेखक, कलाकार, निर्माते अभिव्यक्तिस्वातंत्र्य जपू शकतील, असे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचा आधार घेत खंडपीठाने ही याचिका फेटाळली.‘दशक्रिया’ चित्रपटातील अनेक संवाद, उल्लेख हे मानहानिकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असल्याचा आक्षेप घेणारी आणि चित्रपट प्रदर्शनाला बंदी घालण्याची विनंती करणारी पैठण येथील पुरोहित समीर शुक्ल, सोहम पोहेकर, समीर धर्माधिकारी आदींची याचिका शुक्रवारी सुनावणीस आली होती.मराठा महासंघाच्या पुढाकाराने प्रदर्शनकोल्हापुरला अखिल भारतीय मराठा महासंघाने चित्रपटगृहांच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन चित्रपटाचे खेळ सुरू करायला लावले. चित्रपटाकडे प्रबोधनाचे माध्यम म्हणून बघावे, अशी भूमिका महासंघाने मांडली.पुणे, नाशिकमध्ये आंदोलनपुणे, नाशिकमध्ये ब्राह्मण महासंघांनी चित्रपटाला विरोध केला. ब्राम्हण समाजाने हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते.पैठणमध्ये दशक्रिया विधीत अडथळे -पैठणमध्ये शुक्रवारी मोक्षघाटावर विधी करण्यासाठी पुरोहित हजर राहिले नव्हते. चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजातर्फे शुक्रवारी निदर्शने करण्यात आली. दुपारी १२ नंतर विधी सुरू झाले. राज्यभर या चित्रपटाला विरोध झाला तरी काही ठिकाणी चित्रपट सुरळीत सुरू झाला़ तसेच चित्रपट परीक्षकांनी दर्जेदार सिनेमा असे कौतुक केले आहे़